शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

‘बिद्री’तील विजयही आत्मचिंतन करायला लावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:04 IST

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ...

ठळक मुद्देविधानसभेसाठी आबिटकरांचा आत्मविश्वास दुणावला वाढीव सभासदांनी ‘के. पी.’ना तारले

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ठरला. विधानसभेची समीकरणे वेगळी असल्याने के. पी. पाटील यांना भक्कम बांधणी करून सामोरे जावे लागणार आहे.

‘बिद्री’साखर कारखाना राधानगरी-भुदरगड व कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथील सत्तेवर विधासभेला ताकद मिळत असल्याने कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू असते. सत्तेसाठी पक्षीय झालर बाजूला सारून आजवर आघाड्या झाल्याचे आपण पाहतो.

राज्यात ‘भाजपत’ची सत्ता आल्यानंतर राज्य सरकारबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सर्वप्रथम चौफेर टीका करून कोंडीत पकडण्याचे काम ‘राष्टÑवादी’चे आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ऊस दराच्या प्रश्नावरून या दोन्ही नेत्यांमधील टीकाटीप्पणी टोकाला पोहोचली होती.

मंत्री पाटील यांनी तर ‘राष्टÑवादी’ नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’ अशा शब्दांत हिणवले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येतील, याची शक्यताही नव्हती. मागील निवडणुकीत मतदान करू न शकलेले सुमारे पाच हजार व त्यानंतर वाढीव ४७०० मतदानांमुळे राष्टÑवादी स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाईल, अशी परिस्थिती होती.

‘बिद्री’कारखान्याचा विचार करायचा झाल्यास मूळ ‘भाजप’ची कारखाना कार्यक्षेत्रात फारशी ताकद नव्हती; पण ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील, विठ्ठलराव खोराटे ही मंडळी ‘भाजप’सोबत राहिल्याने त्यांचा दबाव गट तयार झाला. या मंडळींची ताकद पाहूनच के. पी. पाटील यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आणि आघाडी झाली.

दिनकरराव जाधव, प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक यांनी निवडणुकीची तयारी केली होती; पण ताकदवान उमेदवारांचा शोध त्यांना शेवटपर्यंत राहिला. ऐनवेळी राष्टÑवादीतून आलेल्या चौघांना उमेदवारी देत पॅनेलमध्ये समतोल साधला. शेवटच्या टप्प्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेला आक्रमक प्रचार, थेट चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ यांना केलेल्या टार्गेटमुळे विरोधी पॅनेलला मानसिक ताकद मिळालीच; पण त्याबरोबर कार्यकर्ते त्वेषाने कामाला लागले. त्याचा परिणामही निवडणुकीत दिसला.

चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, बजरंग देसाई, समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, आदी मातब्बर मंडळी एका बाजूला असताना आमदार आबिटकर यांनी जुन्या-नव्या लोकांना सोबत घेत पॅनेलची बांधणी केली. आबिटकर यांच्या पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मजल के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकरांचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभेच्यादृष्टीने त्यांचा आत्मविश्वास दुणावणार हे मात्र निश्चित आहे. या उलट के. पी. पाटील यांना हा विजय संयमाने पचवावा लागणार आहे. विधानसभेवेळी समीकरणे बदलणार आहेत. ‘बिद्री’सोबत असणाºया मंडळींची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांची वजाबाकी करूनच सावधगिरीने बांधणी करावी लागणार आहे.एक हजारापर्यंत मताधिक्यात घटमागील निवडणुकीतील मतदानास पात्र नसलेले पाच हजार व नवीन ४७०० असे ९७०० वाढीव मतदार, त्यात के. पी. पाटील यांनी ११ वर्षांत केलेला करभाराचा अभ्यास करता राष्टÑवादी-भाजपचे पॅनेल किमान आठ हजारांच्या मताधिक्याने विजयी होणे अपेक्षित होते. उत्पादक गटातील चार ठिकाणी सरासरी ३३००, तर गट क्रमांक १ व ६ मध्ये ते एक हजारांवर मताधिक्य खाली आहे.