शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

राज्यात ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान जाहीर केले आहे. शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान जाहीर केले आहे. शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून यामधील उत्कृष्ट कार्यालयांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. वर्षभरात तीन टप्प्यात हे अभियान राबवले जाणार आहे.

शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवसातील अधिकाधिक वेळ हा कार्यालयात जात असतो. त्यामुळे कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे जनतेला होत असतो. म्हणूनच शासनाची सर्व कार्यालये स्वच्छ, नीटनेटकी असावीत यासाठी हे अभियान जाहीर करण्यात आले आहे.

हे अभियान दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च, १ मे ते ३१ जुलै, १ सप्टेंबर ते ३० नोव्हेबर या तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. अभियानाचा पहिला टप्पा संपल्यानंतर एप्रिल महिन्यातच आढावा आणि पुढील टप्प्याचे नियोजन केले जावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. याच अभियानातील मूल्यमापनावेळी महसूल व वन विभागाच्या ‘महाराजस्व अभियान’ आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा ‘कायाकल्प पुरस्कार’ याचेही मूल्यमापन केले जाणार आहे.

या अभियानाची तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील पूर्वतयारी, अभियानाची विस्तृत रूपरेषा, अवलंब करावयाची कार्यपध्दत, विविध पुरस्कार निवड समित्या, मूल्यांकन पध्दती याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन महिन्यात विस्तृत अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करणार आहे.

चौकट

‘यशदा’कडून होणार दस्तऐवजीकरण

पुरस्कार प्राप्त कार्यालयांचे अनुकरण अन्य विभागात आणि कार्यालयांमध्ये करण्यासाठी पुरस्कार प्राप्त कार्यालयांचे दस्तऐवजीकरण ‘यशदा’मार्फत करण्यात येणार आहे. निवडक कार्यालयांचे अनुकरण राज्यातील अन्य कार्यालयांनी करावे यासाठी कार्यपध्दती सुनिश्चित करण्याची जबाबदारीही ‘यशदा’कडे दिली आहे.