शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा कोल्हापुरात जल्लोष,

By admin | Updated: March 11, 2017 16:16 IST

शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सव

भाजपचा कोल्हापुरात जल्लोष, शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सवकोल्हापूर : चार राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने यश मिळविल्याचे जाहीर होताच शनिवारी सकाळी कोल्हापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहला उधाण आले. येथील बिंदू चौक सबजेलजवळील भाजप कार्यालयात दूरचित्रवाहिनीवर निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्ते सकाळी लवकरच हजर होते. जसजसे निकाल जाहीर होत गेले, तसतसे कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात धाव घेतली, आणि ढोल ताशांच्या गजरात नृत्य करुन जल्लोष केला. यावेळी त्यांनी शहरवासियांना जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला. या जल्लोषात पालकमंत्री तथा महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटीलही सहभागी झाले. कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा या राज्यात भाजपची सत्ता येणार याची खात्री होती. त्यामुळे पक्ष कार्यालयात दूरचित्रवाहिनीसमोर बसलेल्या कार्यकर्त्यांना अपेक्षित निकाल सजमताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात निर्विवाद बहुमत मिळत असल्याचे पाहून सर्व कार्यकर्ते बिंदू चौक सबजेल येथील कार्यालयातून बाहेर पडले. हातात पक्षाचे ध्वज, गळ्यात स्कार्प आणि पक्षाची टोपी घातलेले कार्यकर्ते सकाळी साडे अकरा वाजता मध्यवर्ती शिवाजी चौकात पोहचले. ढोल ताशांचा गजर सुरु होताच कार्यकर्त्यांच्या या उत्साहाला अक्षरश: उधाण आले. कार्यकर्त्यांनी तालावर नृत्य करण्यास प्रारंभ केला. दरम्यान, महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तेथे पोहचताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी नृत्य करीत जल्लोष सुरु केला. त्यामध्ये गोकुळचे संचालक बाबा देसाई, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महापालिकेतील गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, संभाजी जाधव, विजय खाडे, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, गीता गुरव, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, माजी नगरसेविका प्रभा टिपुगडे, माणिक पाटील चुयेकर, सुरेश जरग, विजय जाधव, राहूल चिकोडे, अमोल पालोजी, अशोक देसाई, नजीर देसाई, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, वैशाली पसारे, भारती जोशी, आकुबाई जाधव आदी सहभागी झाले.