शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

लहू ढेकणेच्या कू्रर मानसिकतेने नायकुडे कुटुंब उद्ध्वस्त

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

दत्ताजीचा हकनाक बळी : दारूचे व्यसन नडले; घरातील कर्ता पुरुष गेला; आता दाद मागायची तरी कोणाकडे ?

एकनाथ पाटील - कोल्हापूर -सेंट्रिंगची कामे करताना दत्ताजीला सहकाऱ्यांमुळे दारूचे व्यसन जडले. दिवसभर काम आणि रात्री दारू अशी त्यांची दिनचर्या. व्यसनाधीन असला तरी संसाराचा गाडा त्याच्या मजुरीवरच चालायचा. मात्र या व्यसनामुळे इतके क्रूर मरण येईल, असे त्याने स्वप्नातही पाहिले नसेल. त्याचे अंत्यसंस्कार करणेही त्याच्या कुटुंबाच्या नशिबी आले नाही आणि हातावर पोट असलेले त्याचे कुटुंबही उद्ध्वस्त झाले. दत्ताजी नायकुडे यांचे सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे कौलारू छोटेखानी घर आहे. तीन वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरवले. परिस्थिती अत्यंत गरिबीची, घरामध्ये आई शांताबाई, भाऊ प्रकाश, पत्नी संजीवनी, मुलगी शीतल, मुलगा ओंकार असे मिळून एकत्र राहतात. वडील गवंडी काम करत होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासून गवंडी कामाची आवड, हाच व्यवसाय पुढे त्यांनी चालविला. त्यातून त्यांनी दोन मुलींचे विवाह केले. सध्या त्यांची मुलगी शीतल (वय १६) दहावी, तर मुलगा ओंकार (१२) सातवीमध्ये शिकत आहेत. दत्ताजी सुरुवातीस निर्व्यसनी होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ व प्रामाणिक होता. काही वर्षांपूर्वी कामावरील सहकाऱ्यांच्या संगतीतून त्यांना दारूचे व्यसन जडले आणि त्यामध्ये ते वाहत गेले. गेल्या आठवड्यात घरामध्ये नातेवाइकाच्या लग्नाची तयारी सुरू होती. लग्नाच्या धांदलीत सर्वजण मग्न असताना शुक्रवारी १५ मे रोजी ते कामाला जातो म्हणून घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी लग्नाची तयारी करण्यासाठी लवकर येतो, असेही पत्नीला सांगितले. परंतु, त्या रात्री ते घरी आलेच नाहीत. कामावर गेल्यावर चार-चार दिवस ते घरी येत नसल्याने नातेवाइकांनी शोधाशोधही केली नाही. इकडे मात्र लहू ढेकणे हा त्यांचा यमदूत बनून सज्ज होता. त्याने स्वत:च्या जमिनीमध्ये झाडे लावण्यासाठी खड्डे खोदायचे आहेत, अशी बतावणी करून दत्ताजींना दुचाकीवरून गिरगावच्या माळरानावर नेले. भरपूर दारू पाजून पुरते ‘लोड’ केले. याठिकाणी कोयत्याने त्याचे शीर कापले, त्यानंतर हाताचे पंजेही तोडले. दत्ताजीची ओळख पुसून तोच लहू ढेकणे आहे असा चित्रपटात शोभेल असा बनाव त्याने केला. आपल्या धन्याचा खून झाला आहे, याची पुसटशीही कल्पना पत्नीला नव्हती. बाबा कुठे आहेत, अशी कोणी विचारणा केली, तर दोन्ही मुले कामावर गेली आहेत, असे सांगत होती. गेले चार दिवस सीपीआरच्या शवागृहात मृतदेह पडून होता. अखेर पोलिसांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. दत्ताजीचा असा खून झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दाद मागायची कोणाकडे? असा काय गुन्हा केला होता त्यांनी, की त्यांचा क्रूरपणे खून करण्यात आला. या नातेवाइकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना पोलीसही अवाक झाले. निष्पापांचा घेतला बळी :२९ नोव्हेंबर १९९९- संकेत सूर्यकांत भांडे ४ जुलै २०००- अमित चंद्रकांत सोनवणे १६ मे २०१५- दत्ताजी पांडुरंग नायकुडेस्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी लूह ढेकणेंने घेतला दत्ताजीचा बळी