शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

सीमाभागप्रश्नी अरविंद सावंत यांनी उठवला आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST

सीमाभागातील व्यथेवर लोकसभेत उठला आवाज सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने प्रशासनाच्या साथीने, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अत्याचार सुरू ...

सीमाभागातील व्यथेवर लोकसभेत उठला आवाज

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने प्रशासनाच्या साथीने, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अत्याचार सुरू केला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात आज लोकसभेत आवाज उठविण्यात आला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत आवाज उठविला.

१२ मार्चला बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला करण्यात आलेल्या हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी सीमाभागात केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिसांची नियुक्ती करावी तसेच मराठी भाषिकांना संरक्षण पुरविण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असूनही कर्नाटक सरकार बेळगावच्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यात येत आहे. बेळगाव पोलिसांच्या संरक्षणात सदर प्रकार घडत आहेत.

कन्नड संघटनांचा हैदोस सुरू आहे. बेळगावचे पोलीस प्रशासन मराठी भाषिकांना संरक्षण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

सदर प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता होती. यादरम्यान जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि शहरप्रमुख प्रवीण तेजम यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला. त्यामुळेच पुढील अनर्थ टळला. हा सारा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू होता. या घटनेचा निषेध सीमाभागातील संपूर्ण मराठी भाषिक जनता करत आहे. या घटनेत सामील असलेल्या कन्नड संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांच्या डोळ्यांदेखत कायदा हाती घेणाऱ्यांना मोकाटपणे सोडून देण्यात आले आहे. ही सर्व बाब लक्षात घेता बेळगावची शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. याकरिता उपरोक्त मागणी करण्यात आली असून केंद्र सरकारने याचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी विनंती अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. अरविंद सावंत यांनी आवाज उठविताच कर्नाटकातील काही खासदारांनी याला विरोध केला. परंतु शून्य प्रहरात अरविंद सावंत यांनी सीमाभागासंदर्भात आपला मुद्दा मांडला.