शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

आडसाली ऊसक्षेत्राकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

शिवराज लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी ...

शिवराज लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. एकीकडे साखर कारखाने आडसाली उसाची उचल नियोजित गळीत हंगामात करीत नाहीत, तर दुसरीकडे ऊसतोडणी मजुरांकडून होणारी लूट ??????? उसाची उचल १८ ते १९ महिन्यांनी होत असते. परिणामी आडसाली ऊस उत्पादनात घट होते. कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय पीक घेण्याच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे . यंदापासूनच आडसाली ऊस क्षेत्राकडे बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आडसाली ऊस लागणीऐवजी भात शेतीला पसंती अधिक आहे

ऊस शेतीच्या वाढत्या खर्चाचा मेळ घालणे कठीण होते. डिझेल-पेट्रोल या इंधन दरवाढीचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ट्रॅक्टर मशागतीच्या दरात प्रचंड वाढ झाली, रासायनिक खतांची दरवाढ, नियोजित हंगामानुसार खतांच्या टंचाईचा परिणाम शेती व्यवसायाला बसतो. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा संस्थांच्या वाढीव पाणीपट्टीची आकारणी न परवडणारी बनली आहे. शेतमजुरांच्या मजुरांची वाढलेली दरवाढ, मशागतीचा खर्च वाढल्याने आडसाली ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे.

साखर कारखान्यांकडून ऊसतोडणीचे नियोजनात्मक कामकाज होत नाही. आडसाली उसाचे पीक १८ ते १९ महिने उभे ऊस पीक शेतात असते. त्याचा परिणाम शेतक-यांच्या अर्थकारणावर होतो. १९ महिन्यांच्या ऊस पिकातून वजनात घट होते. उत्पादन खर्च अधिक नफा यांचा मेळ बसत नाही. आडसाली ऊस पीक हे गरीब व मध्यम शेतकऱ्यांना सध्या महागाईच्या काळात परवडत नाही.

ग्रामीण भागात भात पिकाचे जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, महिन्यामध्ये उत्पादन घेतले जाते. त्यानंतर लगेच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच ऊस लागणी केल्या जातात. भाताच्या लागणीच्या क्षेत्रात मका, झेंडू, कांदा, वांगी, लसूण, दोडका, मुळा इतर भाजीपाला यासारख्या अंतर पिके शेतकरी घेतात. या पिकातून शेतकऱ्यांना जादा आर्थिक नफाही मिळतो. भात पीक घेतल्यानंतर पुढे लागणीचा ऊस इतर साखर कारखान्यांना एका वर्षाच्या आत घालविला जातो आणि उत्पन्नही जादा मिळते, असा विचार नव्या बदलत्या काळात शेतकरी करू लागला आहे. म्हणून भात शेतीकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .

खरीप पिकांच्या उत्पादनाकडे कल

कोरोनाच्या महामारीच्या काळात होणारी अन्नधान्य टंचाई, तसेच खाद्यतेलाचे भडकलेले दर, वाढती महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात धान्य मिळते.

कोट

आडसाली उसाची उचल वेळेवर होत नाही. साखर कारखान्यांचा चुकीच्या धोरणामुळे आडसाली ऊस क्षेत्राची वेळेत उचल होत नाही. १८ ते १९ महिने ऊस उभे पीक असल्यामुळे वजनात घट होते. एकरी १५ ते १७ हजार रुपयांचा तोटा होतो. याला साखर कारखानदार जबाबदार आहे.

दिनकर सूर्यवंशी (शेतकरी, कसबा बीड)

फोटो ओळ -१५ कसबा बीड

सध्या वाढत्या महागाईच्या काळात आडसाली ऊस क्षेत्र घटू लागण्याने ग्रामीण भागात खरीप हंगामातील भात पीकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .