शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

...तर सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार

By admin | Updated: December 2, 2015 01:16 IST

रेणुका भक्त मंडळ आक्रमक : बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

कोल्हापूर : येत्या २४ डिसेंबर रोजी सौंदत्ती (कर्नाटक) येथे डोंगरावर यलम्मा देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी तीन दिवस कोल्हापूर शहरातील यात्रेकरू मोठ्या संख्येने जातात; पण तेथे यात्रेकरूंना मूलभूत सुविधांपासून वंचित राहून गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या वतीने बेळगाव येथे जाऊन जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन दिले. मूलभूत सुविधा पुरवणार नसाल तर या सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.डिसेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या कायमस्वरूपी मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या सुविधा पोळ्याच्या पौर्णिमेपर्यंत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. सौंदत्ती येथे २४ डिसेंबर रोजी रेणुका (यलम्मा) देवीची यात्रा भरत आहे. यासाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातून सुमारे साडेचार लाख भाविक मुख्य यात्रेच्या तीन दिवस अगोदर सांैदत्ती डोंगरावर दाखल होतात. हे सर्व भाविक उघड्या माळावर राहत असल्याने तेथे या भाविकांना गैरसोयींचा सामना दरवर्षी करावा लागतो. जुगुळबाई देवीचा अस्वच्छ कुंड, तेथे महिला आणि पुरुषांना अंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, शौचालयांचीही सोय करावी, तसेच डोंगरावर गेल्यावर तेथेही अंघोळीसाठी सुसज्ज सोय करावी, सार्वजनिक वीजखांबांवरील दिवे घालविण्याचे होणारे प्रकार थांबावेत, रेणुका मंदिरात तत्पर दर्शनासाठी ५० रुपये असताना १०० रुपये अनधिकृतपणे उकळले जातात, अशीही तक्रार यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या करवीरनिवासिनी रेणुका भक्त मंडळाच्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रशांत खाडे, उपाध्यक्ष बाबूराव पाटील, सचिव उदय पाटील, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, किरण मोरे, सदाशिव सावंत्रे, सुरेश बिरंबोळे, सुनील मोहिते, बाबा कराळे, अनिता पाटील, मंगल महाडिक, नगरसेवक निलोफर आजरेकर, अशकीन आजरेकर व रेणुका भक्त मंडळाचे ७५ कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाहीडिसेंबरमधील यात्रेपुरती तात्पुरती व चांगली सोय करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिले; तर कायमस्वरूपी पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी शॉवर व महिलांसाठी शौचालय करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल. त्याबाबत निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे ते म्हणाले. यंदा डोंगरावर यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.