शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची पदवीधरमधील मक्तेदारी मोडीत काढली : अरुण लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही आमची मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपची वाटचाल चालू होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही आमची मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपची वाटचाल चालू होती. पदवीधरांसाठी काहीही न करता त्यांना प्रत्येकवेळी गृहीत धरल्यामुळेच मतदारांनी जातीयवादी शक्तीला त्यांची जागा दाखविली, अशी टीका पदवीधरचे नूतन आमदार अरुण लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच हा मोठा विजय झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अरुण लाड म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आपण मतदारांना फार काळ फसवू शकत नाही, हा संदेशही या निवडणुकीत भाजपला मतदारांनी दिला आहे. बोगस घोषणांनाही जनता कंटाळल्याचे राज्यातील सर्वच जागांच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपचे नेते होते. त्यांना मतदार आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने जागा दाखविली. कुणी काहीही म्हणोत, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन मतदान करून घेतले. प्रत्येकाने विजय खेचून आणायचाच, या जिद्दीने काम केले. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावपातळीवरील कार्यकर्त्यालाही कामाला लावले. प्रचारात आणि मतदान नोंदणीपासून ते करून घेण्यापर्यंत चांगले नियोजन केले होते. म्हणूनच पहिल्या फेरीमध्येच मताधिक्य घेऊन विजय मिळवून प्रस्थापित भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का देण्याचे काम केले आहे. यापुढील प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे नियोजन असणार आहे. प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन अटळ असेल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.

-----------------------------------

फारकाळ जनतेला फसविता येत नाही

अरुण लाड म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत बोगस घोषणा केल्या आहेत. केंद्राच्या जाचक नियमांमुळे उद्योजक अडचणीत असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. हमीभाव कागदावरच असून, तो शेतकऱ्यांना कधीच मिळाला नाही. बेरोजगारी दिवसाला वाढत असून, भांडवलदार गलेलठ्ठ होत आहेत. सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. जनतेला फसवून फार काळ सत्ता मिळविता येत नाही, असा संदेशच पदवीधरच्या निवडणुकीतून मतदारांनी दिला आहे, अशी टीकाही लाड यांनी केली.