शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

ब्रिक्स कंपनी सेवानिवृत्तांची देणी लवकरच देणार : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST

प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, केवळ शेतकरी व कामगारांच्या भल्यासाठीच लोकप्रतिनिधी या नात्याने १० वर्षे मुदतीने गडहिंग्लज कारखाना सहयोग तत्त्वावर ...

प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, केवळ शेतकरी व कामगारांच्या भल्यासाठीच लोकप्रतिनिधी या नात्याने १० वर्षे मुदतीने गडहिंग्लज कारखाना सहयोग तत्त्वावर चालवायला घेण्यास आपण कंपनीला तयार केले. ३० सप्टेंबर,२०१३ अखेर कारखान्याने ताळेबंदात दाखवलेल्या ८३ कोटी देयकांपैकी ४३ कोटी देयके शासनाने मान्य केली. बाकीची रक्कम सत्य-असत्यता (डू-डिलिजन्स) पडताळणीसाठी समिती नियुक्त केली आहे. कंपनी येण्यापूर्वी कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या क्लोजर नोटिसीची माहिती कंपनीच्या निदर्शनास आणली नव्हती. त्यामुळे नाइलाजास्तव ८ कोटी ८२ लाख ३५ हजार रुपये अदा करावे लागले. हंगामी व रोजंदारीवरील नोकरांना कायम करावे आणि फिटमेंटच्या मागणीसाठी गेटवर आंदोलन करून कंपनीची बदनामी करण्यात आली. तरीदेखील करारात नसलेली युनियन बँकेची ३ कोटी व स्टेट बँकेची साडेपाच कोटींची देणी अदा करून कंपनीने संचालक मंडळाच्या गळ्याचा फास सोडवला. करारानुसार सभासदांना दरवर्षी १० किलो साखर द्यायची होती. परंतु, कंपनीने दरवर्षी १०० व ५० किलो साखर देऊन ८ कोटी ४१ लाख ८६ हजाराचा भुर्दंड सोसला. गळीत वाढविण्यासाठी ८ कोटी ९७ लाख खर्चून मशिनरीचे आधुनिकीकरण केले. एकंदरीत या सर्व बाबींवर कंपनीने आतापर्यंत करारामध्ये अंतर्भूत नसतानाही ३४ कोटी ७१ लाख २१ हजार इतका खर्च केला.

ऊस उत्पादकांची एफ. आर. पी., तोडणी - वाहतूक बिले, कामगारांचा पगार कंपनीने वेळेवर दिला. तरीदेखील कंपनीस कारखाना चालविणे अशक्य करून टाकले आहे. त्यामुळे यापूर्वीच आपण संचालक मंडळास धोक्याचा इशारा दिला आहे, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

--------

चौकट

जबाबदारी कारखान्याचीच...!

८३ कोटींच्या देण्यांमध्ये कारखान्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कोणतीही देणी ताळेबंदात दाखवलेली नाहीत. त्यामुळे लवाद म्हणू

साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्तांची थकीत रक्कम देण्याची जबाबदारी कारखान्याचीच आहे, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात नमूद केले आहे.

-------

कारखान्याच्या भवितव्याची काळजी

५००० मे. टन गाळप क्षमता, सहवीज व इथेनॉलची निर्मिती करणारा कारखानाच साखर व्यवसाय टिकू शकतो. गडहिंग्लज कारखान्याची मशिनरी अत्यंत जुनी असून, कारखाना सातत्याने बंद पडतो. मुळातच प्रतिटन ५०० ते ६०० रुपयांनी कंपनी तोट्यात आहे. त्यामुळे कंपनी कारखाना सोडून गेली तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे तालुक्यातील एकमेव असणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाच्या भवितव्याची आपणांस काळजी वाटते, असेही मुश्रीफांनी नमूद केले आहे.

---

बातमीत मुश्रीफ यांचा फोटो वापरावा.