शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

राज्यातील कमकुवत बाजार समित्यांना ‘बुस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:25 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या आडून बाजार समित्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले असताना, ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या आडून बाजार समित्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले असताना, राज्य शासनाने आपल्या अर्थसंकल्पातून समित्यांना बुस्टर दिला आहे. राज्यातील ३०५ बाजार समित्यांच्या बळकटीसाठी दोन हजार कोटींची तरतूद केली आहे. यातील सुमारे पावणे दोनशे समित्या कमकुवत असून या बुस्टरमुळे त्यांना बळ मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समित्यांच्या निर्मिती झाली. त्यानुसार समित्यांचे कामही सुरू झाले. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे समित्या अडचणीत आल्या. उत्पन्नाचा विचार न करता तालुकास्तरीय समित्यांची निर्मिती झाली. तालुक्यातील शेतीमाल व एकूण प्रशासनावर होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. राज्यातील ३०५ पैकी सुमारे १७५ समित्या या कारणानेच कमकुवत झाल्या आहेत. उत्पन्नवाढीसाठी हातपाय पसरण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मर्यादा येत असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीत फारशी सुधारणा होताना दिसत नाही.

केंद्र सरकारने २०१७ मध्ये ई-नाम अंतर्गत ६० बाजार समित्यांना हार्डवेअर पुरवले होते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत कमकुवत बाजार समित्यांसाठी अर्थसाहाय्य दिले होते. त्यातून जनावरांचे आठवडी बाजार विकसित करण्यावर भर दिला होता. मात्र, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे बाजार समित्यांच्या अस्तित्वावर काहीसे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कायद्यांमुळे समित्या संपणार असल्याची भावना शेतकरी व व्यापाऱ्यांची आहे. अशा वातावरणात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने समित्यांना बुस्टर देण्याचे काम केले आहे. राज्य शासनाने अशा प्रकारची तरतूद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबतचे निकष अद्याप अस्पष्ट असले तरी यामुळे कमकुवत समित्यांना बळकटी येण्यास मदत होणार हे निश्चित आहे.

वर्षाला पाचशे कोटी मिळणार

समित्यांच्या बळकटीसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी वर्षाला पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत. त्यानुसार समित्यांना विकास आराखडा तयार करून ‘पणन’ची मान्यता घ्यावी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात राज्यातील बाजार समित्या -

एकूण समित्या - ३०५

सक्षम - १३०

अडचणीतील - १७५

कोट-

दोन हजार कोटींच्या तरतुदीची अंमलबजावणी कशी होणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरी राज्य शासनाच्या या मदतीमुळे बाजार समित्यांना आर्थिक ताकद मिळणार आहे.

- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)