शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संवर्धनातील पदार्थांमुळे अंबाबाई मूर्तीवर डाग

By admin | Updated: May 31, 2017 14:46 IST

आर्द्रता समितीचा प्राथमिक अंदाज : मूर्तीची पाहणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३१ : अंबाबाई मूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या पदार्थांमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आर्द्रता समितीने बुधवारी व्यक्त केला. मूर्तीवरील चकाकीचा थर कमी झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी प्श्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख पी.डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आर्द्रता समिती नियुक्त केली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता राऊत यांच्यासह उदय गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद कारंजकर, माधव मुनिश्वर, केदार मुनिश्वर यांनी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान मूर्तीवर पांढऱ्या डागाचा थर नव्याने पडत आहे की तो संवर्धनाचाच एक भाग आहे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मूर्ती ओली केली जाते तेंव्हा हे डाग दिसत नाही मात्र मूर्ती कोरडी होईल तसे डाग दिसू लागतात. त्यामुळे हे डाग म्हणजे संवर्धनातील पदार्थांचाच एक भाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती उदय गायकवाड यांनी दिली.

प्रक्रियेची सीडी उघड करा : आर्द्रता समितीची मागणी

तत्कालिन अधिकारी मनेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले आहे. ही सिडी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली त्यांनी ती सचिवांच्या ताब्यात दिली. या संवर्धनातील घटकांचा मूर्तीवर परिणाम होत असल्याने ती सिडी आर्द्रता समितीसमोर तरी उघड करा, सीडीचा गैरवापर होवू नये यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या उपस्थिीतीत ती दाखवण्यात यावी अशी मागणी या समितीतील सदस्यांनी केली आहे.

पूरातत्वकडून शुक्रवारी पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी औरंगाबाद येथील पूरातत्वच्या अधिकाऱ्यांश्ी संपर्क साधून अंबाबाईची मूर्ती पाहणीसाठी कोल्हापूरात येण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२ जून) पूरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच नक्की चुकलंय कुठे हे स्पष्ट होईल.

अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन का?

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या केवळ अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन केलेल्याचे आर्द्रता समितीच्या निदर्शनास आले आहे. देवीचा चेहरा, उजवी व डावी बाजू मुकूट येथे पांढरे डाग नाही. कारण या भागावर संवर्धनाचे काम करण्यात आलेले नाही. देवीची गदा, पाय, सिंह आणि त्यावरील बाजू, ढाल या संवर्धन केलेल्या ठिकाणी हे डाग पडले आहेत. आणि चकाकीचा थर कमी झाला आहे. अशा पद्धतीने काम का करण्यात आले हा प्रश्न आहे.

पूरातत्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनात कोणते साहित्य किती प्रमाणात वापरले, संवर्धन नेमके कसे केले याची आम्हाला काहीच माहिती नाही. पूरातत्वचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुनच याबाबतचे भाष्य करता येईल.

पी.डी. राऊत,

अध्यक्ष, आर्द्रता समिती