शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दोन्ही काँग्रेसचे ‘ताराराणी’च टार्गेट

By admin | Updated: August 10, 2015 01:07 IST

महापालिका निवडणूक : ३०-३० जागांवरच लक्ष केंद्रित करून सारी ताकद लावणार

राजाराम लोंढे - कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सध्या चौरंगी वाटत असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे खरे टार्गेट ताराराणी आघाडीच आहे. ‘ताराराणी’च्या कारभाऱ्यांचे निवडणुकीतील डावपेच माहिती असल्याने दोन्ही काँग्रेसने त्याच पद्धतीने आपली चाचपणी सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांनी सर्व ८१ जागा लढविण्याचा निर्धार केला असला तरी ‘ताराराणी’ला रोखण्यासाठी ३०-३० जागांवरच अधिक लक्ष केंद्रित करून तिथेच सारी ताकद लावली जाणार आहे. गेली पाच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी-जनसुराज्य सत्तेत होती. या निवडणुकीतहीही आघाडी कायम राहिली असती, पण इच्छुकांची नाराजी अंगावर ओढवून त्याचा फायदा विरोधकांना होईल, या भीतीनेच दोन्ही काँग्रेस विशेषत: आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वबळाचा शड्डू ठोकला. त्यात शिवसेना व भाजपने सवतासुभा केल्याने चौरंगी लढत निश्चित आहे. कोणत्याही एका पक्षाला सत्तेची ‘४१’ फिगर गाठणे कठीण आहे. महापालिकेच्या राजकारणातील मुरब्बी म्हणून ‘ताराराणी’ आघाडीकडे पाहिले जाते. या आघाडीने भाजपबरोबर हातमिळवणी केल्याने शिवसेनेला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असली तरी नेत्यांचे अजून मलोमिलन व्हायचे आहे. सतेज पाटील यांनीच चाचपणी सुरू केली असून, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती अजून पडद्यामागेच आहेत. आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात समझोता करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रयत्न असला तरी ते अशक्य आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना सोबत घेऊनच रिंगणात उतरावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व्हेच्या माध्यमातून चाचपणी सुरू केली आहे. प्रभागात इच्छुकांपैकी पहिल्या तीनजणांशी चर्चा सुरू आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीला २५ ठिकाणी यश मिळाले, तर त्यांचे बारा उमेदवार थोडक्या मताने पराभूत झाले. अशा ४० जागांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. उर्वरित ठिकाणी ताकदीचे नवीन चेहरे मिळतात का? यासाठी फासे टाकले जात आहेत. एकंदरीत राजकीय आडाखे पाहता काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर भाजप-ताराराणी आघाडीचेच खरे आव्हान आहे. त्यामुळे ‘ताराराणी’च्या हालचालीवर दोन्ही काँग्रेसचे लक्ष आहे. ६०-२१ चा फॉर्म्युलाराष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य पक्षामध्ये आघाडी निश्चित झाली असली तरी जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही गत निवडणुकीतील प्रभाग, इच्छुकांची संख्या पाहून राष्ट्रवादी ६०, तर जनसुराज्य २१ ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचेविद्यमानांना सिग्नलराष्ट्रवादीच्या विद्यमान २५ नगरसेवकांपैकी बुहतांशी पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. नवीन प्रभागाचा अंदाज घेऊन विद्यमान नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहेत. सत्तेविना दोन्ही काँग्रेस रिंगणात गत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात व केंद्रात सत्तेत होती. त्यामुळे निवडणूक त्यांना सोपी गेली होती. सत्तेत असल्याने ‘ताकद’वान उमेदवार मिळालेच, त्याचबरोबर पक्षाकडूनही चांगली रसद पुरविली होती, पण आता सत्तेविना दोन्ही काँग्रेस रिंगणात उतरल्याने ८१ जागांवर ताकदीने निवडणूक लढविणे तितकेसे सोपे राहिले नाही.