शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कचऱ्याच्या समस्येचे मोठे आव्हान

By admin | Updated: June 11, 2015 00:37 IST

कसई दोडामार्ग : स्वत:च्या घरापासूनच स्वच्छता करण्याची गरज--नगरपंचायतीला सामोरे जाताना

वैभव साळकर- दोडामार्ग  -कसई दोडामार्ग शहरासाठी कचऱ्याची समस्या नेहमीच मोठी डोकेदुखी ठरली आहे. शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच लोकसंख्या वाढली आणि त्यानंतर कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले. वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नावर उपाययोजना आखण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु या प्रयत्नांमध्ये सातत्याचा अभाव राहिल्याने शहरासाठी कचरा समस्या दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे. आता तर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्याने हा प्रश्न आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगर पंचायतीवर नव्याने निवडून येणाऱ्या नगर सेवकांसमोर दोडामार्गमधील कचऱ्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान उभे असणार आहे. २६ जून १९९९ रोजी अखंड असलेल्या सावंतवाडी तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र अशा दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. पुढे दुसऱ्या दिवशी २७ जूनला त्यांच्याच हस्ते रितसर दोडामार्ग तालुक्याच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून कसई दोडामार्ग गावाची निवड करण्यात आली. हळूहळू या गावात सर्वांच्याच प्रयत्नांनी विविध शासकीय कार्यालये आली. कर्मचारी वर्ग वाढला. परिणामत: लोकवस्ती देखील हळूहळू वाढू लागली. त्यामुळे गाव ही संकल्पना बाजूला सारून कसई दोडामार्गची वाटचाल शहराकरणाच्या दिशेने होऊ लागली. गेल्या पंधरा वर्षात शहराचा विस्तार बराच वाढला आणि लोकसंख्याही वाढली. परिणामी शहरात कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढले. दोडामार्ग बाजारपेठेचा विस्तार झाल्याने हॉटेल व्यवसाय आले. भाजीविक्रेते, मासे विक्रेत्यांची आणि इतर दुकानदारांची संख्या वाढली आणि हळूहळू कचऱ्याची समस्या आ-वासून पुढे आली. गेल्या दहा वर्षात शहरात वाढत चाललेली कचऱ्याची समस्या सद्यस्थितीचा विचार करता भविष्यात जटील रूप धारण करण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील भाजी विक्रेते, दुकानदार आदींसाठी कचऱ्याच्याबाबतीत कडक आचारसंहिता घालून न दिल्याने किंवा त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी न झाल्याने कचरा समस्या उग्र रूप धारण करू पाहत आहे. बाजारपेठेतील दुकानदार, भाजीविक्रेते आणि काही अंशी नागरिकांना देखील वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकण्याची सवय स्वत:च्या अंगी लावून घेतली आहे. हा प्रकार पुढे असाच सुरू राहिल्यास शहराला भकास रूप प्राप्त होईल. आतापर्यंत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा निर्मूलनासाठी अनेक उपाययोजना आखल्या. घराघरात छोट्या-छोट्या कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या कचराकुंड्या उभारण्यात आल्या. मात्र, या उपाययोजनांमध्ये पुढे सातत्य राहिले नाही. जे भाजी विक्रेते वाटेल त्या ठिकाणी कचरा आणून टाकायचे. त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारण्यात आला. काही काळ कारवाईच्या भीतीपोटी एका विशिष्ट ठिकाणी कचरा गोळा करून ठेवला जात होता. ग्रामपंचायतीचा कर्मचारी तो तेथून नेऊन टाकायचा. मात्र, त्यानंतर कारवाई थंडावल्याने पुन्हा पूर्वीसारखाच प्रकार सुरू आहे. कचरा वाटेल तिथे टाकला जात असल्याने शहरात काही ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणच्या सार्वजनिक कचराकुंड्या सध्या गायब आहेत. त्यामुळे कचरा नेऊन टाकावा तरी कोठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (उद्याच्या अंकात - वाहतुकीची कोंडी ठरते विकासातील अडसर)पोल्ट्री व्यावसायिकांना हवी आचारसंहिताशहरात चिकन सेंटर मोठ्या प्रमाणात आहेत. या चिकनसेंटरमधील कचरा आणून संबंधित व्यावसायिक भेडशी रस्त्यालगत आणून टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. यातून रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने अशा व्यावसायिकांना आचारसंहिता घालून देण्याची जबाबदारी निवडून येणाऱ्या नगरसेवकांवर राहणार आहे. स्वतंत्र कचरा डेपोची गरजदोडामार्ग शहरात भेडसावणाऱ्या कचरा समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वप्रथम स्वतंत्र कचरा डेपोची व्यवस्था करणे अपरिहार्य आहे. मात्र, त्यासाठी वेगळी स्वतंत्र अशी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे कचरा डेपोसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्याचे आव्हान नगर पंचायतीत बसणाऱ्या नगरसेवकांसमोर असणार आहे. कचरा समस्या होतेय जटीलही आहेत कचरा समस्येची कारणेकचरा कुंड्यांचा अभाव असल्यामुळे कचरा अवास्तव टाकला जातो.उपाययोजनांमध्ये सातत्याची कमीव्यावसायिकांनी आचारसंहिता नाहीकचना निर्मूलनासंदर्भात जनजागृती नाहीकचरा गोळा करण्यासाठी लागणाऱ्या जागेची अनुपलब्धता...या आहेत उपाययोजनाकचऱ्याच्या निर्मूलन व व्यवस्थापनांतर्गत लोकांमध्ये जागृती करणेसार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या उपलब्ध करणेसातत्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणेभाजी, हॉटेल व चिकन विक्रेत्यांना आचारसंहिता घालून देणेकचरा डेपोसाठी ठिकठिकाणी जागा उपलब्ध करणेकसई दोडामार्ग होणार नगरपंचायत...तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतीना नगर पंचायतीत रुपांतरीत करण्याच्या तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची राज्यभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने कसई-दोडामार्ग ग्रामपंचायत ही आता नगरपंचायत म्हणून संबोधली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा कारभार गतिमान होणार असल्याने शहरवासीयांना नगर पंचायतीचे वेध लागले आहेत. नवी वार्डरचना, नवे नगरसेवक आदी विविध स्थित्यंतरे नव्याने निर्माण झालेल्या कसई दोडामार्ग नगर पंचायतीत होणार आहेत. आतापासूनच उमेदवारांची राजकीय पक्ष चाचपणी होत आहे. त्यामुळे अनेकजण भावी नगरसेवक म्हणून गुडघ्याला बाशिंक बांधून आले आहेत. मात्र, या नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना नगर पंचायतीत पाऊल ठेवताच अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या समस्यांचे, प्रश्नांचे निराकारण करण्याची जबाबदारी या नगरसेवकांवर राहणार आहे. काय आहेत या दोडामार्गच्या समस्या? कोणते प्रश्न इथल्या लोकांना नेहमी भेडसावताहेत? याचा वेध घेण्याचा प्रयत्न लोकमतच्या माध्यमातून नगर पंचायतीला सामोरे जाताना या वृत्त मालिकेतून आजपासून केला जातो आहे.