शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

संवर्धनातील पदार्थांमुळे अंबाबाई मूर्तीवर डाग

By admin | Updated: May 31, 2017 14:46 IST

आर्द्रता समितीचा प्राथमिक अंदाज : मूर्तीची पाहणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३१ : अंबाबाई मूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या पदार्थांमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आर्द्रता समितीने बुधवारी व्यक्त केला. मूर्तीवरील चकाकीचा थर कमी झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी प्श्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख पी.डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आर्द्रता समिती नियुक्त केली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता राऊत यांच्यासह उदय गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद कारंजकर, माधव मुनिश्वर, केदार मुनिश्वर यांनी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान मूर्तीवर पांढऱ्या डागाचा थर नव्याने पडत आहे की तो संवर्धनाचाच एक भाग आहे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मूर्ती ओली केली जाते तेंव्हा हे डाग दिसत नाही मात्र मूर्ती कोरडी होईल तसे डाग दिसू लागतात. त्यामुळे हे डाग म्हणजे संवर्धनातील पदार्थांचाच एक भाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती उदय गायकवाड यांनी दिली.

प्रक्रियेची सीडी उघड करा : आर्द्रता समितीची मागणी

तत्कालिन अधिकारी मनेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले आहे. ही सिडी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली त्यांनी ती सचिवांच्या ताब्यात दिली. या संवर्धनातील घटकांचा मूर्तीवर परिणाम होत असल्याने ती सिडी आर्द्रता समितीसमोर तरी उघड करा, सीडीचा गैरवापर होवू नये यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या उपस्थिीतीत ती दाखवण्यात यावी अशी मागणी या समितीतील सदस्यांनी केली आहे.

पूरातत्वकडून शुक्रवारी पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी औरंगाबाद येथील पूरातत्वच्या अधिकाऱ्यांश्ी संपर्क साधून अंबाबाईची मूर्ती पाहणीसाठी कोल्हापूरात येण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२ जून) पूरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच नक्की चुकलंय कुठे हे स्पष्ट होईल.

अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन का?

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या केवळ अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन केलेल्याचे आर्द्रता समितीच्या निदर्शनास आले आहे. देवीचा चेहरा, उजवी व डावी बाजू मुकूट येथे पांढरे डाग नाही. कारण या भागावर संवर्धनाचे काम करण्यात आलेले नाही. देवीची गदा, पाय, सिंह आणि त्यावरील बाजू, ढाल या संवर्धन केलेल्या ठिकाणी हे डाग पडले आहेत. आणि चकाकीचा थर कमी झाला आहे. अशा पद्धतीने काम का करण्यात आले हा प्रश्न आहे.

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनात कोणते साहित्य किती प्रमाणात वापरले, संवर्धन नेमके कसे केले याची आम्हाला काहीच माहिती नाही. पूरातत्वचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुनच याबाबतचे भाष्य करता येईल.

पी.डी. राऊत,

अध्यक्ष, आर्द्रता समिती