शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

चौदा हजार पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:25 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने समग्र (सर्व) शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ मध्ये ...

कोल्हापूर : राज्य शासनाने समग्र (सर्व) शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ मध्ये मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली. ही जुनी सुस्थितीतील पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पुनर्वापरासाठी जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १४,६९७ पालकांनी त्यांच्या पाल्यांकडून पुस्तकांचे संच शाळांमध्ये जमा केले आहेत.

जुनी पुस्तके जमा करून घेण्यामागे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागावी असा उद्देश आहे. ही पुस्तके जमा करण्यासाठी व्हॉटस्ॲप, फेसबुक, ई-मेल आदी सोशल मीडियाचा वापर करावा. पालक, विद्यार्थ्यांना आवाहन करावे. त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगावे. जे पालक, विद्यार्थी स्वेच्छेने पुस्तके जमा करण्यास इच्छुक असतील त्यांच्याकडून ती जमा करण्यात यावीत, असे आवाहन शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना केले आहे.

मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार शिक्षकांनी पालकांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांनी १४,६९७ पुस्तकांचे संच शाळांमध्ये जमा केले आहेत. त्यात मराठी माध्यमाची १४,२८६, इंग्रजी ४८, कन्नड २४ तर उर्दू माध्यमाची ३३९ पुस्तके आहेत.

पॉईंटर

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली : ५५३०१

दुसरी : ५७४५२

तिसरी : ५७६०९

चौथी : ५७८३४

पाचवी : ५७७५१

सहावी : ५७३९५

सातवी : ५८३२०

आठवी : ५८८००

चौकट

मागील वर्षी किती संच वाटप

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण ३,२६,९३० विद्यार्थ्यांना एकूण १६,८५,९८८ हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

===Photopath===

100521\10kol_1_10052021_5.jpg

===Caption===

डमी (१००५२०२१-कोल-टेस्ट बुक रिटर्न डमी)