शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

भोगावतीच्या सभासदांचा आमच्यावर दृढ विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:47 IST

भोगावती : परिते (ता.करवीर) येथील भोगावती साखर कारखाने १२.२५ साखर उतारा राखत पावणे पाच लाख टन गाळप पूर्ण केले. ...

भोगावती :

परिते (ता.करवीर) येथील भोगावती साखर कारखाने १२.२५ साखर उतारा राखत पावणे पाच लाख टन गाळप पूर्ण केले. हा सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. अशा परिस्थितीत कोणीही राजकारण न करता कारखान्याच्या हितासाठी संवाद साधून निर्णय घेऊ असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर आणि संचालक मंडळाने पत्रकार बैठकीत केले आहे.

कारखान्याची वार्षिक सभा येथे शनिवारी ऑनलाइन होत आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी या पद्धतीला विरोध दर्शवत सभासदांच्या उपस्थितीत सभा घ्यावी ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्याचा संचालक मंडळाने खुलासा केलेला आहे.

उपाध्यक्ष पाटील म्हणाले, सभासदांच्या उपस्थित ही सभा घेतली जावी यासाठी अध्यक्ष आ. पी. एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून प्रयत्न केला. मात्र शासनाच्या स्पष्ट आदेशामुळे ही सभा ऑनलाइन घेण्याबाबत सांगितले गेले आहे. सभा जरी ऑनलाइन होत असली तरी सभासदांना बोलण्याचा आणि प्रश्न उपस्थित करण्याचा दिलेला हक्क अबाधित राहणार आहे.

भोगावतीचा सभासद साखरेचा दर इतर कारखान्यांच्या तुलनेत बरोबर असून कारखान्याला अंदाजे वीस हजार सभासद ऊस न घालता सभासद साखरेचा लाभ घेत आहेत. याचा कारखान्याला आर्थिक फटका बसत आला आहे.याबाबत वारंवार चर्चा देखील झालेली होती.सध्या तोडणी मजुरांचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर गंभीर होऊ लागला आहे.म्हणून आम्ही जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यापूर्वीचे देणे असणारे २५० चे ऊस बिल आम्ही विसरलेलो नाही.

कारखान्याच्या परिसरात असणाऱ्या झाडांची मुळे ही लोक वस्तीतील घरांमध्ये शिरलेली होती. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणत वाढ झाली होती. त्यामुळे ती तोडावी लागली,असाही खुलासा केला आहे.

या पत्रकार बैठकीला माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, प्रा..ए.डी.चौगले, कृष्णराव किरूळकर, प्रा.सुनील खराडे,शिवाजी कारंडे,पांडुरंग पाटील,बी.आर.पाटील कार्यकारी संचालक के.एस.चौगले आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.