शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

वस्त्रनगरीला ‘पेयजल’चा आधार

By admin | Updated: June 4, 2015 00:04 IST

टंचाईने हैराण : पात्र कोरडे पडल्याने कृष्णेतून उपसा बंद; कूपनलिकांचाही आधार

इचलकरंजी : प्रदूषणामुळे पंचगंगा नदीतून उपसा बंद आणि कृष्णा नदीचे पात्र कोरडे अशा स्थितीत तीन लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहराला तीव्र पाणीटंचाई भासत असताना वस्त्रनगरीची तहान नऊ ठिकाणच्या शुद्ध पेयजल प्रकल्पांनी भागविली. तसेच नगरपालिकेच्या कूपनलिकांमुळेही नागरिकांना दिलासा मिळाला आहे.इचलकरंजी शहराची लोकसंख््या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत काही कारणाने बिघाड झाल्यास, नदीत पाणी नसल्याने, प्रदूषणामुळे पुरवठा बंद ठेवावा लागल्यास नागरिकांचे हाल होतात. सध्या त्याची प्रचिती येत आहे. पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने जानेवारी महिन्यापासूनच येथील पाणी उपसा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे तीन दिवसांनी एकदा मिळणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्यावरच शहरवासीयांना आपली तहान भागवावी लागत होती. २५ मेच्या दरम्यान पाटबंधारे खात्याकडून नदीच्या पात्रात असलेले कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्या. परिणामी कृष्णा नदीचे पात्रही कोरडे पडले. त्यामुळे गेले आठ-नऊ दिवस कृष्णा नळ पाणीयोजनेचा पाणीपुरवठाही ठप्प झाला.शहरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली; पण साधारणत: पाच वर्षांपूर्वी आवाडे जनता सहकारी बॅँक, इचलकरंजी सहकारी सूतगिरणी, नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी यांनी शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या नऊ प्रकल्पांनी सकाळपासून रात्रीपर्यंत अव्याहतपणे शुद्ध पाणी दिले. दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी मिळत असल्याने शहरवासीयांची तहान भागली. त्यामुळे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांतून नागरिकांना मुक्तता मिळाली. (प्रतिनिधी)