शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

भाजपची पदवीधरमधील मक्तेदारी मोडीत काढली : अरुण लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही आमची मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपची वाटचाल चालू होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही आमची मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपची वाटचाल चालू होती. पदवीधरांसाठी काहीही न करता त्यांना प्रत्येकवेळी गृहीत धरल्यामुळेच मतदारांनी जातीयवादी शक्तीला त्यांची जागा दाखविली, अशी टीका पदवीधरचे नूतन आमदार अरुण लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच हा मोठा विजय झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अरुण लाड म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आपण मतदारांना फार काळ फसवू शकत नाही, हा संदेशही या निवडणुकीत भाजपला मतदारांनी दिला आहे. बोगस घोषणांनाही जनता कंटाळल्याचे राज्यातील सर्वच जागांच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपचे नेते होते. त्यांना मतदार आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने जागा दाखविली. कुणी काहीही म्हणोत, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन मतदान करून घेतले. प्रत्येकाने विजय खेचून आणायचाच, या जिद्दीने काम केले. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावपातळीवरील कार्यकर्त्यालाही कामाला लावले. प्रचारात आणि मतदान नोंदणीपासून ते करून घेण्यापर्यंत चांगले नियोजन केले होते. म्हणूनच पहिल्या फेरीमध्येच मताधिक्य घेऊन विजय मिळवून प्रस्थापित भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का देण्याचे काम केले आहे. यापुढील प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे नियोजन असणार आहे. प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन अटळ असेल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.

-----------------------------------

फारकाळ जनतेला फसविता येत नाही

अरुण लाड म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत बोगस घोषणा केल्या आहेत. केंद्राच्या जाचक नियमांमुळे उद्योजक अडचणीत असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. हमीभाव कागदावरच असून, तो शेतकऱ्यांना कधीच मिळाला नाही. बेरोजगारी दिवसाला वाढत असून, भांडवलदार गलेलठ्ठ होत आहेत. सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. जनतेला फसवून फार काळ सत्ता मिळविता येत नाही, असा संदेशच पदवीधरच्या निवडणुकीतून मतदारांनी दिला आहे, अशी टीकाही लाड यांनी केली.