शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

सीमाभागप्रश्नी अरविंद सावंत यांनी उठवला आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST

सीमाभागातील व्यथेवर लोकसभेत उठला आवाज सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने प्रशासनाच्या साथीने, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अत्याचार सुरू ...

सीमाभागातील व्यथेवर लोकसभेत उठला आवाज

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने प्रशासनाच्या साथीने, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अत्याचार सुरू केला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात आज लोकसभेत आवाज उठविण्यात आला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत आवाज उठविला.

१२ मार्चला बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला करण्यात आलेल्या हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी सीमाभागात केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिसांची नियुक्ती करावी तसेच मराठी भाषिकांना संरक्षण पुरविण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असूनही कर्नाटक सरकार बेळगावच्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यात येत आहे. बेळगाव पोलिसांच्या संरक्षणात सदर प्रकार घडत आहेत.

कन्नड संघटनांचा हैदोस सुरू आहे. बेळगावचे पोलीस प्रशासन मराठी भाषिकांना संरक्षण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

सदर प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता होती. यादरम्यान जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि शहरप्रमुख प्रवीण तेजम यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला. त्यामुळेच पुढील अनर्थ टळला. हा सारा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू होता. या घटनेचा निषेध सीमाभागातील संपूर्ण मराठी भाषिक जनता करत आहे. या घटनेत सामील असलेल्या कन्नड संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांच्या डोळ्यांदेखत कायदा हाती घेणाऱ्यांना मोकाटपणे सोडून देण्यात आले आहे. ही सर्व बाब लक्षात घेता बेळगावची शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. याकरिता उपरोक्त मागणी करण्यात आली असून केंद्र सरकारने याचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी विनंती अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. अरविंद सावंत यांनी आवाज उठविताच कर्नाटकातील काही खासदारांनी याला विरोध केला. परंतु शून्य प्रहरात अरविंद सावंत यांनी सीमाभागासंदर्भात आपला मुद्दा मांडला.