शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील कमकुवत बाजार समित्यांना ‘बुस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:25 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या आडून बाजार समित्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले असताना, ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या आडून बाजार समित्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले असताना, राज्य शासनाने आपल्या अर्थसंकल्पातून समित्यांना बुस्टर दिला आहे. राज्यातील ३०५ बाजार समित्यांच्या बळकटीसाठी दोन हजार कोटींची तरतूद केली आहे. यातील सुमारे पावणे दोनशे समित्या कमकुवत असून या बुस्टरमुळे त्यांना बळ मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समित्यांच्या निर्मिती झाली. त्यानुसार समित्यांचे कामही सुरू झाले. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे समित्या अडचणीत आल्या. उत्पन्नाचा विचार न करता तालुकास्तरीय समित्यांची निर्मिती झाली. तालुक्यातील शेतीमाल व एकूण प्रशासनावर होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. राज्यातील ३०५ पैकी सुमारे १७५ समित्या या कारणानेच कमकुवत झाल्या आहेत. उत्पन्नवाढीसाठी हातपाय पसरण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मर्यादा येत असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीत फारशी सुधारणा होताना दिसत नाही.

केंद्र सरकारने २०१७ मध्ये ई-नाम अंतर्गत ६० बाजार समित्यांना हार्डवेअर पुरवले होते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत कमकुवत बाजार समित्यांसाठी अर्थसाहाय्य दिले होते. त्यातून जनावरांचे आठवडी बाजार विकसित करण्यावर भर दिला होता. मात्र, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे बाजार समित्यांच्या अस्तित्वावर काहीसे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कायद्यांमुळे समित्या संपणार असल्याची भावना शेतकरी व व्यापाऱ्यांची आहे. अशा वातावरणात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने समित्यांना बुस्टर देण्याचे काम केले आहे. राज्य शासनाने अशा प्रकारची तरतूद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबतचे निकष अद्याप अस्पष्ट असले तरी यामुळे कमकुवत समित्यांना बळकटी येण्यास मदत होणार हे निश्चित आहे.

वर्षाला पाचशे कोटी मिळणार

समित्यांच्या बळकटीसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी वर्षाला पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत. त्यानुसार समित्यांना विकास आराखडा तयार करून ‘पणन’ची मान्यता घ्यावी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात राज्यातील बाजार समित्या -

एकूण समित्या - ३०५

सक्षम - १३०

अडचणीतील - १७५

कोट-

दोन हजार कोटींच्या तरतुदीची अंमलबजावणी कशी होणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरी राज्य शासनाच्या या मदतीमुळे बाजार समित्यांना आर्थिक ताकद मिळणार आहे.

- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)