शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीच सत्ता

By admin | Updated: March 11, 2017 23:35 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा : फक्त औपचारिकता बाकी, संख्याबळ गाठले ४० पर्यंत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना, मित्रपक्ष आघाडीची सत्ता येईल, त्याबाबत घोषणाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केला. विविध राज्यांत भाजप सत्तेपर्यंत पोहोचल्याने त्याचा विजयोत्सव करण्यासाठी ते कोल्हापुरातील शिवाजी चौकात आले असता पत्रकारांशी बोलत होते.कोल्हापुरातील जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि. १४) अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे; पण शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने साऱ्यांची उत्सुकता ताणली आहे.याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भाजप-शिवसेनेचीच सत्ता स्थापन होण्यास काहीच हरकत नाही. याबाबत वरिष्ठ आणि स्थानिक पातळ्यांवरील नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षांची मने जुळली असल्याने जिल्हा परिषदेवर भाजप-सेनेचा झेंडा फडकण्यास काहीही अडचण नाही. सोमवारी अध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. सत्तेसाठी आवश्यक असणारा ३४ सदस्य संख्याबळाचा आकडा केव्हाच पार केला असून, तो ४० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबतची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे.विरोधकांच्या सत्तेच्या दाव्याबाबत पाटील म्हणाले, कोणताही विरोधक हा सत्तेसाठी प्रयत्न करणारच; त्याप्रमाणे कोल्हापुरात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विविध राज्यांतील निवडणूक निकालापूर्वीही विरोधकांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, असा दावा केला होता, तसाच दावा कोल्हापुरात सुरू असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)