शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान जाहीर केले आहे. शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान जाहीर केले आहे. शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून यामधील उत्कृष्ट कार्यालयांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. वर्षभरात तीन टप्प्यात हे अभियान राबवले जाणार आहे.

शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवसातील अधिकाधिक वेळ हा कार्यालयात जात असतो. त्यामुळे कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे जनतेला होत असतो. म्हणूनच शासनाची सर्व कार्यालये स्वच्छ, नीटनेटकी असावीत यासाठी हे अभियान जाहीर करण्यात आले आहे.

हे अभियान दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च, १ मे ते ३१ जुलै, १ सप्टेंबर ते ३० नोव्हेबर या तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. अभियानाचा पहिला टप्पा संपल्यानंतर एप्रिल महिन्यातच आढावा आणि पुढील टप्प्याचे नियोजन केले जावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. याच अभियानातील मूल्यमापनावेळी महसूल व वन विभागाच्या ‘महाराजस्व अभियान’ आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा ‘कायाकल्प पुरस्कार’ याचेही मूल्यमापन केले जाणार आहे.

या अभियानाची तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील पूर्वतयारी, अभियानाची विस्तृत रूपरेषा, अवलंब करावयाची कार्यपध्दत, विविध पुरस्कार निवड समित्या, मूल्यांकन पध्दती याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन महिन्यात विस्तृत अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करणार आहे.

चौकट

‘यशदा’कडून होणार दस्तऐवजीकरण

पुरस्कार प्राप्त कार्यालयांचे अनुकरण अन्य विभागात आणि कार्यालयांमध्ये करण्यासाठी पुरस्कार प्राप्त कार्यालयांचे दस्तऐवजीकरण ‘यशदा’मार्फत करण्यात येणार आहे. निवडक कार्यालयांचे अनुकरण राज्यातील अन्य कार्यालयांनी करावे यासाठी कार्यपध्दती सुनिश्चित करण्याची जबाबदारीही ‘यशदा’कडे दिली आहे.