शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘खंडपीठ’ हाच केंद्रबिंदू

By admin | Updated: June 13, 2017 00:20 IST

बार असोसिएशन निवडणूक : उद्या मतदान, निकाल; २८ उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या २०१७-१८ या वर्षीच्या कार्यकारिणीसाठी अ‍ॅड. पीटर बारदेस्कर विरुद्ध अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये निवडणूक दुरंगी व चुरशीची होत आहे. एकूण १४ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात असून, उद्या, बुधवारी (दि. १४) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान व त्यानंतर मतमोजणी, निकाल जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी निवडणुकीततिरंगी लढत झाली होती, पण यंदा ही निवडणूक दुरंगी असल्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान होण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जॉर्इंट सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी, लोकल आॅडिटर यासह नऊ कार्यकारिणी सदस्य अशा १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महिला प्रतिनिधीपदी अ‍ॅड. शिंदे पॅनेलच्या आसावरी अभिजित कुलकर्णी यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. सुमारे १५६५ मतदार पात्र आहेत. दोन्हीही पॅनेलप्रमुखांनी ‘खंडपीठ’ हाच प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. कोल्हापूर शहरात सुमारे ४० तसेच जिल्ह्यात एकूण ८५ न्यायालये आहेत. या न्यायालयातील पात्र वकिलांना मतदानाचा अधिकार आहे. गेल्या चार दिवसांत शहरासह तालुकास्तरावरील न्यायालयात जाऊन दोन्ही पॅनेलप्रमुखांनी प्रचार केला आहे. आज, मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर उद्या, बुधवारी मतदानानंतर सायंकाळी त्वरित मतमोजणी होऊन रात्री निकाल जाहीर केला जाणार आहे.‘खंडपीठ’ आंदोलनाची दिशा बदलणार गेल्या वर्षी खंडपीठासाठी आंदोलन करून हाती काहीच लागले नाही. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांची मते आजमावून आंदोलनाची दिशा बदलण्याचा विचार सुरू असल्याचे मत अध्यक्षपदाचे उमेदवार व पॅनेलप्रमुख अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सर्किट बेंचचा प्रश्न सोडविण्यावर अधिक प्रमाणात भर देणार आहे. या आंदोलनापासून अनेक ज्येष्ठ वकील अलिप्त आहेत, त्यांनाही आंदोलनाच्या मुख्य प्रवाहात आणणार आहे. याशिवाय युवा वकिलासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.खंडपीठ लढाई रस्त्यावर आणणार नागरिकांच्या सहभागाने खंडपीठासाठी रस्त्यावर लढाई लढणार असून, त्यामध्ये सहा जिल्ह्यांतील वकिलांसह सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीचा सहभागवाढीसाठी भर देणार असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार व पॅनेलप्रमुख अ‍ॅड. पीटर बारदेस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. न्यायाधीश आणि वकील यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोन्हीही घटकांत समन्वय साधणारा कृतिबद्ध कार्यक्रम राबविणार आहे. अत्याधुनिक लायब्ररी, तज्ज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन शिबिरे भरवणार, तालुकास्तरीय बार सक्षमीकरणासाठी फर्निचर, पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.