शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

विकतचा वाईटपणा

By admin | Updated: March 7, 2017 00:08 IST

विकतचा वाईटपणा

ज्ये ष्ठ पत्रकार अणि माझे वडील सु. रा. देशपांडे यांचे निधन होऊन सोमवारी (दि. ६) एक महिना झाला. दरम्यानच्या काळात सर्व क्षेत्रांतील अनेकजण सांत्वनासाठी आले होते. त्यातील अनेकांनी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. त्यातील ही एक आठवण.सकाळच्या आजरा-कोल्हापूर एस. टी. बसची प्रवासी वाट पाहत होते. आगारातून गाडी आली. सर्व प्रवासी गडबडीने आत चढले. मात्र, गाडीत प्रचंड घाण होती. वास येत होता. गाडी स्वच्छ केली नव्हती. माझे वडीलही या गाडीत होते. त्यांनी सर्वच प्रवाशांना आवाहन केलं की, या घाण गाडीतून आपण प्रवास करायचा नाही. पैसे देऊन जर प्रवास करतो, तर गाडी स्वच्छ पाहिजे. सर्वजण खाली उतरले. वाहतूक नियंत्रकाला हा प्रकार सांगितला. गाडी परत आगारात पाठवली. ती स्वच्छ करून आल्यानंतर मग सर्वजण कोल्हापूरला निघाले. प्रसंग प्रातिनिधिक आहे. तो केवळ माझ्या वडिलांच्या संदर्भात होता म्हणून इथं सांगण्याचं प्रयोजन नाही, परंतु विकतचा वाईटपणा घेण्याची वृत्ती असणारे मोजके का असेना कार्यकर्ते आहेत, म्हणून लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनापर्यंत अनेकांवर वचक राहतो ही वस्तुस्थिती आहे. सध्या पावलापावलांवर अगणित प्रश्न दिसून येतात. सर्वसामान्यांची अवस्था तर अतिशय केविलवाणी असते. आवाज चढवून बोलणाऱ्याची कामं होतात आणि बाजू बरोबर असणाऱ्याचं ऐकूनही घेतलं जात नाही. एकाच रस्त्यावर दोन-दोनदा डांबर टाकून पैसे काढणारे कंत्राटदार आणि त्यांना पोसणारे पुढारी, गरज नसताना बांधकाम काढणारे, शास्त्रीयदृष्ट्या, व्यावहारिक विचार न करता कोट्यवधी रुपयांच्या भल्यामोठ्या पाणी योजना आखणाऱ्यांना कुणीतरी, कधीतरी जाब विचारला पाहिजे. जिल्ह्यातही अशा अनेक इमारतींना उद्घाटनानंतर घातलेली कुलपं चार-पाच वर्षांनंतरही काढलेली नाहीत. मग हे कोट्यवधी रुपये कुणासाठी खर्च केले, याची विचारणा व्हायला हवी. गेल्याच वर्षी बेलबागेतील डांबरी रस्ता करताना डांबर कुठं दिसत नव्हतं. खडीच्या पावडरचाच धुरळा महिनाभर ऊठत होता. इथं कुणी जाब विचारला नाही. गणेशोत्सवापासून ते नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त घातलेले मंडप गणपती विसर्जन झालं तरी आणि वाढदिवस झाला तरी पुढे काही दिवस काढले जात नाहीत. नागरिकांना दुसऱ्या अडचणीच्या रस्त्यानं जावं लागतं; पण हे विचारण्याचा वाईटपणा कोण घेणार?कॉलनीतच नळांना मोटार लावलेल्या असतात आणि इतरांना पाणी कमी मिळतं, पण विचारणार कोण? साधी गोष्ट, कोणत्याही गल्लीच्या वळणावर गाड्या पार्किंग करून ठेवू नयेत. कारण वळणावरून येणाऱ्याला पुढच्या गाड्या दिसत नाहीत. ठिकठिकाणी हे दिसत असूनही रस्त्यांवर असणाऱ्या या गाड्या हलवा म्हणून कोण सांगून वाईटपणा घेणार? शाळांच्या प्रवेशापासून ते एस.टी. वेळेवर सुटण्यापर्यंत, वेळेत कार्यालयात अधिकारी, कर्मचारी जागेवर असण्यापासून ते पोलिस ठाण्यात गेल्यावर किमान धडपणे तक्रार घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी सामान्यांना चांगला अनुभव येत नाही. रात्री बारा वाजता रस्त्यावर, स्टँडवर मोटारसायकल लावून त्यावर केक ठेवून फटाकड्या वाजवून, केक कापून, तोंडाला केक फासण्याचं फॅड वाढलंय. मोठ्यानं डॉल्बी वाजविला म्हणून रात्री पोलिसांना फोन करून सांगायचं म्हटलं तर पोलिसच येऊन इथं अमुकअमुक यांनीच फोन करून आम्हाला सांगितलंय, परत गोंधळ करू नका, असं पोरांनाच सांगून जातात. पोरं आयुष्यभर ज्यानं तक्रार केली, त्यांचा जाता-येता पंचनामा करायला रिकामी. त्यामुळं सामान्यांची फार मोठी कुचंबणा होते. अशावेळी मग समाजासाठी वाईटपणा विकत घेणाऱ्याची गरज आहे असं प्रकर्षानं वाटायला लागतं. तसे मोजके का असेना, परंतु प्रामाणिक कार्यकर्ते आहेत म्हणून अजूनही सार्वत्रिक वचक आहे. सामान्यांच्या, समाजाच्या भल्यासाठी वाईटपणा विकत घेणारे कार्यकर्ते वाढण्याची गरज आहे आणि त्यांना समाजाने पाठबळ देण्याचीही गरज आहे. - समीर देशपांडे