शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

...तर सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार

By admin | Updated: December 2, 2015 01:16 IST

रेणुका भक्त मंडळ आक्रमक : बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

कोल्हापूर : येत्या २४ डिसेंबर रोजी सौंदत्ती (कर्नाटक) येथे डोंगरावर यलम्मा देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी तीन दिवस कोल्हापूर शहरातील यात्रेकरू मोठ्या संख्येने जातात; पण तेथे यात्रेकरूंना मूलभूत सुविधांपासून वंचित राहून गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या वतीने बेळगाव येथे जाऊन जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन दिले. मूलभूत सुविधा पुरवणार नसाल तर या सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.डिसेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या कायमस्वरूपी मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या सुविधा पोळ्याच्या पौर्णिमेपर्यंत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. सौंदत्ती येथे २४ डिसेंबर रोजी रेणुका (यलम्मा) देवीची यात्रा भरत आहे. यासाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातून सुमारे साडेचार लाख भाविक मुख्य यात्रेच्या तीन दिवस अगोदर सांैदत्ती डोंगरावर दाखल होतात. हे सर्व भाविक उघड्या माळावर राहत असल्याने तेथे या भाविकांना गैरसोयींचा सामना दरवर्षी करावा लागतो. जुगुळबाई देवीचा अस्वच्छ कुंड, तेथे महिला आणि पुरुषांना अंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, शौचालयांचीही सोय करावी, तसेच डोंगरावर गेल्यावर तेथेही अंघोळीसाठी सुसज्ज सोय करावी, सार्वजनिक वीजखांबांवरील दिवे घालविण्याचे होणारे प्रकार थांबावेत, रेणुका मंदिरात तत्पर दर्शनासाठी ५० रुपये असताना १०० रुपये अनधिकृतपणे उकळले जातात, अशीही तक्रार यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या करवीरनिवासिनी रेणुका भक्त मंडळाच्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रशांत खाडे, उपाध्यक्ष बाबूराव पाटील, सचिव उदय पाटील, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, किरण मोरे, सदाशिव सावंत्रे, सुरेश बिरंबोळे, सुनील मोहिते, बाबा कराळे, अनिता पाटील, मंगल महाडिक, नगरसेवक निलोफर आजरेकर, अशकीन आजरेकर व रेणुका भक्त मंडळाचे ७५ कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाहीडिसेंबरमधील यात्रेपुरती तात्पुरती व चांगली सोय करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिले; तर कायमस्वरूपी पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी शॉवर व महिलांसाठी शौचालय करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल. त्याबाबत निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे ते म्हणाले. यंदा डोंगरावर यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.