शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

‘बिद्री’तील विजयही आत्मचिंतन करायला लावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:04 IST

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ...

ठळक मुद्देविधानसभेसाठी आबिटकरांचा आत्मविश्वास दुणावला वाढीव सभासदांनी ‘के. पी.’ना तारले

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ठरला. विधानसभेची समीकरणे वेगळी असल्याने के. पी. पाटील यांना भक्कम बांधणी करून सामोरे जावे लागणार आहे.

‘बिद्री’साखर कारखाना राधानगरी-भुदरगड व कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथील सत्तेवर विधासभेला ताकद मिळत असल्याने कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू असते. सत्तेसाठी पक्षीय झालर बाजूला सारून आजवर आघाड्या झाल्याचे आपण पाहतो.

राज्यात ‘भाजपत’ची सत्ता आल्यानंतर राज्य सरकारबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सर्वप्रथम चौफेर टीका करून कोंडीत पकडण्याचे काम ‘राष्टÑवादी’चे आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ऊस दराच्या प्रश्नावरून या दोन्ही नेत्यांमधील टीकाटीप्पणी टोकाला पोहोचली होती.

मंत्री पाटील यांनी तर ‘राष्टÑवादी’ नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’ अशा शब्दांत हिणवले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येतील, याची शक्यताही नव्हती. मागील निवडणुकीत मतदान करू न शकलेले सुमारे पाच हजार व त्यानंतर वाढीव ४७०० मतदानांमुळे राष्टÑवादी स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाईल, अशी परिस्थिती होती.

‘बिद्री’कारखान्याचा विचार करायचा झाल्यास मूळ ‘भाजप’ची कारखाना कार्यक्षेत्रात फारशी ताकद नव्हती; पण ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील, विठ्ठलराव खोराटे ही मंडळी ‘भाजप’सोबत राहिल्याने त्यांचा दबाव गट तयार झाला. या मंडळींची ताकद पाहूनच के. पी. पाटील यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आणि आघाडी झाली.

दिनकरराव जाधव, प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक यांनी निवडणुकीची तयारी केली होती; पण ताकदवान उमेदवारांचा शोध त्यांना शेवटपर्यंत राहिला. ऐनवेळी राष्टÑवादीतून आलेल्या चौघांना उमेदवारी देत पॅनेलमध्ये समतोल साधला. शेवटच्या टप्प्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेला आक्रमक प्रचार, थेट चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ यांना केलेल्या टार्गेटमुळे विरोधी पॅनेलला मानसिक ताकद मिळालीच; पण त्याबरोबर कार्यकर्ते त्वेषाने कामाला लागले. त्याचा परिणामही निवडणुकीत दिसला.

चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, बजरंग देसाई, समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, आदी मातब्बर मंडळी एका बाजूला असताना आमदार आबिटकर यांनी जुन्या-नव्या लोकांना सोबत घेत पॅनेलची बांधणी केली. आबिटकर यांच्या पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मजल के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकरांचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभेच्यादृष्टीने त्यांचा आत्मविश्वास दुणावणार हे मात्र निश्चित आहे. या उलट के. पी. पाटील यांना हा विजय संयमाने पचवावा लागणार आहे. विधानसभेवेळी समीकरणे बदलणार आहेत. ‘बिद्री’सोबत असणाºया मंडळींची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांची वजाबाकी करूनच सावधगिरीने बांधणी करावी लागणार आहे.एक हजारापर्यंत मताधिक्यात घटमागील निवडणुकीतील मतदानास पात्र नसलेले पाच हजार व नवीन ४७०० असे ९७०० वाढीव मतदार, त्यात के. पी. पाटील यांनी ११ वर्षांत केलेला करभाराचा अभ्यास करता राष्टÑवादी-भाजपचे पॅनेल किमान आठ हजारांच्या मताधिक्याने विजयी होणे अपेक्षित होते. उत्पादक गटातील चार ठिकाणी सरासरी ३३००, तर गट क्रमांक १ व ६ मध्ये ते एक हजारांवर मताधिक्य खाली आहे.