शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

संवर्धन आणि पर्यटन यामध्ये समतोल राखला जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:22 IST

कोल्हापूर : जागतिक वारसा लाभलेल्या राधानगरी अभयारण्याचे संवर्धन आणि पर्यटन यामध्ये समतोल राखला जावा, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी ...

कोल्हापूर : जागतिक वारसा लाभलेल्या राधानगरी अभयारण्याचे संवर्धन आणि पर्यटन यामध्ये समतोल राखला जावा, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी केले. यावेळी त्यांनी नव्या लोगाेमुळे अभयारण्याची ओळख जगभरातील नागरिकांना होईल असेही मत व्यक्त केले.

राधानगरी अभयारण्याच्या नव्या लोगोच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, पुराभिलेख विभागाचे अभिलेखापाल गणेश खोडके, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, लोगो निर्मिती करणारे सुनील गरुड, इतिहास अभ्यासक राम यादव, ऋतुराज इंगळे, रविराज कदम उपस्थित होते.

प्रास्ताविकात विशाल माळी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज राखीव ठेवलेल्या दाजीपूर परिसरातील जंगलाचे १९५८ मध्ये राज्यातील पहिले अभयारण्य निर्माण करण्यात आले. त्याचा विस्तार करून १९८५मध्ये राधानगरी अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. जुन्या लोगोतील त्रुटी दूर करून कलाकार सुनील गरुड यांनी नवीन लोगो तयार केला असल्याची माहिती दिली.

---

असा आहे नवा लोगो

राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा, राधानगरी अभयारण्याचे वैशिष्ट्य असणारा गवा, अंजन, बिबट्या, राज्यप्राणी शेकरू, फुलपाखरू, पक्षी, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या दप्तरी इंग्रजी अक्षरामध्ये लिहिलेल्या अक्षरावरून राधानगरी हे शब्द इंग्रजीमध्ये तसेच मराठीमधील शब्दाचा समावेश आहे.

---

फोटो नं १९०३२०२१-कोल-राधानगरी लोगो

ओळ : राधानगरी येथे गुरुवारी राधानगरी अभयारण्याच्या नव्या लोगोचे अनावर शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशांत सातपुते, गणेश खोडके, विशाल माळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

---