शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

‘बिद्री’तील विजयही आत्मचिंतन करायला लावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:04 IST

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ...

ठळक मुद्देविधानसभेसाठी आबिटकरांचा आत्मविश्वास दुणावला वाढीव सभासदांनी ‘के. पी.’ना तारले

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ठरला. विधानसभेची समीकरणे वेगळी असल्याने के. पी. पाटील यांना भक्कम बांधणी करून सामोरे जावे लागणार आहे.

‘बिद्री’साखर कारखाना राधानगरी-भुदरगड व कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथील सत्तेवर विधासभेला ताकद मिळत असल्याने कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू असते. सत्तेसाठी पक्षीय झालर बाजूला सारून आजवर आघाड्या झाल्याचे आपण पाहतो.

राज्यात ‘भाजपत’ची सत्ता आल्यानंतर राज्य सरकारबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सर्वप्रथम चौफेर टीका करून कोंडीत पकडण्याचे काम ‘राष्टÑवादी’चे आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ऊस दराच्या प्रश्नावरून या दोन्ही नेत्यांमधील टीकाटीप्पणी टोकाला पोहोचली होती.

मंत्री पाटील यांनी तर ‘राष्टÑवादी’ नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’ अशा शब्दांत हिणवले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येतील, याची शक्यताही नव्हती. मागील निवडणुकीत मतदान करू न शकलेले सुमारे पाच हजार व त्यानंतर वाढीव ४७०० मतदानांमुळे राष्टÑवादी स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाईल, अशी परिस्थिती होती.

‘बिद्री’कारखान्याचा विचार करायचा झाल्यास मूळ ‘भाजप’ची कारखाना कार्यक्षेत्रात फारशी ताकद नव्हती; पण ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील, विठ्ठलराव खोराटे ही मंडळी ‘भाजप’सोबत राहिल्याने त्यांचा दबाव गट तयार झाला. या मंडळींची ताकद पाहूनच के. पी. पाटील यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आणि आघाडी झाली.

दिनकरराव जाधव, प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक यांनी निवडणुकीची तयारी केली होती; पण ताकदवान उमेदवारांचा शोध त्यांना शेवटपर्यंत राहिला. ऐनवेळी राष्टÑवादीतून आलेल्या चौघांना उमेदवारी देत पॅनेलमध्ये समतोल साधला. शेवटच्या टप्प्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेला आक्रमक प्रचार, थेट चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ यांना केलेल्या टार्गेटमुळे विरोधी पॅनेलला मानसिक ताकद मिळालीच; पण त्याबरोबर कार्यकर्ते त्वेषाने कामाला लागले. त्याचा परिणामही निवडणुकीत दिसला.

चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, बजरंग देसाई, समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, आदी मातब्बर मंडळी एका बाजूला असताना आमदार आबिटकर यांनी जुन्या-नव्या लोकांना सोबत घेत पॅनेलची बांधणी केली. आबिटकर यांच्या पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मजल के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकरांचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभेच्यादृष्टीने त्यांचा आत्मविश्वास दुणावणार हे मात्र निश्चित आहे. या उलट के. पी. पाटील यांना हा विजय संयमाने पचवावा लागणार आहे. विधानसभेवेळी समीकरणे बदलणार आहेत. ‘बिद्री’सोबत असणाºया मंडळींची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांची वजाबाकी करूनच सावधगिरीने बांधणी करावी लागणार आहे.एक हजारापर्यंत मताधिक्यात घटमागील निवडणुकीतील मतदानास पात्र नसलेले पाच हजार व नवीन ४७०० असे ९७०० वाढीव मतदार, त्यात के. पी. पाटील यांनी ११ वर्षांत केलेला करभाराचा अभ्यास करता राष्टÑवादी-भाजपचे पॅनेल किमान आठ हजारांच्या मताधिक्याने विजयी होणे अपेक्षित होते. उत्पादक गटातील चार ठिकाणी सरासरी ३३००, तर गट क्रमांक १ व ६ मध्ये ते एक हजारांवर मताधिक्य खाली आहे.