शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सीमाभागप्रश्नी अरविंद सावंत यांनी उठवला आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST

सीमाभागातील व्यथेवर लोकसभेत उठला आवाज सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने प्रशासनाच्या साथीने, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अत्याचार सुरू ...

सीमाभागातील व्यथेवर लोकसभेत उठला आवाज

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने प्रशासनाच्या साथीने, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अत्याचार सुरू केला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात आज लोकसभेत आवाज उठविण्यात आला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत आवाज उठविला.

१२ मार्चला बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला करण्यात आलेल्या हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी सीमाभागात केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिसांची नियुक्ती करावी तसेच मराठी भाषिकांना संरक्षण पुरविण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असूनही कर्नाटक सरकार बेळगावच्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यात येत आहे. बेळगाव पोलिसांच्या संरक्षणात सदर प्रकार घडत आहेत.

कन्नड संघटनांचा हैदोस सुरू आहे. बेळगावचे पोलीस प्रशासन मराठी भाषिकांना संरक्षण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

सदर प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता होती. यादरम्यान जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि शहरप्रमुख प्रवीण तेजम यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला. त्यामुळेच पुढील अनर्थ टळला. हा सारा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू होता. या घटनेचा निषेध सीमाभागातील संपूर्ण मराठी भाषिक जनता करत आहे. या घटनेत सामील असलेल्या कन्नड संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांच्या डोळ्यांदेखत कायदा हाती घेणाऱ्यांना मोकाटपणे सोडून देण्यात आले आहे. ही सर्व बाब लक्षात घेता बेळगावची शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. याकरिता उपरोक्त मागणी करण्यात आली असून केंद्र सरकारने याचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी विनंती अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. अरविंद सावंत यांनी आवाज उठविताच कर्नाटकातील काही खासदारांनी याला विरोध केला. परंतु शून्य प्रहरात अरविंद सावंत यांनी सीमाभागासंदर्भात आपला मुद्दा मांडला.