शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

परिवर्तनाचा समतोल म्हणजे ‘राज्यघटना’

By admin | Updated: June 23, 2016 01:14 IST

हरी नरके यांचे प्रतिपादन : बाबासाहेबांनी भारतीय समाजाला नवा दृष्टिकोन दिला --राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय परंपरा, इतिहासाचा मागोवा घेत जे चांगलं असेल ते स्वीकारत परिवर्तनासह राज्यघटनेतून समतोल साधत भारतीय समाजाला नवा दृष्टिकोन दिला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले.राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार होते. यावेळी प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.डॉ. नरके म्हणाले, बाबासाहेबांनी मनासारखी राज्यघटना लिहिली, असे मानणे अज्ञानाचे आहे. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेबद्दल पुरेशी जागरूकता नाही, त्यामुळे अनेक अपरिचित पैलूंबद्दल गैरसमज आहेत. बाबासाहेब राज्यघटनेचे शिल्पकार असले तरी सर्वच गोष्टी त्यांना मनासारख्या आणता आल्या नाहीत, काही गोष्टी मनाविरुद्ध बहुमतामुळे आणाव्या लागल्या. घटना समितीच नको, ही बाबासाहेबांची भूमिका म्हणजे त्या समितीवर निवडून येणारी माणसे सामाजिक न्यायाची भूमिका घेतीलच, याची त्यांना शाश्वती नव्हती. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी अनेक मुद्द्यांवर एकमत होते, हे वास्तव चळवळीतले कार्यकर्ते, शिक्षक नव्या पिढीला सांगत नाहीत. राज्यघटनेची मूळ चौकट बदलणे शक्य नाही. ती जगातील सर्वांत बलशाली लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार म्हणाले, संशोधक वृत्तीने इतिहासाचा मागोवा घेत सत्याची मांडणी करीत राहिले पाहिजे. राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले.आजचे व्याख्यान :दुष्काळ निवारण आणि जलनीतीवक्ते : या. रा. जाधव, ज्येष्ठ निवृत्त इंजिनिअर, नांदेडवेळ : सायंकाळी पाच वाजता