शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

कोल्हापुरात लवकर खंडपीठ करा - संजय मंडलिक यांची संसदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:47 IST

कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या मागणीकरिता संसदेमध्ये व संसदेबाहेर आवाज उठविला असल्याचा उल्लेख करून केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिल्याचे मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.

ठळक मुद्देयासाठी निवेदन दिले असल्याचे सांगून पक्षकारांच्या सोईकरिता कमी वेळेत व कमी खर्चात न्याय या धोरणानुसार हे खंडपीठ व्हावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली आहे.

कोल्हापूर : मुंबई हायकोर्ट अंतर्गत सध्या ६५ हजारांच्या आसपास दावे प्रलंबित असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तेव्हा कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी संसदेत केली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांचे मुंबई हायकोर्टपर्यंतचे अंतर हे ६00 कि. मी. ते ७५0 कि. मी. इतके भरते. या जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका पक्षकारास मुंबई येथे जावयाचे झाल्यास एका तारखेकरिता एका व्यक्तीस सुमारे पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च होतो. हा खर्च सर्वसामान्य पक्षकारांना न परवडणारा असा असल्यामुळे कोल्हापूर येथे लवकरात लवकर खंडपीठ व्हावे, असे मंडलिक म्हणाले.कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या मागणीकरिता संसदेमध्ये व संसदेबाहेर आवाज उठविला असल्याचा उल्लेख करून केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिल्याचे मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच १९ जानेवारी २0१९ रोजी मुख्य न्यायमूर्तींकडे महाराष्ट्र शासनानेदेखील कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी निवेदन दिले असल्याचे सांगून पक्षकारांच्या सोईकरिता कमी वेळेत व कमी खर्चात न्याय या धोरणानुसार हे खंडपीठ व्हावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल