शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

एफआरपीचे तुकडे पाडल्यास संघर्षाला तयार रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उसाच्या एफआरपीचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असून, ते कदापी खपवून घेणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उसाच्या एफआरपीचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असून, ते कदापी खपवून घेणार नाही. तुकडे पाडण्याचा कोणी प्रयत्न केला तर सरकारने संघर्षाला तयार रहावे, असा इशारा देत एकरकमी एफआरपी देऊन निती आयोगाच्या शिफारसीनुसार ‘आरएसएफ’ (रेव्हेन्यू शेअरिंग फाॅर्म्युला) प्रमाणे उसाला दर द्यावा, अशी मागणी जयशिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजीराव माने, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजीराव माने म्हणाले, निती आयोगाने ‘आरएसएफ‘ नुसार ७५ : २५ प्रमाणे उसाचा दर द्यावा व निव्वळ साखरेच्या उत्पन्नावर ८० : २० असावा, उसाचे बिल हप्त्याने ६० टक्के, २० टक्के व २० टक्के प्रमाणे द्यावे व साखरेची किमान आधारभूत किमंत ३३ रुपये किलो करावी, आदी आठ शिफारसी केंद्राकडे केल्या आहेत. केंद्राने यासाठी राज्यांच्या पातळीवर समिती नेमली आहे. सि. रंगराजन समितीच्या शिफारसीची २०१३ ला राज्य सरकारने ‘आरएसएफ’नुसार शेतकऱ्यांना दर देण्याचा निर्णय घेतला. साखर, उपपदार्थाचे उत्पन्न काढून त्यातील ७० टक्के उत्पन्न शेतकऱ्यांना तर, ३० टक्के कारखान्यांना द्यावा, असा निर्णय झाला. मात्र त्याची अंमलबजावणी कोणी करत नाही. कॉस्ट ऑडिटची मागणी करूनही एक कारखाना दप्तर देण्यास तयार नाही. या सगळ्यांना शेतकऱ्यांना लुटायचे असून यापुढे हे खपवून घेणार नाही.

धनाजी चुडमुंगे म्हणाले, एकरकमी एफआरपीने कारखान्यांवर बोजा पडतो. त्यामुळे कायद्या मोडण्याचे षडयंत्र कारखानदारांचे आहे. ऊस पाठवल्यानंतर ६० टक्के रकमेतून विकास संस्थांकडून काढलेल्या कर्जाचीही परतफेड होत नाही. त्यानंतरचे ४० टक्के दोन हप्त्यात मिळणार असल्याने शासनाच्या व्याज सवलतीचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला ‘आरएसएफ’प्रमाणे दर द्या, हिशेब बघायच्या अगोदर एफआरपी एक रकमी द्यावीच लागेल.

पंतप्रधानांना दहा हजार पत्रे पाठवणार

शुगर केन कंट्रोल ॲक्टमधील तरतुदीमध्ये बदल करू नका, या मागणीसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून दहा शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्रे पाठवणार असल्याचे बी. जी. पाटील यांनी सांगितले.