शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीला ‘पेयजल’चा आधार

By admin | Updated: June 4, 2015 00:04 IST

टंचाईने हैराण : पात्र कोरडे पडल्याने कृष्णेतून उपसा बंद; कूपनलिकांचाही आधार

इचलकरंजी : प्रदूषणामुळे पंचगंगा नदीतून उपसा बंद आणि कृष्णा नदीचे पात्र कोरडे अशा स्थितीत तीन लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहराला तीव्र पाणीटंचाई भासत असताना वस्त्रनगरीची तहान नऊ ठिकाणच्या शुद्ध पेयजल प्रकल्पांनी भागविली. तसेच नगरपालिकेच्या कूपनलिकांमुळेही नागरिकांना दिलासा मिळाला आहे.इचलकरंजी शहराची लोकसंख््या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत काही कारणाने बिघाड झाल्यास, नदीत पाणी नसल्याने, प्रदूषणामुळे पुरवठा बंद ठेवावा लागल्यास नागरिकांचे हाल होतात. सध्या त्याची प्रचिती येत आहे. पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने जानेवारी महिन्यापासूनच येथील पाणी उपसा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे तीन दिवसांनी एकदा मिळणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्यावरच शहरवासीयांना आपली तहान भागवावी लागत होती. २५ मेच्या दरम्यान पाटबंधारे खात्याकडून नदीच्या पात्रात असलेले कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्या. परिणामी कृष्णा नदीचे पात्रही कोरडे पडले. त्यामुळे गेले आठ-नऊ दिवस कृष्णा नळ पाणीयोजनेचा पाणीपुरवठाही ठप्प झाला.शहरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली; पण साधारणत: पाच वर्षांपूर्वी आवाडे जनता सहकारी बॅँक, इचलकरंजी सहकारी सूतगिरणी, नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी यांनी शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या नऊ प्रकल्पांनी सकाळपासून रात्रीपर्यंत अव्याहतपणे शुद्ध पाणी दिले. दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी मिळत असल्याने शहरवासीयांची तहान भागली. त्यामुळे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांतून नागरिकांना मुक्तता मिळाली. (प्रतिनिधी)