शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

जन्मदात्यांनी मुलांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: December 1, 2015 00:16 IST

कणकवलीतील घटना : तीनही मुले बालसुधारगृहात पाठविणार

कणकवली : पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडून आई-वडील पळून गेल्याचा प्रकार कणकवलीत झाला आहे. मोठा मुलगा चार दिवसांपूर्वी ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला, तर लहान भाऊ-बहिणीला आई सोमवारी पहाटे भालचंद्र आश्रमात सोडून निघून गेली. याप्रकरणी मुलांच्या मामाने पोलिसांत जबाब नोंदविला आहे. याबाबत वृत्त असे की, मालवण तालुक्यातील एका गावातील बाळकृष्ण आणि मनीषा या दोघांचा पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. त्यावेळी त्यांना गावातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तीन मुले झाली. अलीकडे पती-पत्नी तीन मुलांसह कणकवलीत राहत होते. बाळकृष्ण हा गवंडी काम करतो. त्याला मद्यपानाचे व्यसन आहे. मोठा मुलगा युवराज हा सातवीत शिकतो. धाकटी मुलगी संतोषी पाचवीत, तर लहान मुलगा ऋग्वेद दुसरीत येथील तीन नंबर शाळेत शिकत आहे. दरम्यान, २५ नोव्हेंबरला मोठा मुलगा युवराज हा ओरोस येथे रेल्वेट्रॅकवर फिरताना आढळला. त्याला काहींनी ओरोस पोलीस ठाण्यात नेऊन सोडले. त्याने माहिती दिल्यानुसार पोलिसांनी त्याला कणकवलीतील चुलत मामाकडे आणून सोडले. या मामाने आई-वडिलांचा शोध लागला नसल्याने त्याला ओरोस येथील बालसुधारगृहात दाखल केले. त्यातच रविवारी पहाटे ४.३० वाजता या मुलांच्या आईने लहान दोघांना भालचंद्र महाराज आश्रमात सोडले. त्यांच्याकडे कपड्यांची पिशवी दिली आणि ती निघून गेली. सकाळी परिसरातील नागरिकांनी चौकशी केली असता त्यांनी कणकवलीत राहणाऱ्या आपल्या चुलत मामाचे नाव सांगितले. तेव्हा त्याने दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. मुलांच्या सख्या मामाला बोलवून घेण्यात आले. त्याने याप्रकरणी जबाब नोंदवत आपण त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ असून, बालसुधारगृहात पाठवावे, असे पोलिसांना लिहून दिले. मुलांचे आई-वडील असे अचानक का सोडून गेले, याबद्दल नेमके कारण कळलेले नाही. (प्रतिनिध्सख्ख्या मामाला ओळखले नाहीकणकवलीत राहणाऱ्या चुलत मामाची मुलांशी ओळख होती, तर गेल्या पंधरा वर्षांत मुलांनी आणि मामाने एकमेकांना ओळखले नाही. गेले आठ दिवस मुलांनी आपण कसाल येथे गोसावी यांच्याकडे राहत होतो, अशी माहिती पोलिसांना दिली.