शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

जन्मदात्यांनी मुलांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: December 1, 2015 00:16 IST

कणकवलीतील घटना : तीनही मुले बालसुधारगृहात पाठविणार

कणकवली : पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडून आई-वडील पळून गेल्याचा प्रकार कणकवलीत झाला आहे. मोठा मुलगा चार दिवसांपूर्वी ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला, तर लहान भाऊ-बहिणीला आई सोमवारी पहाटे भालचंद्र आश्रमात सोडून निघून गेली. याप्रकरणी मुलांच्या मामाने पोलिसांत जबाब नोंदविला आहे. याबाबत वृत्त असे की, मालवण तालुक्यातील एका गावातील बाळकृष्ण आणि मनीषा या दोघांचा पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. त्यावेळी त्यांना गावातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तीन मुले झाली. अलीकडे पती-पत्नी तीन मुलांसह कणकवलीत राहत होते. बाळकृष्ण हा गवंडी काम करतो. त्याला मद्यपानाचे व्यसन आहे. मोठा मुलगा युवराज हा सातवीत शिकतो. धाकटी मुलगी संतोषी पाचवीत, तर लहान मुलगा ऋग्वेद दुसरीत येथील तीन नंबर शाळेत शिकत आहे. दरम्यान, २५ नोव्हेंबरला मोठा मुलगा युवराज हा ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला. त्याला काहींनी ओरोस पोलीस ठाण्यात नेऊन सोडले. त्याने माहिती दिल्यानुसार पोलिसांनी त्याला कणकवलीतील चुलत मामाकडे आणून सोडले. या मामाने आई-वडिलांचा शोध लागला नसल्याने त्याला ओरोस येथील बालसुधारगृहात दाखल केले. त्यातच रविवारी पहाटे ४.३० वाजता या मुलांच्या आईने लहान दोघांना भालचंद्र महाराज आश्रमात सोडले. त्यांच्याकडे कपड्यांची पिशवी दिली आणि ती निघून गेली. सकाळी परिसरातील नागरिकांनी चौकशी केली असता त्यांनी कणकवलीत राहणाऱ्या आपल्या चुलत मामाचे नाव सांगितले. तेव्हा त्याने दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. मुलांच्या सख्या मामाला बोलवून घेण्यात आले. त्याने याप्रकरणी जबाब नोंदवत आपण त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ असून, बालसुधारगृहात पाठवावे, असे पोलिसांना लिहून दिले. मुलांचे आई-वडील असे अचानक का सोडून गेले, याबद्दल नेमके कारण कळलेले नाही. (प्रतिनिध्सख्ख्या मामाला ओळखले नाहीकणकवलीत राहणाऱ्या चुलत मामाची मुलांशी ओळख होती, तर गेल्या पंधरा वर्षांत मुलांनी आणि मामाने एकमेकांना ओळखले नाही. गेले आठ दिवस मुलांनी आपण कसाल येथे गोसावी यांच्याकडे राहत होतो, अशी माहिती पोलिसांना दिली.