शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

‘बिद्री’तील विजयही आत्मचिंतन करायला लावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:04 IST

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ...

ठळक मुद्देविधानसभेसाठी आबिटकरांचा आत्मविश्वास दुणावला वाढीव सभासदांनी ‘के. पी.’ना तारले

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ठरला. विधानसभेची समीकरणे वेगळी असल्याने के. पी. पाटील यांना भक्कम बांधणी करून सामोरे जावे लागणार आहे.

‘बिद्री’साखर कारखाना राधानगरी-भुदरगड व कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथील सत्तेवर विधासभेला ताकद मिळत असल्याने कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू असते. सत्तेसाठी पक्षीय झालर बाजूला सारून आजवर आघाड्या झाल्याचे आपण पाहतो.

राज्यात ‘भाजपत’ची सत्ता आल्यानंतर राज्य सरकारबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सर्वप्रथम चौफेर टीका करून कोंडीत पकडण्याचे काम ‘राष्टÑवादी’चे आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ऊस दराच्या प्रश्नावरून या दोन्ही नेत्यांमधील टीकाटीप्पणी टोकाला पोहोचली होती.

मंत्री पाटील यांनी तर ‘राष्टÑवादी’ नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’ अशा शब्दांत हिणवले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येतील, याची शक्यताही नव्हती. मागील निवडणुकीत मतदान करू न शकलेले सुमारे पाच हजार व त्यानंतर वाढीव ४७०० मतदानांमुळे राष्टÑवादी स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाईल, अशी परिस्थिती होती.

‘बिद्री’कारखान्याचा विचार करायचा झाल्यास मूळ ‘भाजप’ची कारखाना कार्यक्षेत्रात फारशी ताकद नव्हती; पण ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील, विठ्ठलराव खोराटे ही मंडळी ‘भाजप’सोबत राहिल्याने त्यांचा दबाव गट तयार झाला. या मंडळींची ताकद पाहूनच के. पी. पाटील यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आणि आघाडी झाली.

दिनकरराव जाधव, प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक यांनी निवडणुकीची तयारी केली होती; पण ताकदवान उमेदवारांचा शोध त्यांना शेवटपर्यंत राहिला. ऐनवेळी राष्टÑवादीतून आलेल्या चौघांना उमेदवारी देत पॅनेलमध्ये समतोल साधला. शेवटच्या टप्प्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेला आक्रमक प्रचार, थेट चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ यांना केलेल्या टार्गेटमुळे विरोधी पॅनेलला मानसिक ताकद मिळालीच; पण त्याबरोबर कार्यकर्ते त्वेषाने कामाला लागले. त्याचा परिणामही निवडणुकीत दिसला.

चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, बजरंग देसाई, समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, आदी मातब्बर मंडळी एका बाजूला असताना आमदार आबिटकर यांनी जुन्या-नव्या लोकांना सोबत घेत पॅनेलची बांधणी केली. आबिटकर यांच्या पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मजल के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकरांचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभेच्यादृष्टीने त्यांचा आत्मविश्वास दुणावणार हे मात्र निश्चित आहे. या उलट के. पी. पाटील यांना हा विजय संयमाने पचवावा लागणार आहे. विधानसभेवेळी समीकरणे बदलणार आहेत. ‘बिद्री’सोबत असणाºया मंडळींची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांची वजाबाकी करूनच सावधगिरीने बांधणी करावी लागणार आहे.एक हजारापर्यंत मताधिक्यात घटमागील निवडणुकीतील मतदानास पात्र नसलेले पाच हजार व नवीन ४७०० असे ९७०० वाढीव मतदार, त्यात के. पी. पाटील यांनी ११ वर्षांत केलेला करभाराचा अभ्यास करता राष्टÑवादी-भाजपचे पॅनेल किमान आठ हजारांच्या मताधिक्याने विजयी होणे अपेक्षित होते. उत्पादक गटातील चार ठिकाणी सरासरी ३३००, तर गट क्रमांक १ व ६ मध्ये ते एक हजारांवर मताधिक्य खाली आहे.