शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

विकतचा वाईटपणा

By admin | Updated: March 7, 2017 00:08 IST

विकतचा वाईटपणा

ज्ये ष्ठ पत्रकार अणि माझे वडील सु. रा. देशपांडे यांचे निधन होऊन सोमवारी (दि. ६) एक महिना झाला. दरम्यानच्या काळात सर्व क्षेत्रांतील अनेकजण सांत्वनासाठी आले होते. त्यातील अनेकांनी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. त्यातील ही एक आठवण.सकाळच्या आजरा-कोल्हापूर एस. टी. बसची प्रवासी वाट पाहत होते. आगारातून गाडी आली. सर्व प्रवासी गडबडीने आत चढले. मात्र, गाडीत प्रचंड घाण होती. वास येत होता. गाडी स्वच्छ केली नव्हती. माझे वडीलही या गाडीत होते. त्यांनी सर्वच प्रवाशांना आवाहन केलं की, या घाण गाडीतून आपण प्रवास करायचा नाही. पैसे देऊन जर प्रवास करतो, तर गाडी स्वच्छ पाहिजे. सर्वजण खाली उतरले. वाहतूक नियंत्रकाला हा प्रकार सांगितला. गाडी परत आगारात पाठवली. ती स्वच्छ करून आल्यानंतर मग सर्वजण कोल्हापूरला निघाले. प्रसंग प्रातिनिधिक आहे. तो केवळ माझ्या वडिलांच्या संदर्भात होता म्हणून इथं सांगण्याचं प्रयोजन नाही, परंतु विकतचा वाईटपणा घेण्याची वृत्ती असणारे मोजके का असेना कार्यकर्ते आहेत, म्हणून लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनापर्यंत अनेकांवर वचक राहतो ही वस्तुस्थिती आहे. सध्या पावलापावलांवर अगणित प्रश्न दिसून येतात. सर्वसामान्यांची अवस्था तर अतिशय केविलवाणी असते. आवाज चढवून बोलणाऱ्याची कामं होतात आणि बाजू बरोबर असणाऱ्याचं ऐकूनही घेतलं जात नाही. एकाच रस्त्यावर दोन-दोनदा डांबर टाकून पैसे काढणारे कंत्राटदार आणि त्यांना पोसणारे पुढारी, गरज नसताना बांधकाम काढणारे, शास्त्रीयदृष्ट्या, व्यावहारिक विचार न करता कोट्यवधी रुपयांच्या भल्यामोठ्या पाणी योजना आखणाऱ्यांना कुणीतरी, कधीतरी जाब विचारला पाहिजे. जिल्ह्यातही अशा अनेक इमारतींना उद्घाटनानंतर घातलेली कुलपं चार-पाच वर्षांनंतरही काढलेली नाहीत. मग हे कोट्यवधी रुपये कुणासाठी खर्च केले, याची विचारणा व्हायला हवी. गेल्याच वर्षी बेलबागेतील डांबरी रस्ता करताना डांबर कुठं दिसत नव्हतं. खडीच्या पावडरचाच धुरळा महिनाभर ऊठत होता. इथं कुणी जाब विचारला नाही. गणेशोत्सवापासून ते नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त घातलेले मंडप गणपती विसर्जन झालं तरी आणि वाढदिवस झाला तरी पुढे काही दिवस काढले जात नाहीत. नागरिकांना दुसऱ्या अडचणीच्या रस्त्यानं जावं लागतं; पण हे विचारण्याचा वाईटपणा कोण घेणार?कॉलनीतच नळांना मोटार लावलेल्या असतात आणि इतरांना पाणी कमी मिळतं, पण विचारणार कोण? साधी गोष्ट, कोणत्याही गल्लीच्या वळणावर गाड्या पार्किंग करून ठेवू नयेत. कारण वळणावरून येणाऱ्याला पुढच्या गाड्या दिसत नाहीत. ठिकठिकाणी हे दिसत असूनही रस्त्यांवर असणाऱ्या या गाड्या हलवा म्हणून कोण सांगून वाईटपणा घेणार? शाळांच्या प्रवेशापासून ते एस.टी. वेळेवर सुटण्यापर्यंत, वेळेत कार्यालयात अधिकारी, कर्मचारी जागेवर असण्यापासून ते पोलिस ठाण्यात गेल्यावर किमान धडपणे तक्रार घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी सामान्यांना चांगला अनुभव येत नाही. रात्री बारा वाजता रस्त्यावर, स्टँडवर मोटारसायकल लावून त्यावर केक ठेवून फटाकड्या वाजवून, केक कापून, तोंडाला केक फासण्याचं फॅड वाढलंय. मोठ्यानं डॉल्बी वाजविला म्हणून रात्री पोलिसांना फोन करून सांगायचं म्हटलं तर पोलिसच येऊन इथं अमुकअमुक यांनीच फोन करून आम्हाला सांगितलंय, परत गोंधळ करू नका, असं पोरांनाच सांगून जातात. पोरं आयुष्यभर ज्यानं तक्रार केली, त्यांचा जाता-येता पंचनामा करायला रिकामी. त्यामुळं सामान्यांची फार मोठी कुचंबणा होते. अशावेळी मग समाजासाठी वाईटपणा विकत घेणाऱ्याची गरज आहे असं प्रकर्षानं वाटायला लागतं. तसे मोजके का असेना, परंतु प्रामाणिक कार्यकर्ते आहेत म्हणून अजूनही सार्वत्रिक वचक आहे. सामान्यांच्या, समाजाच्या भल्यासाठी वाईटपणा विकत घेणारे कार्यकर्ते वाढण्याची गरज आहे आणि त्यांना समाजाने पाठबळ देण्याचीही गरज आहे. - समीर देशपांडे