शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संवर्धनातील पदार्थांमुळे अंबाबाई मूर्तीवर डाग

By admin | Updated: May 31, 2017 14:46 IST

आर्द्रता समितीचा प्राथमिक अंदाज : मूर्तीची पाहणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३१ : अंबाबाई मूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या पदार्थांमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आर्द्रता समितीने बुधवारी व्यक्त केला. मूर्तीवरील चकाकीचा थर कमी झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी प्श्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख पी.डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आर्द्रता समिती नियुक्त केली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता राऊत यांच्यासह उदय गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद कारंजकर, माधव मुनिश्वर, केदार मुनिश्वर यांनी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान मूर्तीवर पांढऱ्या डागाचा थर नव्याने पडत आहे की तो संवर्धनाचाच एक भाग आहे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मूर्ती ओली केली जाते तेंव्हा हे डाग दिसत नाही मात्र मूर्ती कोरडी होईल तसे डाग दिसू लागतात. त्यामुळे हे डाग म्हणजे संवर्धनातील पदार्थांचाच एक भाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती उदय गायकवाड यांनी दिली.

प्रक्रियेची सीडी उघड करा : आर्द्रता समितीची मागणी

तत्कालिन अधिकारी मनेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले आहे. ही सिडी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली त्यांनी ती सचिवांच्या ताब्यात दिली. या संवर्धनातील घटकांचा मूर्तीवर परिणाम होत असल्याने ती सिडी आर्द्रता समितीसमोर तरी उघड करा, सीडीचा गैरवापर होवू नये यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या उपस्थिीतीत ती दाखवण्यात यावी अशी मागणी या समितीतील सदस्यांनी केली आहे.

पूरातत्वकडून शुक्रवारी पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी औरंगाबाद येथील पूरातत्वच्या अधिकाऱ्यांश्ी संपर्क साधून अंबाबाईची मूर्ती पाहणीसाठी कोल्हापूरात येण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२ जून) पूरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच नक्की चुकलंय कुठे हे स्पष्ट होईल.

अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन का?

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या केवळ अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन केलेल्याचे आर्द्रता समितीच्या निदर्शनास आले आहे. देवीचा चेहरा, उजवी व डावी बाजू मुकूट येथे पांढरे डाग नाही. कारण या भागावर संवर्धनाचे काम करण्यात आलेले नाही. देवीची गदा, पाय, सिंह आणि त्यावरील बाजू, ढाल या संवर्धन केलेल्या ठिकाणी हे डाग पडले आहेत. आणि चकाकीचा थर कमी झाला आहे. अशा पद्धतीने काम का करण्यात आले हा प्रश्न आहे.

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनात कोणते साहित्य किती प्रमाणात वापरले, संवर्धन नेमके कसे केले याची आम्हाला काहीच माहिती नाही. पूरातत्वचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुनच याबाबतचे भाष्य करता येईल.

पी.डी. राऊत,

अध्यक्ष, आर्द्रता समिती