शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

इचलकरंजीकरांनो सावधान...अन्यथा पुन्हा होईल लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : तब्बल सव्वातीन महिने विविध प्रकारची दुकाने बंद असल्याने खरेदी व दुरुस्ती थांबली होती. वशिलेबाजीतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : तब्बल सव्वातीन महिने विविध प्रकारची दुकाने बंद असल्याने खरेदी व दुरुस्ती थांबली होती. वशिलेबाजीतून चोरी-छुपे पद्धतीने काहींची कामे झाली; परंतु रीतसर परवानगी मिळाल्याने कोरोना संपला की काय, अशा अविर्भावात अनेकजण खरेदीला बाहेर पडले. परंतु ही गर्दी अतिशय धोकादायक असून, यातून संसर्ग वाढल्यास पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू होईल, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम घालून दिले आहेत. त्यातील प्रमुख त्रिसूत्रीचा वापर केल्यास धोका टळू शकतो.

मोबाईलद्वारे प्रत्येक कॉलला सूचना दिली जाते. अत्यावश्यक काम असेल, तरच बाहेर पडा; अन्यथा घरातच सुरक्षित राहा. बाहेर पडल्यास मास्क व सोशल डिस्टन्सचा वापर करा. वेळोवेळी हात धुवा, या सूचनांचा अवलंब करणे दुकानदार व ग्राहक दोघांनाही अत्यावश्यक आहे.

व्यवसाय बंद आहे म्हणून आतताईपणा करत ग्राहकांची झुंबड अंगावर घेऊन पडण्यात शहाणपण नाही; अन्यथा केलेली मिळकत औषधोपचारात खर्ची पडू शकते. तसेच ग्राहकांनीही गर्दीचा अंदाज घेत सुरक्षितपणे आवश्यक असेल तीच खरेदी करणे गरजेचे आहे.

किरकोळ चुकीमुळे धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

चौकटी

नियमांची पायमल्ली

शहरातील अनेक दुकानांमध्ये सर्रास नियम पायदळी तुडविले जात होते. मास्क हनुवटीला, सोशल डिस्टन्सचा फज्जा, सॅनिटायझर नावालाच. त्यातून नियम सांगणारा एखादा आलाच, तर त्याला तीन महिन्याने आता दुकान उघडले आहे. थोडातरी धंदा करू द्या की, असे उलट उत्तरही दिले जात होते. नियम आपल्यासाठीच आहेत, याचा विसर पडल्याचे दिसून आले.

काहींची सहपरिवार गर्दी

काही नागरिकांनी धोकादायक परिस्थितीचा विचार न करता आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन सहपरिवार खरेदीचा आनंद लुटला. चप्पल दुकानातही रांग लावून खरेदी सुरू होती.

फोटो ओळी

१९०७२०२१-आयसीएच-०९

दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने मुख्य मार्गावर झालेली गर्दी.