शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये चाव्यांना बसणार मीटर

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार

जहॉँगीर शेख - कागल -कागल नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील साडेसहा हजार चाव्यांना मीटर बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेमुळे पाण्याची आणि आर्थिक खर्चाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार आहे.तेराव्या वित्त आयोगातून मंजुरी मिळून ही रक्कमही नगरपालिकेकडे वर्ग झाली आहे. कागल शहराला पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. शहराची ३८ हजार लोकसंख्या आहे. सध्या रोज ८३ लाख लिटर पाणी दिले जाते. हे प्रमाण माणसी २०० लिटर भरते. शासन नियमाप्रमाणे माणसी ७० लिटर पाणी देणे क्रमप्राप्त आहे. या भरघोस पाणी उपलब्धतेमुळे पाणी वापरावरही नियंत्रण राहात नाही. ५० टक्के चाव्यांना तोटीच नाहीत. त्यामुळे एकदा पाणीपुरवठा सुरू झाला की संपेपर्यंत हे पाणी सुरू असते. अनेकांनी या नळाच्या पाण्यावर घराजवळ भाजीपाला पिकविला आहे. तर एक चावी कनेक्शन घेऊन त्याचा पाणीपुरवठा भाडेकरूंना करण्यासाठी काहींनी थेट मोटारी बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या वार्षिक पाणीपट्टी १३३० रुपये आहे. शासनाने ही पाणीपट्टी १६१२ प्रमाणे घ्यावी, असे आदेश दिलेले आहेत. नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे किती प्रमाणात पाणी वापरले, तितकेच बिल ग्राहकांना येणार असल्याने काटकसरीने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. तर अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना त्या प्रमाणात पालिकेकडे पैसे भरावे लागणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वी काही नगरपालिकांमध्ये हा प्रयोग झाला आहे. मात्र यातील मीटर स्वत: ग्राहकांनी बसविले आहे. नळांना मीटर बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा थेट निधी मंजूर होणारी कागल नगरपालिका जिल्ह्यात एकमेव आहे. आता याची अंमलबजावणी कशी होते? यावर या योजनेचे यश-अपयश अवलंबून आहे. उत्पन्न आणि खर्च....२०११-१२ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठा खर्च ८७ लाख, तर उत्पन्न केवळ ४० लाख रुपये असे चित्र होते. म्हणजे हा विभाग ५० लाख तोट्यात होता. २०१३-१४ मध्ये खर्च एक कोटी पाच लाख आणि उत्पन्न ९२ लाख रुपये अशी प्रगती या विभागाने केली आहे.