शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

‘भाबडा’ बंदोबस्त-

By admin | Updated: June 13, 2017 00:04 IST

सिटी टॉक

शासकीय खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण योजना, संकल्पना राबविण्याचा एक प्रघात आहे. प्रशासन गतिमान करणे, नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, त्यांच्या हिताचे रक्षण करणे, चांगली सुरक्षा देणे असे विविध हेतू त्यामागे असतात. काही ठिकाणी अशा संकल्पना यशस्वी होतात, तर काही ठिकाणी त्या अयशस्वी ठरल्याने अल्पजिवी ठरतात. प्रत्येक अडीच-तीन वर्षांनी अधिकारी येतात आणि अशा संकल्पना पुढे येतात. अधिकारी बदली होऊन गेला की मग त्या संकल्पना मागे पडतात किंवा बंद केल्या जातात. त्यामुळे ‘नवीन अधिकारी, नवीन संकल्पना’ हा प्रघातच पडलेला आहे. कोल्हापूरकरांनी असे प्रयोग यापूर्वी अनेकवेळा पाहिले आहेत. खरंतर एखाद्या अधिकाऱ्याने चांगली योजना सुरू केली असेल आणि त्यांचे चांगले परिणाम मिळत असतील तर पुढे येणाऱ्या अधिकाऱ्यानेही ती संकल्पा राबविली पाहिजे; पण दुर्दैवाने तसे होताना पाहायला मिळत नाही म्हणूनच चांगल्या योजनाही गुंडाळल्या जातात, हाही अनुभव आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या या अफलातून योजनांची आठवण यायचे आणि त्यावर चर्चा होण्याचे कारण म्हणजे सोमवारी पोलीस दलाने सुरू केलेला ‘सायकल बंदोबस्त’ही आणखी एक अफलातून योजना! पोलीस आता सायकलवरून बंदोबस्त करणार आहेत. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, चेन स्नॅचिंग, गुंडागर्दी, गर्दी, मारामारी अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नव्हती. कारण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा तसा दावा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात घरफोडीचे सत्र सुरू आहे. शेकडो बंद घरे चोरट्यांनी फोडली, लाखोंचा मुद्देमाल लुटला. आता तर चोरट्यांनी आपले कार्यक्षेत्र विस्तारत शेजारच्या खेडेगावांकडेही मोर्चा वळविला आहे. अजूनही चोऱ्या होतच आहेत. आपल्या घराला कुलूप लावून दोन-चार दिवस बाहेरगावी जायलाच काय तर बाजारात जायला सुद्धा लोक घाबरत आहेत. कारण दिवसाची वेळ सुद्धा चोरट्यांनी अचूकपणे साधलेली आहे. गेल्या दोन महिन्यांत इतक्या चोऱ्या झाल्या; पण एकाही चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. शहरात महापालिकेने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पोलिसांकडे गतीने पळणारी चारचाकी वाहने आहेत. मोटारसायकली आहेत. पोलिसांची दिवसाचीच नाही, तर रात्रीचीही गस्त सुरू आहे. तरीही चोर सापडत नाहीत. त्यामुळेच नवीन प्रयोग आशादायी वाटतो. बिचारे पोलीस सायकलवरून गेल्यावर तरी चोरटे सापडतील, अशी अपेक्षा आहे. महिलांच्या गळ्यातील गंठण किंवा सोन्याचे दागिने हिसकावल्यानंतर क्षणात ‘धूम स्टाईल’ने वेगाने निघून जाणारे चोरटे आपल्या पोलिसांना सायकलवरून पाठलाग करून पकडता येतील. तमाम कोल्हापूरकरांनीही तशा ‘बावळट’ आणि ‘भाबडी’ आशा बाळगायला काहीच हरकत नाही. आता सायकलवरून पोलीस गस्त घालणार असल्यामुळे नागरिकांनी आता खुश्शाल घरांना कुलूपं लावून चार-पाच दिवसांसाठी बाहेरगावी पर्यटनाला जावे. महिलांनी अंगावर दागिने घालून रस्त्यावरून बिनधास्त फिरावे. कारण आता घरफोड्या होणार नाहीत. दागिने हिसकावण्याचे प्रकार घडणार नाहीत. पोलीस रात्रं-दिवस बंदोबस्ताला असतील. ज्यांनी कोणी ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय घेतला त्यांचे कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या बुद्धिमत्तेलाही दाद द्यायला पाहिजे. सात पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सायकल बंदोबस्त योजनेत सहभागी पोलीस मित्रांना माझी एक विनंती आहे. आधीच तुमच्यावर कामाचा अतिरिक्त भार आहे. बंदोबस्ताचा ताण-तणाव आहे. वेळेवर खाणं होत नाही. रात्रीची झोप पूर्ण होत नाही. सणवाराच्या दिवशीच काय इतर दिवशीही सुट्या मिळत नाहीत. साप्ताहिक सुटीच्या दिवशीच कोणी तरी व्हीआयपी आले की झक मारत कामावर जावे लागते. त्यामुळे कोणाला बी. पी.चा त्रास असेल. कोणाला शुगरचा त्रास होत असेल. गुडघे दुखत असतील. वयोमानानुसार सायकल चालविता येत नसले, तर आधी तुमची स्वत:ची काळजी घ्या. सायकल काय हे साहेब आहेत, तोवर चालवायचीच आहे. - भारत चव्हाण