शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आडसाली ऊसक्षेत्राकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

शिवराज लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी ...

शिवराज लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. एकीकडे साखर कारखाने आडसाली उसाची उचल नियोजित गळीत हंगामात करीत नाहीत, तर दुसरीकडे ऊसतोडणी मजुरांकडून होणारी लूट ??????? उसाची उचल १८ ते १९ महिन्यांनी होत असते. परिणामी आडसाली ऊस उत्पादनात घट होते. कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय पीक घेण्याच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे . यंदापासूनच आडसाली ऊस क्षेत्राकडे बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आडसाली ऊस लागणीऐवजी भात शेतीला पसंती अधिक आहे

ऊस शेतीच्या वाढत्या खर्चाचा मेळ घालणे कठीण होते. डिझेल-पेट्रोल या इंधन दरवाढीचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ट्रॅक्टर मशागतीच्या दरात प्रचंड वाढ झाली, रासायनिक खतांची दरवाढ, नियोजित हंगामानुसार खतांच्या टंचाईचा परिणाम शेती व्यवसायाला बसतो. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा संस्थांच्या वाढीव पाणीपट्टीची आकारणी न परवडणारी बनली आहे. शेतमजुरांच्या मजुरांची वाढलेली दरवाढ, मशागतीचा खर्च वाढल्याने आडसाली ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे.

साखर कारखान्यांकडून ऊसतोडणीचे नियोजनात्मक कामकाज होत नाही. आडसाली उसाचे पीक १८ ते १९ महिने उभे ऊस पीक शेतात असते. त्याचा परिणाम शेतक-यांच्या अर्थकारणावर होतो. १९ महिन्यांच्या ऊस पिकातून वजनात घट होते. उत्पादन खर्च अधिक नफा यांचा मेळ बसत नाही. आडसाली ऊस पीक हे गरीब व मध्यम शेतकऱ्यांना सध्या महागाईच्या काळात परवडत नाही.

ग्रामीण भागात भात पिकाचे जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, महिन्यामध्ये उत्पादन घेतले जाते. त्यानंतर लगेच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच ऊस लागणी केल्या जातात. भाताच्या लागणीच्या क्षेत्रात मका, झेंडू, कांदा, वांगी, लसूण, दोडका, मुळा इतर भाजीपाला यासारख्या अंतर पिके शेतकरी घेतात. या पिकातून शेतकऱ्यांना जादा आर्थिक नफाही मिळतो. भात पीक घेतल्यानंतर पुढे लागणीचा ऊस इतर साखर कारखान्यांना एका वर्षाच्या आत घालविला जातो आणि उत्पन्नही जादा मिळते, असा विचार नव्या बदलत्या काळात शेतकरी करू लागला आहे. म्हणून भात शेतीकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .

खरीप पिकांच्या उत्पादनाकडे कल

कोरोनाच्या महामारीच्या काळात होणारी अन्नधान्य टंचाई, तसेच खाद्यतेलाचे भडकलेले दर, वाढती महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात धान्य मिळते.

कोट

आडसाली उसाची उचल वेळेवर होत नाही. साखर कारखान्यांचा चुकीच्या धोरणामुळे आडसाली ऊस क्षेत्राची वेळेत उचल होत नाही. १८ ते १९ महिने ऊस उभे पीक असल्यामुळे वजनात घट होते. एकरी १५ ते १७ हजार रुपयांचा तोटा होतो. याला साखर कारखानदार जबाबदार आहे.

दिनकर सूर्यवंशी (शेतकरी, कसबा बीड)

फोटो ओळ -१५ कसबा बीड

सध्या वाढत्या महागाईच्या काळात आडसाली ऊस क्षेत्र घटू लागण्याने ग्रामीण भागात खरीप हंगामातील भात पीकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .