शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आदानी, अंबानींच्या उत्पादनावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST

कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून त्यांचे कंबरडे मोडले आहे. या कायद्यांची झळ ...

कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून त्यांचे कंबरडे मोडले आहे. या कायद्यांची झळ केवळ शेतकरी व कामगारांना बसणार नाहीतर सामान्य माणूसही त्यात भरडला जाणार आहे. या कायद्यामागे असणारे अंबानी व आदानी यांना विरोध करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे.

‘आयटक’चे दिलीप पवार म्हणाले, सर्वसामान्य माणसाने आता बघ्याची भूमिका न घेता कायद्यांना कडाडून विरोध केला पाहिजे. बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी उद्योगपतींना हवे तसे निर्णय घेत आहेत. हे खपवून घेता कामा नये, यासाठी शुक्रवारी (दि. १) पासून राज्यभर आदानी व अंबानीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला जाणार आहे. यामध्ये सामान्य माणसाने सहभागी होऊन आपली ताकद दाखवून द्यावी.

श्रमिकचे अतुल दिघे म्हणाले, देशातील अन्नधान्य ताब्यात घेऊन ते आफ्रिका, आशिया खंडात विक्री करण्याचा घाट आदानी व अंबानींचा आहे. जग मुठीत ठेवण्याचा प्रयत्न उद्योगपतींचा असून त्यांनाच मुठीत ठेवण्यासाठी या कायद्यांना विरोध केला पाहिजे.

सिटूचे जिल्हा सचिव प्रा. सुभाष जाधव म्हणाले, पहिल्या टप्प्यात या उद्योगपतींची उत्पादनांवर बहिष्कार घालायची आहेत. देशाच्या मालकीच्या कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. राजेश वरक, एस. बी. पाटील, सदाशिव निकम, श्रीराम भिसे, सुधाकर सावंत आदी उपस्थित होते.