शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

अंत्यसंस्कारासाठी चक्क ‘ब्लॅक’चं रॉकेल!

By admin | Updated: April 12, 2015 23:58 IST

परळी खोरे : माणूस गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून नातेवाइकांना करावी लागतेय शोधाशोध

विशाल गुजर -परळी -प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आजही कमी नाहीत, याची प्रचिती परळी खोऱ्यात येते. अंत्यसंस्कारासाठी मिळणारा रॉकेलचा कोटाही संपवला जात असल्याने नातेवाइकांना जवळचा माणूस गेल्याचे दु:ख बाजूला ठेवून ब्लॅकने कोठे रॉकेल मिळेल का, याचा शोधशोध करावी लागत आहे.‘जाताना सरणावर, इतुकेच मला कळले होते..., मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...! गझलकार सुरेश भट्ट यांच्या कवितेतील या ओळी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. सामान्यांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष मरणानंतरही चालूच असतो, हे दुर्दैव. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्यांना रॉकेलच्या भीषण टंचाईला नेहमीच सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या स्वयंपाकासाठी सोडाच; पण अनेकदा अंत्यसंस्कारासाठीही सहजासहजी रॉकेल मिळत नाही. अशावेळी काळ्या बाजारातून रॉकेल आणावे लागते. असाच धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी अनुभवास मिळाला. सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ग्रामीण डोंगराळ भागात गुरुवार, दि. ९ रोजी दुपारी घडला. राज्य शासनाने जानेवारी २०१५ पासून रॉकेल कपातीचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण व अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. शासन दरवेळी नवनवीन निर्णय घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून सलग दोन महिने रॉकेलच्या साठ्यात कपात केली होती. त्यानंतर ‘गुड न्यूज’ आली. मार्च-एप्रिलमध्ये कोट्यात आठ ते दहा टक्क्यांने वाढ करण्यात आली. मात्र, तरीही सर्वसामान्यांना पुरेसे रॉकेल मिळत नाही. अंत्यसंस्कारासाठी रॉकेलचा स्वतंत्र कोटा असावा, असा कोणताही निर्णय नाही. त्या पद्धतीने वितरीतही केले जात नाही. त्यामुळे आधीच अर्धमेल्यासाठी अवस्था झालेल्यांची रॉकेलसाठी वणवण करावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी तरी जादा कोटा द्यावा, अशी मागणी होत आहे. काहीवेळा माणुसकीही हरतेकोणाच्या घरी दु:खद घटना घडल्यानंतर अख्खं गाव एकत्र येत असतं. अशावेळी रॉकेल विक्रेतेही हळवे होऊन अशा कुटुंबीयांना हवे तेवढे रॉकेल देऊन सहकार्य करत असतं. मात्र शासनाकडूनच अपुरा कोटा येत असल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक’ने रॉकेल घेण्याशिवाय मार्गच उरत नाही.जिल्ह्याच्या दुर्गम भागात गोचीमहाबळेश्वर, पाटण, कोयना, जावळीसह सातारा तालुक्यांतील परळी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अनेक गावात स्मशानभूमीला शेडही नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे अवघड होते. त्यामुळे या परिसरात तरी अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र रॉकेलचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.विद्युत दाहिनीचा अभावमोठ्या शहरात अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी असते; मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी विद्युत दाहिनी नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लाकडे, गोवरी, रॉकेल यांचाच आधार घ्यावा लागतो. पूर्वीपासूनच जास्त रॉकेलची मागणी केली जात आहे; मात्र शासनाकडूनच कमी रॉकेल येत असून, दर महिना ३१ टक्के रॉकेल पुरवठा होत असतो. मागणीच्या तुलनेत रॉकेलचा पुरवठा कमी येत आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या रॉकेलच्या कोट्यातून वाटप करावे लागते. हे वाटप करतााना कसरत करावी लागते.- शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी