शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रक्षाविसर्जन तिसऱ्या दिवशीच व्हाव

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

पंचगंगा घाटावर गर्दी : खेडी पुढे.. कोल्हापूर मागे; धार्मिक पगड्याचा परिणामे

संतोष पाटील - कोल्हापूर -पुरोगामी कोल्हापूरकरांनी आपल्या आप्तस्वकियांचा शेवटचा विधी शेणी-लाकडात पूर्ण व्हावा, अशी भूमिका घेत डिझेल दाहिनीकडे पाठ फिरविली आहे. ३७ बेडची क्षमता असलेल्या पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत रोज सरासरी १५ मृतदेह येतात. त्यातच मंगळवार, शुुक्रवार व शनिवार या दिवशी धार्मिक पगड्यामुळे शहरवासीय रक्षाविसर्जनाचा विधी करीत नाहीत.अनेकवेळा दोन बेडच्या मध्ये दहनविधी केला जातो. खेडोपाडी अमावास्या वगळता येणाऱ्या तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जनाचा विधी करत आहेत, त्याप्रमाणे शहरवासीयांनीही अमावास्या वगळून तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन विधी करण्याची गरज आहे. मानसिकता बदलून स्मशानभूमीतील गर्दी कमी करण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रक्षाविसर्जनानंतर रक्षाकुंडात रक्षा गोळा करुन ती उद्यानांना पुरविण्याचे पहिले पाऊल कोल्हापुरातच पडले. त्याशिवाय रक्षाविसर्जन, बाराव्याची प्रथा यासंबंधी अनेक चांगले पायंडे कोल्हापूरने पाडले आहेत. त्यामुळे रक्षाविसर्जनाला पुन्हा लोकांनी ‘मुहूर्त’ पाहू नये असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोणत्या दिवशी जन्म घ्यावा हे जसे कुणाच्या हातात नसते तसेच मृत्यू कोणत्या दिवशी यावा हेदेखील त्याच्या हातात नसते. त्यामुळे मृत्यूनंतर पुन्हा पंचांग, मुहूर्त, कोष्टक या गोष्टीतून आता बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरकर मंगळवार व शुक्रवार हा अंबाबाईचा वार, तर शनिवार हा हनुमानाचा दिवस म्हणून यादिवशी रक्षाविसर्जन करीत नाहीत. पंचगंगा स्मशानभूमीची ३७ बेडची क्षमता असून, रोज सरासरी १५, तर आॅगस्ट ते जानेवारी याकाळात रोज सरासरी २५ दहनविधी येथे होतात. मात्र, रक्षाविसर्जन विधी लांबल्याने स्मशानभूमीत गर्दी होते. काही वेळेला तिथे पाय ठेवायलाही जागा नसते. अनेकवेळा दोन बेडच्या मध्ये अडगळीत अंत्यविधी उरकला जातो. त्यामुळे कोल्हापूरकरांनी मानसिकतेत बदल करून निधनाच्या तिसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन करण्याची गरज आहे. जेणेकरून कोणासही आप्तस्वकियांचे अडगळीच्या जागेत दहन करावे लागणार नाही.प्रत्येक दिवस व वाराचे महत्त्व वेगळे आहे. धार्मिक विधी करण्यास कशाचीही आडकाठी नसते. गरज आहे ती फक्त परंपरेला प्रश्न विचारून स्वत: बदलण्याची. परंपरेवर आधारित चालत आलेल्या धार्मिक विधीला छेद देत विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारण्यास हरकत नाही. - रामदास पाटील(सत्यशोधक समाज अभ्यासक)डिझेल दाहिनीकडे पाठप्रत्येक दहनविधीसाठी ४०० ते ५०० शेणी व १२० किलो लाकडे महापालिका मोफत पुरविते. दरवर्षी शहरात साडेतीन ते चार हजार दहनविधी होतात. दरवर्षी पाचशे टन लाकू ड व पाच लाखांच्या शेणी खरेदी केल्या जातात. पंधरा लाख रुपये खर्च करूनही महापालिका दहनविधीसाठी कसलाही मोबदला आकारत नाही. दरम्यान, महापालिकेने परंपरेला छेद देत पर्यावरणपूरक डिझेल दाहिनीची २० वर्षांपूर्वी खरेदी केली. चार तासांत दहन पूर्ण होऊन किलो-सव्वा किलोचा हाडांचा चुरा नातेवाइकांना विधीसाठी मिळतो. पारंपरिक दहनविधीपेक्षा डिझेल किंवा विद्युत दाहिनीचा खर्च कमी आहे. होणारे प्रदूषणही ९५ टक्क्यांनी कमी होते. मात्र, आप्तस्वकियांच्या धार्मिक अंत्यविधीला फाटा देण्याची मानसिकता कोल्हापूरकरांनी कधी दाखविलीच नाही. पुढाकार कोण घेणार...आता एखाद्याचे निधन झाल्याचे वृत्त माध्यमांमुळे काही क्षणात सगळ््यांना समजते. त्यातही लांबच्या पाहुण्यांना समजण्यासाठी दुसरा दिवस असतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन करणे सोयीचेच असते. परंतु असा नवा पायंडा पाडायचा झाल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ किंवा तत्सम संस्था-संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महापालिकाही ठराव करून तसे सुचवू शकते. पण सगळ््यांच्या सहमतीनेच त्याबाबतचा निर्णय व्हायला हवा.कोल्हापूरकरांनी नेहमीच बदल स्वीकारला आहे. काळानुरूप बदलत रक्षाविसर्जनाबाबतही जागरूकता दाखविणे महत्त्वाचे आहे. तीन-चार दिवस रक्षाविसर्जन पुढे गेल्याने स्मशानभूमीत गर्दी होते. अमावास्या वगळता तिसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जनाची प्रथा शहरवासीयांनी अवलंबावी. -दीपक पोलादे (सामाजिक कार्यकर्ते)