शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाविसर्जन तिसऱ्या दिवशीच व्हाव

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

पंचगंगा घाटावर गर्दी : खेडी पुढे.. कोल्हापूर मागे; धार्मिक पगड्याचा परिणामे

संतोष पाटील - कोल्हापूर -पुरोगामी कोल्हापूरकरांनी आपल्या आप्तस्वकियांचा शेवटचा विधी शेणी-लाकडात पूर्ण व्हावा, अशी भूमिका घेत डिझेल दाहिनीकडे पाठ फिरविली आहे. ३७ बेडची क्षमता असलेल्या पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत रोज सरासरी १५ मृतदेह येतात. त्यातच मंगळवार, शुुक्रवार व शनिवार या दिवशी धार्मिक पगड्यामुळे शहरवासीय रक्षाविसर्जनाचा विधी करीत नाहीत.अनेकवेळा दोन बेडच्या मध्ये दहनविधी केला जातो. खेडोपाडी अमावास्या वगळता येणाऱ्या तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जनाचा विधी करत आहेत, त्याप्रमाणे शहरवासीयांनीही अमावास्या वगळून तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन विधी करण्याची गरज आहे. मानसिकता बदलून स्मशानभूमीतील गर्दी कमी करण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रक्षाविसर्जनानंतर रक्षाकुंडात रक्षा गोळा करुन ती उद्यानांना पुरविण्याचे पहिले पाऊल कोल्हापुरातच पडले. त्याशिवाय रक्षाविसर्जन, बाराव्याची प्रथा यासंबंधी अनेक चांगले पायंडे कोल्हापूरने पाडले आहेत. त्यामुळे रक्षाविसर्जनाला पुन्हा लोकांनी ‘मुहूर्त’ पाहू नये असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोणत्या दिवशी जन्म घ्यावा हे जसे कुणाच्या हातात नसते तसेच मृत्यू कोणत्या दिवशी यावा हेदेखील त्याच्या हातात नसते. त्यामुळे मृत्यूनंतर पुन्हा पंचांग, मुहूर्त, कोष्टक या गोष्टीतून आता बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरकर मंगळवार व शुक्रवार हा अंबाबाईचा वार, तर शनिवार हा हनुमानाचा दिवस म्हणून यादिवशी रक्षाविसर्जन करीत नाहीत. पंचगंगा स्मशानभूमीची ३७ बेडची क्षमता असून, रोज सरासरी १५, तर आॅगस्ट ते जानेवारी याकाळात रोज सरासरी २५ दहनविधी येथे होतात. मात्र, रक्षाविसर्जन विधी लांबल्याने स्मशानभूमीत गर्दी होते. काही वेळेला तिथे पाय ठेवायलाही जागा नसते. अनेकवेळा दोन बेडच्या मध्ये अडगळीत अंत्यविधी उरकला जातो. त्यामुळे कोल्हापूरकरांनी मानसिकतेत बदल करून निधनाच्या तिसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन करण्याची गरज आहे. जेणेकरून कोणासही आप्तस्वकियांचे अडगळीच्या जागेत दहन करावे लागणार नाही.प्रत्येक दिवस व वाराचे महत्त्व वेगळे आहे. धार्मिक विधी करण्यास कशाचीही आडकाठी नसते. गरज आहे ती फक्त परंपरेला प्रश्न विचारून स्वत: बदलण्याची. परंपरेवर आधारित चालत आलेल्या धार्मिक विधीला छेद देत विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारण्यास हरकत नाही. - रामदास पाटील(सत्यशोधक समाज अभ्यासक)डिझेल दाहिनीकडे पाठप्रत्येक दहनविधीसाठी ४०० ते ५०० शेणी व १२० किलो लाकडे महापालिका मोफत पुरविते. दरवर्षी शहरात साडेतीन ते चार हजार दहनविधी होतात. दरवर्षी पाचशे टन लाकू ड व पाच लाखांच्या शेणी खरेदी केल्या जातात. पंधरा लाख रुपये खर्च करूनही महापालिका दहनविधीसाठी कसलाही मोबदला आकारत नाही. दरम्यान, महापालिकेने परंपरेला छेद देत पर्यावरणपूरक डिझेल दाहिनीची २० वर्षांपूर्वी खरेदी केली. चार तासांत दहन पूर्ण होऊन किलो-सव्वा किलोचा हाडांचा चुरा नातेवाइकांना विधीसाठी मिळतो. पारंपरिक दहनविधीपेक्षा डिझेल किंवा विद्युत दाहिनीचा खर्च कमी आहे. होणारे प्रदूषणही ९५ टक्क्यांनी कमी होते. मात्र, आप्तस्वकियांच्या धार्मिक अंत्यविधीला फाटा देण्याची मानसिकता कोल्हापूरकरांनी कधी दाखविलीच नाही. पुढाकार कोण घेणार...आता एखाद्याचे निधन झाल्याचे वृत्त माध्यमांमुळे काही क्षणात सगळ््यांना समजते. त्यातही लांबच्या पाहुण्यांना समजण्यासाठी दुसरा दिवस असतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन करणे सोयीचेच असते. परंतु असा नवा पायंडा पाडायचा झाल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ किंवा तत्सम संस्था-संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महापालिकाही ठराव करून तसे सुचवू शकते. पण सगळ््यांच्या सहमतीनेच त्याबाबतचा निर्णय व्हायला हवा.कोल्हापूरकरांनी नेहमीच बदल स्वीकारला आहे. काळानुरूप बदलत रक्षाविसर्जनाबाबतही जागरूकता दाखविणे महत्त्वाचे आहे. तीन-चार दिवस रक्षाविसर्जन पुढे गेल्याने स्मशानभूमीत गर्दी होते. अमावास्या वगळता तिसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जनाची प्रथा शहरवासीयांनी अवलंबावी. -दीपक पोलादे (सामाजिक कार्यकर्ते)