शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

‘स्वाभिमानी’ला भाजपच्या नऊ जागा

By admin | Updated: September 3, 2014 00:40 IST

शिक्कामोर्तब : शिवसेनेच्या कोट्यातील जागांबाबत सकारात्मक चर्चा

कोल्हापूर / मुंबई : महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील नऊ जागा देण्याचा निर्णय आज, मंगळवारी मुंबईत झालेल्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत झाला. त्या जागांवर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची सहमती झाली असून, मतदारसंघांच्या नावांचा बंद लखोटा खासदार राजू शेट्टी व भाजपच्या नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’ला दिली.शिवेसेनेबरोबर त्यांच्या कोट्यातील ११ जागांची स्वाभिमानीने मागणी केली असून, त्याचीही सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे खोत यांनी सांगितले. जागा वाटपावरून मुख्यत: शिवसेना व भाजपशी अन्य घटक पक्षांचा निर्माण झालेला तणाव निवळला असून, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेला महायुती एकसंधपणे सामोरी जाईल, असा विश्वासही खोत यांनी व्यक्त केला.आज भाजपच्या कार्यालयात दुपारी ही बैठक झाली. त्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, प्रवक्ते माधव भंडारी, आदी उपस्थित होते. त्यामध्ये भाजपबरोबरच्या जागांचा गुंता सोडविण्यात आला. स्वाभिमानीने कोणते मतदारसंघ लढवायचे याची यादी तयार करून ती लखोट्यात बंद करण्यात आली. जेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष आठवले गट व शिवसंग्राम पक्षाबरोबरची जागा वाटप अंतिम होईल त्यावेळी ‘मातोश्री’वरून त्याची घोषणा केली जाणार आहे. ८ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव आहे. शिवसेनेचे नेते त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे हा उत्सव झाल्यानंतर साधारणत: १२ सप्टेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही मातोश्रीवर जाऊन खोत यांनी भेट घेतली. यावेळी संपर्क नेते दिवाकर रावते उपस्थित होते. शिवसेनेचे घटक पक्षांबरोबर जागा वाटपावरून वाद सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातून लोकांत संभ्रम तयार होत असल्याने सगळ््या घटक पक्षांशी शिवसेनेने चर्चा सुरू करावी, अशी चर्चा झाली. त्यानुसार शिवसेना स्वाभिमानीला ११ जागा देण्यावर राजी झाली आहे. त्यातील एक-दोन जागांत अदलाबदल होऊ शकेल. खासदार शेट्टी व ठाकरे यांच्या चर्चेतून हा बदल होईल. तत्पूर्वी स्वाभिमानी संघटना शिवसेनेने दिलेल्या ११ जागांबाबत पक्षांतर्गत चर्चा करणार आहे.रिपब्लिकन पक्ष नाराजभाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर महायुतीमधील या पक्षाचे संपूर्ण समाधान झाले. मात्र त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते जागावाटपाबाबत असमाधानी असून त्या पक्षाने बुधवारी पत्रकार परिषद बोलावून आपली नाराजी प्रकट करण्याचा इशारा दिला आहे.