शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आडसाली ऊसक्षेत्राकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

शिवराज लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी ...

शिवराज लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. एकीकडे साखर कारखाने आडसाली उसाची उचल नियोजित गळीत हंगामात करीत नाहीत, तर दुसरीकडे ऊसतोडणी मजुरांकडून होणारी लूट ??????? उसाची उचल १८ ते १९ महिन्यांनी होत असते. परिणामी आडसाली ऊस उत्पादनात घट होते. कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय पीक घेण्याच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे . यंदापासूनच आडसाली ऊस क्षेत्राकडे बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आडसाली ऊस लागणीऐवजी भात शेतीला पसंती अधिक आहे

ऊस शेतीच्या वाढत्या खर्चाचा मेळ घालणे कठीण होते. डिझेल-पेट्रोल या इंधन दरवाढीचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ट्रॅक्टर मशागतीच्या दरात प्रचंड वाढ झाली, रासायनिक खतांची दरवाढ, नियोजित हंगामानुसार खतांच्या टंचाईचा परिणाम शेती व्यवसायाला बसतो. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा संस्थांच्या वाढीव पाणीपट्टीची आकारणी न परवडणारी बनली आहे. शेतमजुरांच्या मजुरांची वाढलेली दरवाढ, मशागतीचा खर्च वाढल्याने आडसाली ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे.

साखर कारखान्यांकडून ऊसतोडणीचे नियोजनात्मक कामकाज होत नाही. आडसाली उसाचे पीक १८ ते १९ महिने उभे ऊस पीक शेतात असते. त्याचा परिणाम शेतक-यांच्या अर्थकारणावर होतो. १९ महिन्यांच्या ऊस पिकातून वजनात घट होते. उत्पादन खर्च अधिक नफा यांचा मेळ बसत नाही. आडसाली ऊस पीक हे गरीब व मध्यम शेतकऱ्यांना सध्या महागाईच्या काळात परवडत नाही.

ग्रामीण भागात भात पिकाचे जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, महिन्यामध्ये उत्पादन घेतले जाते. त्यानंतर लगेच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच ऊस लागणी केल्या जातात. भाताच्या लागणीच्या क्षेत्रात मका, झेंडू, कांदा, वांगी, लसूण, दोडका, मुळा इतर भाजीपाला यासारख्या अंतर पिके शेतकरी घेतात. या पिकातून शेतकऱ्यांना जादा आर्थिक नफाही मिळतो. भात पीक घेतल्यानंतर पुढे लागणीचा ऊस इतर साखर कारखान्यांना एका वर्षाच्या आत घालविला जातो आणि उत्पन्नही जादा मिळते, असा विचार नव्या बदलत्या काळात शेतकरी करू लागला आहे. म्हणून भात शेतीकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .

खरीप पिकांच्या उत्पादनाकडे कल

कोरोनाच्या महामारीच्या काळात होणारी अन्नधान्य टंचाई, तसेच खाद्यतेलाचे भडकलेले दर, वाढती महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात धान्य मिळते.

कोट

आडसाली उसाची उचल वेळेवर होत नाही. साखर कारखान्यांचा चुकीच्या धोरणामुळे आडसाली ऊस क्षेत्राची वेळेत उचल होत नाही. १८ ते १९ महिने ऊस उभे पीक असल्यामुळे वजनात घट होते. एकरी १५ ते १७ हजार रुपयांचा तोटा होतो. याला साखर कारखानदार जबाबदार आहे.

दिनकर सूर्यवंशी (शेतकरी, कसबा बीड)

फोटो ओळ -१५ कसबा बीड

सध्या वाढत्या महागाईच्या काळात आडसाली ऊस क्षेत्र घटू लागण्याने ग्रामीण भागात खरीप हंगामातील भात पीकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .