शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

अंत्यसंस्कारासाठी चक्क ‘ब्लॅक’चं रॉकेल!

By admin | Updated: April 12, 2015 23:58 IST

परळी खोरे : माणूस गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून नातेवाइकांना करावी लागतेय शोधाशोध

विशाल गुजर -परळी -प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आजही कमी नाहीत, याची प्रचिती परळी खोऱ्यात येते. अंत्यसंस्कारासाठी मिळणारा रॉकेलचा कोटाही संपवला जात असल्याने नातेवाइकांना जवळचा माणूस गेल्याचे दु:ख बाजूला ठेवून ब्लॅकने कोठे रॉकेल मिळेल का, याचा शोधशोध करावी लागत आहे.‘जाताना सरणावर, इतुकेच मला कळले होते..., मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...! गझलकार सुरेश भट्ट यांच्या कवितेतील या ओळी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. सामान्यांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष मरणानंतरही चालूच असतो, हे दुर्दैव. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्यांना रॉकेलच्या भीषण टंचाईला नेहमीच सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या स्वयंपाकासाठी सोडाच; पण अनेकदा अंत्यसंस्कारासाठीही सहजासहजी रॉकेल मिळत नाही. अशावेळी काळ्या बाजारातून रॉकेल आणावे लागते. असाच धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी अनुभवास मिळाला. सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ग्रामीण डोंगराळ भागात गुरुवार, दि. ९ रोजी दुपारी घडला. राज्य शासनाने जानेवारी २०१५ पासून रॉकेल कपातीचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण व अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. शासन दरवेळी नवनवीन निर्णय घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून सलग दोन महिने रॉकेलच्या साठ्यात कपात केली होती. त्यानंतर ‘गुड न्यूज’ आली. मार्च-एप्रिलमध्ये कोट्यात आठ ते दहा टक्क्यांने वाढ करण्यात आली. मात्र, तरीही सर्वसामान्यांना पुरेसे रॉकेल मिळत नाही. अंत्यसंस्कारासाठी रॉकेलचा स्वतंत्र कोटा असावा, असा कोणताही निर्णय नाही. त्या पद्धतीने वितरीतही केले जात नाही. त्यामुळे आधीच अर्धमेल्यासाठी अवस्था झालेल्यांची रॉकेलसाठी वणवण करावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी तरी जादा कोटा द्यावा, अशी मागणी होत आहे. काहीवेळा माणुसकीही हरतेकोणाच्या घरी दु:खद घटना घडल्यानंतर अख्खं गाव एकत्र येत असतं. अशावेळी रॉकेल विक्रेतेही हळवे होऊन अशा कुटुंबीयांना हवे तेवढे रॉकेल देऊन सहकार्य करत असतं. मात्र शासनाकडूनच अपुरा कोटा येत असल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक’ने रॉकेल घेण्याशिवाय मार्गच उरत नाही.जिल्ह्याच्या दुर्गम भागात गोचीमहाबळेश्वर, पाटण, कोयना, जावळीसह सातारा तालुक्यांतील परळी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अनेक गावात स्मशानभूमीला शेडही नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे अवघड होते. त्यामुळे या परिसरात तरी अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र रॉकेलचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.विद्युत दाहिनीचा अभावमोठ्या शहरात अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी असते; मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी विद्युत दाहिनी नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लाकडे, गोवरी, रॉकेल यांचाच आधार घ्यावा लागतो. पूर्वीपासूनच जास्त रॉकेलची मागणी केली जात आहे; मात्र शासनाकडूनच कमी रॉकेल येत असून, दर महिना ३१ टक्के रॉकेल पुरवठा होत असतो. मागणीच्या तुलनेत रॉकेलचा पुरवठा कमी येत आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या रॉकेलच्या कोट्यातून वाटप करावे लागते. हे वाटप करतााना कसरत करावी लागते.- शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी