शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने गुंडांना सुधारण्याची शाळा काढली

By admin | Updated: February 19, 2017 00:12 IST

पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात : विकास आघाडीची जातीयवादी पक्षासोबत युती; गद्दारांना थारा देऊ नका

मलकापूर : भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. भुलथापा मारत सरकार अशक्य अशा केवळ घोषणाबाजी करत आहे. पैशाच्या हव्यासापोटी भाजपने धनसंपत्ती असणाऱ्या गुंडांना पक्षात घेऊन गुंडांना सुधारण्याची शाळाच काढली आहे, असा घणाघाती आरोप करून जातियवादी पक्षाबरोबर छुपी युती करून गेली पस्तीस वर्षे कऱ्हाड दक्षिणेत गद्दारी करणाऱ्या आघाडीला या निवडणूकीत थारा देऊ नका, असे मत माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.मुंढे, ता. कऱ्हाड येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, आनंदराव घोडके, अजित पाटील चिखलीकर, बंडानाना जगताप, राजेश पाटील-वाठारकर, इंद्रजीत चव्हाण, रामचंद्र पाटील उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, राज्य व केंद्रातील भाजप सरकारने विजय मल्ल्या, ललीत मोदीसारख्या अनेकांना सहकार्य करून एका अर्थाने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. नोटाबंदीमुळे देशातील ४० लाख लोक बेरोजगार झाले आहेत. या निर्णयामुळे काहीही साध्य झालेले नाही. या सरकारला आम्ही नियोजित केलेले प्रकल्प अद्याप पूर्ण करता आले नाहीत. शेती मालाला हमी भाव देता आलेला नाही. उलट धनदांडग्या उद्योगपतींचे ऊखळ पांढरे करण्याचा घाट घातला आहे. खोटे बोल पण रेटून बोल, हा मंत्र घेऊन मोदी म्हणजे हिटलरचे दुसरे रूप आहे. ही हुकूमशाहीकडे जाणारी पावले वेळीच थांबवा. गुलाल तिकडे चांगभले म्हणणारी मंडळी राजकारणाला कलंक आहेत. (वार्ताहर)थेट चचेर्साठी मोदींना आव्हान भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व त्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशातील जनतेला झालेला त्रास याबाबत मोदींनी माझ्याशी समोरासमोर चर्चा करावी. महाराष्ट्र व गुजरात राज्यपातळीवर चर्चा करण्यासाठी मोदींनी मुंबईत यावे किंवा मी अहमदाबादमध्ये येतो. त्यांनी माझ्याशी थेट चर्चा करावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींना दिले. चंद्रकांत पाटलांच्या गळाला मदनराव इतर पक्षातील पैसेवाल्यांना भाजपमध्ये घेऊन चंद्रकांत पाटलांनी त्यांची शेपटं कापण्याचेच काम केले आहे. आपल्यातून गेलेले काल मुख्यमंत्र्यांच्या व्यासपिठावर धरून आणल्यासारखे बसले होते. बाबांच्या मांडीलामांडी लावून बसणारे मदनराव चंद्रकांत पाटलांच्या गळाला लागले आहेत. जे जे पक्षाच्या विरोधात गेले त्यांचे वाटोळे झाले आहे, अशी कोपरखळी अजित पाटील-चिखलीकर यांनी मदनराव मोहीते यांना मारली.