शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कागलमध्ये चाव्यांना बसणार मीटर

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार

जहॉँगीर शेख - कागल -कागल नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील साडेसहा हजार चाव्यांना मीटर बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेमुळे पाण्याची आणि आर्थिक खर्चाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार आहे.तेराव्या वित्त आयोगातून मंजुरी मिळून ही रक्कमही नगरपालिकेकडे वर्ग झाली आहे. कागल शहराला पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. शहराची ३८ हजार लोकसंख्या आहे. सध्या रोज ८३ लाख लिटर पाणी दिले जाते. हे प्रमाण माणसी २०० लिटर भरते. शासन नियमाप्रमाणे माणसी ७० लिटर पाणी देणे क्रमप्राप्त आहे. या भरघोस पाणी उपलब्धतेमुळे पाणी वापरावरही नियंत्रण राहात नाही. ५० टक्के चाव्यांना तोटीच नाहीत. त्यामुळे एकदा पाणीपुरवठा सुरू झाला की संपेपर्यंत हे पाणी सुरू असते. अनेकांनी या नळाच्या पाण्यावर घराजवळ भाजीपाला पिकविला आहे. तर एक चावी कनेक्शन घेऊन त्याचा पाणीपुरवठा भाडेकरूंना करण्यासाठी काहींनी थेट मोटारी बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या वार्षिक पाणीपट्टी १३३० रुपये आहे. शासनाने ही पाणीपट्टी १६१२ प्रमाणे घ्यावी, असे आदेश दिलेले आहेत. नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे किती प्रमाणात पाणी वापरले, तितकेच बिल ग्राहकांना येणार असल्याने काटकसरीने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. तर अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना त्या प्रमाणात पालिकेकडे पैसे भरावे लागणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वी काही नगरपालिकांमध्ये हा प्रयोग झाला आहे. मात्र यातील मीटर स्वत: ग्राहकांनी बसविले आहे. नळांना मीटर बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा थेट निधी मंजूर होणारी कागल नगरपालिका जिल्ह्यात एकमेव आहे. आता याची अंमलबजावणी कशी होते? यावर या योजनेचे यश-अपयश अवलंबून आहे. उत्पन्न आणि खर्च....२०११-१२ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठा खर्च ८७ लाख, तर उत्पन्न केवळ ४० लाख रुपये असे चित्र होते. म्हणजे हा विभाग ५० लाख तोट्यात होता. २०१३-१४ मध्ये खर्च एक कोटी पाच लाख आणि उत्पन्न ९२ लाख रुपये अशी प्रगती या विभागाने केली आहे.