शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

जन्मदात्यांनी मुलांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: December 1, 2015 00:16 IST

कणकवलीतील घटना : तीनही मुले बालसुधारगृहात पाठविणार

कणकवली : पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडून आई-वडील पळून गेल्याचा प्रकार कणकवलीत झाला आहे. मोठा मुलगा चार दिवसांपूर्वी ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला, तर लहान भाऊ-बहिणीला आई सोमवारी पहाटे भालचंद्र आश्रमात सोडून निघून गेली. याप्रकरणी मुलांच्या मामाने पोलिसांत जबाब नोंदविला आहे. याबाबत वृत्त असे की, मालवण तालुक्यातील एका गावातील बाळकृष्ण आणि मनीषा या दोघांचा पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. त्यावेळी त्यांना गावातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तीन मुले झाली. अलीकडे पती-पत्नी तीन मुलांसह कणकवलीत राहत होते. बाळकृष्ण हा गवंडी काम करतो. त्याला मद्यपानाचे व्यसन आहे. मोठा मुलगा युवराज हा सातवीत शिकतो. धाकटी मुलगी संतोषी पाचवीत, तर लहान मुलगा ऋग्वेद दुसरीत येथील तीन नंबर शाळेत शिकत आहे. दरम्यान, २५ नोव्हेंबरला मोठा मुलगा युवराज हा ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला. त्याला काहींनी ओरोस पोलीस ठाण्यात नेऊन सोडले. त्याने माहिती दिल्यानुसार पोलिसांनी त्याला कणकवलीतील चुलत मामाकडे आणून सोडले. या मामाने आई-वडिलांचा शोध लागला नसल्याने त्याला ओरोस येथील बालसुधारगृहात दाखल केले. त्यातच रविवारी पहाटे ४.३० वाजता या मुलांच्या आईने लहान दोघांना भालचंद्र महाराज आश्रमात सोडले. त्यांच्याकडे कपड्यांची पिशवी दिली आणि ती निघून गेली. सकाळी परिसरातील नागरिकांनी चौकशी केली असता त्यांनी कणकवलीत राहणाऱ्या आपल्या चुलत मामाचे नाव सांगितले. तेव्हा त्याने दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. मुलांच्या सख्या मामाला बोलवून घेण्यात आले. त्याने याप्रकरणी जबाब नोंदवत आपण त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ असून, बालसुधारगृहात पाठवावे, असे पोलिसांना लिहून दिले. मुलांचे आई-वडील असे अचानक का सोडून गेले, याबद्दल नेमके कारण कळलेले नाही. (प्रतिनिध्सख्ख्या मामाला ओळखले नाहीकणकवलीत राहणाऱ्या चुलत मामाची मुलांशी ओळख होती, तर गेल्या पंधरा वर्षांत मुलांनी आणि मामाने एकमेकांना ओळखले नाही. गेले आठ दिवस मुलांनी आपण कसाल येथे गोसावी यांच्याकडे राहत होतो, अशी माहिती पोलिसांना दिली.