शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘कोल्हापूर पॅटर्न’

By admin | Updated: May 31, 2016 01:28 IST

इचलकरंजी --नगरपालिकां सार्वत्रिक निवडणुक

इचलकरंजी --आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘कोल्हापूर पॅटर्न’राजाराम पाटील -- इचलकरंजीनगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची चाहूल राजकीय पक्ष व आघाड्यांना लागली असून, इचलकरंजीत शहर विकास आघाडी व भाजप असा एकत्रितपणे ‘कोल्हापूर पॅटर्न’ लढण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस फुटण्याची चिन्हे दिसत असतानाच राष्ट्रीय कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पातळीवर मात्र ‘थांबा व पहा’ अशीच स्थिती आहे.सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत पालिकेच्या ५७ नगरसेवकांपैकी २९ राष्ट्रीय कॉँग्रेस, ११ राष्ट्रवादी कॉँग्रेस व १७ शहर विकास आघाडी अशी स्थिती आहे. आकड्यांचा विचार करता दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर असली तरी अलीकडील दीड वर्षात पालिकेतील राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. जानेवारी २०१५ मध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले आणि त्यांच्या या बंडाला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. परिणामी, दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीचे बहुमत; पण कामकाजावर वर्चस्व मात्र ‘शविआ’चे अशी विचित्र स्थिती इचलकरंजी नगरपालिकेची आहे.आगामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे दोन लाख ९२ हजार लोकसंख्या आहे. त्याप्रमाणे ३१ प्रभागांत ६२ नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये ३१ नगरसेवक व ३१ नगरसेविका असतील. त्यापैकी मागासवर्गीयांसाठी सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेविका, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेविका आणि सर्वसाधारण वर्गासाठी ३९ नगरसेवकांपैकी १९ नगरसेविका अशी आरक्षणे आहेत.राज्यातील ‘अ’ वर्गातील सर्वांत मोठी नगरपालिका इचलकरंजी असूनही गेल्या पाच वर्षांत नवीन वाढीव हद्दीतील भुयारी गटार योजनेची सुरुवात झाली. याशिवाय एकही भरीव विकासकाम नगरपालिकेच्या माध्यमातून झालेले नाही.बर्मन समितीप्रमाणे शहर स्वच्छतासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इचलकरंजी नगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी बर्मन समितीच्या अहवालाप्रमाणे कर्मचाऱ्यांना काम दिले. तर सर्व २५ प्रभागांत घंटागाडीचा ठेका दिला. यामुळे पूर्वी १६ प्रभागांत स्वच्छतेचा ठेका होता, तो आता फक्त नऊ प्रभागांत राबविला जात आहे. परिणामी, इचलकरंजी पालिकेची साडेचार कोटी रुपयांची बचत झाली. हा उपक्रम जिल्हास्तरावर आदर्शवत ठरला. इतकेच नव्हे तर नगरपालिका प्रशासन संचलनालयानेही याची दखल घेत प्रशंसा केली.