शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

चौदा हजार पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:25 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने समग्र (सर्व) शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ मध्ये ...

कोल्हापूर : राज्य शासनाने समग्र (सर्व) शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ मध्ये मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली. ही जुनी सुस्थितीतील पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पुनर्वापरासाठी जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १४,६९७ पालकांनी त्यांच्या पाल्यांकडून पुस्तकांचे संच शाळांमध्ये जमा केले आहेत.

जुनी पुस्तके जमा करून घेण्यामागे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागावी असा उद्देश आहे. ही पुस्तके जमा करण्यासाठी व्हॉटस्ॲप, फेसबुक, ई-मेल आदी सोशल मीडियाचा वापर करावा. पालक, विद्यार्थ्यांना आवाहन करावे. त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगावे. जे पालक, विद्यार्थी स्वेच्छेने पुस्तके जमा करण्यास इच्छुक असतील त्यांच्याकडून ती जमा करण्यात यावीत, असे आवाहन शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना केले आहे.

मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार शिक्षकांनी पालकांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांनी १४,६९७ पुस्तकांचे संच शाळांमध्ये जमा केले आहेत. त्यात मराठी माध्यमाची १४,२८६, इंग्रजी ४८, कन्नड २४ तर उर्दू माध्यमाची ३३९ पुस्तके आहेत.

पॉईंटर

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली : ५५३०१

दुसरी : ५७४५२

तिसरी : ५७६०९

चौथी : ५७८३४

पाचवी : ५७७५१

सहावी : ५७३९५

सातवी : ५८३२०

आठवी : ५८८००

चौकट

मागील वर्षी किती संच वाटप

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण ३,२६,९३० विद्यार्थ्यांना एकूण १६,८५,९८८ हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

===Photopath===

100521\10kol_1_10052021_5.jpg

===Caption===

डमी (१००५२०२१-कोल-टेस्ट बुक रिटर्न डमी)