शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मा’मुळे केळी शेतातून थेट घरात

By admin | Updated: December 29, 2015 00:44 IST

नेजच्या शेतकऱ्यांचा पुढाकार : के ळी उत्पादक, ग्राहकांना होतोय फायदा

राज्य शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या प्रोत्साहनामुळे हातकणंगले तालुक्यातील शेतकरी व्यापाऱ्यांना केळी न देता स्वत:च विकून अधिक नफा कमवत आहेत. नेजच्या श्री शिवशक्ती शेतकरी मंडळाच्या माध्यमातून इचलकरंजीसह पेठवडगाव, कुंभोज येथील बाजारात शेतकरी ते ग्राहक थेट केळी विक्री केंद्राद्वारे अवघ्या तेरा रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या केळीमुळे ग्राहकालाही फायदा होत आहे. केळी विक्रीच्या या प्रयत्नास ग्राहकांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे.वारणा नदीकाठावरील कुंभोज, नेज, हिंगणगाव या पट्ट्यात सुमारे ५५0 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. उसाला कंटाळलेला शेतकरी येथेही केळी दरातील चढ-उतारामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यास पर्याय शोधताना राज्य शासनाच्या ‘आत्मा’ योजनेचा आधार घेऊन नेज (ता. हातकणंगले) येथील संग्रामसिंह नाईक-निंबाळकर यांनी श्री शिवशक्ती शेतकरी मंडळाच्या छताखाली पन्नास केळी उत्पादक एकत्र आणले. या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी दरात केळी देण्यापेक्षा ती माफक दराने थेट ग्राहकांना विकण्याचा निर्णय घेतला.मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून शेतकऱ्यांनी इचलकरंजीत केळी विक्रीचा स्टॉल थाटला. येथील दोन स्टॉलवर मिळून प्रतिदिन एक टन केळीचा खप होत आहे, तर पाठोपाठ कुंभोज व पेठवडगाव येथे सुरू केलेल्या थेट केळी विक्रीला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे.केळीचा उत्पादन खर्च टनास चार हजार रुपयांपर्यंत होत असताना चालू हंगामात व्यापाऱ्यांकडून खरेदी दर मात्र टनास सरासरी पाच हजार रुपयांपर्यंत गडगडला. परिणामी प्राप्त परिस्थितीत केळी उत्पादनाकडे पाठ न फिरविता स्वत:च्या केळी बाजारात स्वत: विकून अपेक्षित उत्पन्न मिळविण्याचा संग्रामसिंह निंबाळकर, निंबराज निंबाळकर, निशांत कुंभार (नेज), महावीर पाटील, शीलकुमार पाटील, संभाजी मिसाळ (कुंभोज), अमर गुरव (चावरे), अमोल पाटील या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चंग बांधला आहे. या शेतकऱ्यांच्या धडपडीस हातकणंगलेचे कृषी अधिकारी व्ही. व्ही. देवकर, आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, तंत्र व्यवस्थापक संदीप देसाई, सहायक व्यवस्थापक धनश्री काटकर यांनी बळ दिले. व्यापारी वगळून होत असलेल्या शेतकरी ते ग्राहकांमधील व्यवहारात केळी उत्पादकास किलोमागे ७ रुपये जादा मिळू लागले आहेत. ग्राहकांनाही बाजारातून डझनावर मिळणाऱ्या केळीपेक्षा शेतकऱ्यांकडून किलोच्या दराने मिळणारी केळी उत्तम प्रतीची, नैसर्गिकपणे पिकविलेली, डझनाच्या हिशेबाने मात्र वजनाने ५ ने ७ रुपयांनी स्वस्त मिळत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही यातून बोध घेणे गरजेचे आहे.व्यापारी आमच्याकडून सरासरी साडेदहा रुपये किलोने केळी घेतात व डझनावर दुप्पटहून जादा दराने विकतात. यात आमची व ग्राहकांची लूट होते. केळी उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी आम्ही पुढाकार घेऊन केळीची थेट ‘आत्मा’च्या मदतीने विक्री सुरू केली आहे.- महावीर जिनगोंडा पाटील,केळी उत्पादक शेतकरी (कुंभोज)शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळवून देणे तसेच ग्राहकांचेही हित साधणे अशा दुहेरी हेतूने शासनाने सुरू केलेल्या ‘आत्मा’ योजनेद्वारे शेतकऱ्यांनी स्वावलंबी आपला शेतमाल आपणास विकण्यास पुढे यावे.- संदीप देसाई, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ‘आत्मा’ योजनावाढता उत्पादन खर्च व केळीस मिळणारा कमी भाव यामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात आले आहेत. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विक्री करण्याचा हक्काचा प्लॅटफॉर्म दिला आहे. यातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी.-व्ही. व्ही. देवकर, तालुका कृषी अधिकारी, हातक णंगलेदोघांनाही फायदाकेळीचा उत्पादन खर्च किलोमागे चार रुपये असताना सध्या केळीचा विक्री दर पाच रुपये आहे. यात उत्पादकांना किलोमागे एक रुपया मिळतो. मात्र, थेट ग्राहकांना केळी विकल्याने शेतकऱ्याला किलोमागे ३ ते ५ रुपये मिळत आहेत. दुसरीकडे ग्राहकाला थेट शेतकऱ्यांकडून एक डझन केळी किलोच्या प्रमाणात २0 रुपयाला मिळत आहेत. कारण एक डझन केळीचे वजन जादातर दीड किलो होते. शेतकऱ्यांकडून ७ ते ८ रुपयांत घेतलेली केळी व्यापारी ग्राहकांना १५ ते ३५ रुपयांना देतो.- अशोक खाडे, कुंभोज