शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जयसिंगपूरमध्ये बोलक्या भिंतीतून स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

संदीप बावचे : जयसिंगपूर येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. बोलक्या भिंतीच्या माध्यमातून ...

संदीप बावचे : जयसिंगपूर

येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. बोलक्या भिंतीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात येत असून, या सर्वेक्षणांतर्गत सर्वोत्तम शौचालयाच्या उपक्रमाबरोबरच थ्री स्टार मानांकनांसाठी पालिकेकडून तयारी सुरू झाली आहे. यामध्ये नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

जयसिंगपूर शहराने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गतवर्षी पश्चिम विभागात ५१ वा, तर महाराष्ट्रात ४१ वे स्थान मिळविले होते. २०२१ मध्ये सहा हजार गुणांची ही स्पर्धा होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या अभियानात पालिकेने चांगले योगदान दिले आहे. ओडीएफ अर्थात हागणदारीमुक्त शहर हे मुख्य अभियान पालिकेने राबवून ओडीएफ मानांकन मिळविले आहे. सार्वजनिक शौचालयामध्ये कमोड, स्वच्छतागृह, वॉशबेसिन, फॅन, सॅनिटरी नॅपकीन विक्रीचे मशीन, डिस्पोजल मशीन, २४ तास पाणी, एलईडी दिवे, आरसा, साबण अशा सुविधा पुरवून सर्वाेत्तम शौचालयाचा उपक्रम पालिकेने आतापर्यंत राबविला आहे. हाच उपक्रम सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग काम करीत आहे.

दरम्यान, जानेवारी २०२१ मध्येही स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पालिकेने पुन्हा पुढाकार घेतला आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. ठिकठिकाणी बोलक्या भिंतीद्वारे स्वच्छतेबाबत सातत्याने प्रबोधन करण्यात येत आहे. पालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी घंटागाड्याद्वारे नियोजन सुरू ठेवलेलेच आहे. नागरिकांनाही ओला व सुका कचरा वेगवेगळा घंटागाड्यात टाकण्याची सवय झाली आहे. या स्वच्छ अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग तितकाच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

-------------

चौकट - पालिकेकडून उपाययोजना

शहरातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने मशीन बसविले आहे. त्याचबरोबर बांधकाम कचरा संकलित करून त्यासाठी प्रक्रिया केंद्रदेखील उभारले आहे. माझी वसुंधरा अभियानातदेखील पालिकेने सहभाग घेतला आहे. एकूणच स्वच्छ सर्वेक्षण मानांकनासाठी पालिकेकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत.

फोटो - २६१२२०२०-जेएवाय-०१, ०२

फोटो ओळ - ०१) जयसिंगपूर येथे बोलक्या भिंतीच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे.

०२) जयसिंगपूर येथे पालिकेच्यावतीने हायटेक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे.