शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

परिवर्तनाचा समतोल म्हणजे ‘राज्यघटना’

By admin | Updated: June 23, 2016 01:14 IST

हरी नरके यांचे प्रतिपादन : बाबासाहेबांनी भारतीय समाजाला नवा दृष्टिकोन दिला --राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय परंपरा, इतिहासाचा मागोवा घेत जे चांगलं असेल ते स्वीकारत परिवर्तनासह राज्यघटनेतून समतोल साधत भारतीय समाजाला नवा दृष्टिकोन दिला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले.राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार होते. यावेळी प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.डॉ. नरके म्हणाले, बाबासाहेबांनी मनासारखी राज्यघटना लिहिली, असे मानणे अज्ञानाचे आहे. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेबद्दल पुरेशी जागरूकता नाही, त्यामुळे अनेक अपरिचित पैलूंबद्दल गैरसमज आहेत. बाबासाहेब राज्यघटनेचे शिल्पकार असले तरी सर्वच गोष्टी त्यांना मनासारख्या आणता आल्या नाहीत, काही गोष्टी मनाविरुद्ध बहुमतामुळे आणाव्या लागल्या. घटना समितीच नको, ही बाबासाहेबांची भूमिका म्हणजे त्या समितीवर निवडून येणारी माणसे सामाजिक न्यायाची भूमिका घेतीलच, याची त्यांना शाश्वती नव्हती. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी अनेक मुद्द्यांवर एकमत होते, हे वास्तव चळवळीतले कार्यकर्ते, शिक्षक नव्या पिढीला सांगत नाहीत. राज्यघटनेची मूळ चौकट बदलणे शक्य नाही. ती जगातील सर्वांत बलशाली लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार म्हणाले, संशोधक वृत्तीने इतिहासाचा मागोवा घेत सत्याची मांडणी करीत राहिले पाहिजे. राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले.आजचे व्याख्यान :दुष्काळ निवारण आणि जलनीतीवक्ते : या. रा. जाधव, ज्येष्ठ निवृत्त इंजिनिअर, नांदेडवेळ : सायंकाळी पाच वाजता