शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आॅटोमोबाईल क्षेत्राचे चक्र मंदावल

By admin | Updated: November 4, 2014 00:43 IST

अडीच वर्षांपासून मंदी : मोठे प्रकल्प बंद, दिवाळीनंतर लहान कारखाने चालू नाहीत, लघुउद्योग अडचणीते

सतीश पाटील - शिरोली -गेल्या अडीच वर्षांपासून आॅटोमोबाईल व फौंड्री उद्योगाला मंदीचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटेनासे झाले आहे. कोल्हापूरचा आॅटोमोबाईल व फौंड्री उद्योग महिंद्रा, जॉन डिअर, एस्कॉर्ट, ह्युुंडाई, टाटा मोटर्स यांसारख्या मोठ्या नामवंत कंपन्यांवर अवलंबून आहे; पण याच कंपन्यांच्या आॅर्डर्स आॅक्टोबर महिन्यात दिवाळी असूनही ४० ते ५० टक्क्यांइतक्या होत्या. चालू महिन्यात तर यापेक्षाही कमी आॅर्डरी आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर लहान कारखाने चालूच झालेले नाहीत.पायाभूत सुविधा, रस्ते, यासारखे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प गेल्या तीन-चार वर्षांत बंद पडले आहेत. विद्युत पॉवर प्रकल्प, कोळसा प्रकल्प, मायनिंग रेल्वेची कामे यासारखे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना लागणाऱ्या मशिनरी, गाड्या यांची आवकच घटली आहे. त्यामुळे आॅटोमोबाईल क्षेत्रावर मोठ्या मंदीचे सावट दिसत आहे. राज्यात व केंद्रात कॉँग्रेस सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य धोरणेच वापरली नाहीत. मोठ्या प्रकल्पाबाबत कोणतेच निर्णय घेतले नाहीत. उलट इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कर जादा, महाग वीज, रस्ते नाहीत, अनेक ठिकाणी विमान सेवाही नाही, जमीन उपलब्ध नाही, पाणी महाग यासारख्या अनेक कारणांमुळे हे प्रकल्प परराज्यात गेले.कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. हे सर्व उद्योग मोठ्या फौंड्री उद्योगांवर अवलंबून आहेत. फौंड्री उद्योगालाच कामे कमी आल्याने हे उद्योग अडचणीत सापडले आहेत. अनेक लघुउद्योग बंद अवस्थेत आहेत. मोठ्या कंपन्यांनी ‘सीएनसी, व्हीएमसी, व्हीटीएल, एसपीएम’सारख्या आॅटो मशिनरी घेतल्याने कमी वेळेत जास्त काम होते व लेथ मशीनवर अजूनही वेळ लागतो. त्यामुळे लेथ मशीनवर काम करणारे उद्योजक अडचणीत आले आहेत.केंद्रातील नव्या सरकारने अनेक धोरणे राबविली आहेत. ८० हजार कोटींची तरतूद उद्योगक्षेत्र व बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांत केली आहे. सध्या पाच हजार कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत परिस्थिती सुधारेल, असे उद्योजकांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय कंपन्या परराज्यात गेल्यामहिंद्रा अँड महिंद्रा व टाटा मोटर्स या दोन मोठ्या कंपन्यांवरच कोल्हापूरचा आॅटोमोबाईल व फौंड्री उद्योग अवलंबून आहे; पण या दोन्ही कंपन्यांनी आपले मोठे प्रकल्प परराज्यात हलविले आहेत. महिंद्राने आंध्रमधील झायराबाद येथे प्रकल्प सुरू केला आहे, तर टाटा मोटर्सने उत्तराखंडला प्रकल्प सुरू केला आहे. हे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे.आॅटोमोबाईलला मंदी आल्याने चालू वर्षात एकच शिफ्ट औद्योगिक वसाहतीत चालू असल्याचे प्रामुख्याने जाणवत आहे. महिन्याला ६० हजार टन कास्टिंग उत्पादन होत होते. ते २५ ते ३० हजार टनांवर आले आहे. मागणी नसल्याने उत्पादनच थंडावले आहे. त्यामुळे कारखानेही एकच शिफ्टमध्ये चालू आहेत. दुसरी व तिसरी शिफ्ट जवळजवळ बंदच आहे.आंतरराष्ट्रीय अनेक कंपन्यांची मागणी घटली आहे. जून-जुलै महिन्यांत चांगली मागणी होती; पण त्यानंतर मागणी कमी झाली. सध्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तर अतिशय कमी आॅर्डर आली आहे. त्यामुळेच एक शिफ्टमध्ये कारखाने चालू आहेत.- समीर काळे, के अँड के फौंड्रीगेल्या अडीच वर्षांपासून उद्योगांना मंदी आहे. तीन वर्षांत मोठे प्रकल्प बंद पडले. शासनाने चार कोणतेच योग्य निर्णय घेतले नाहीत. आंतरराष्ट्रीय कंपन्या इतर राज्यात गेल्या. यासारख्या कारणांमुळे आॅटोमोबाईल उद्योग मंदीत सापडला आहे.- व्ही. एन. देशपांडे, तज्ज्ञ उद्योजक साऊंड कास्टिंग आंतरराष्ट्रीय अनेक कंपन्यांची मागणी घटली आहे. जून-जुलै महिन्यांत चांगली मागणी होती; पण त्यानंतर मागणी कमी झाली. सध्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तर अतिशय कमी आॅर्डर आली आहे. त्यामुळेच एक शिफ्टमध्ये कारखाने चालू आहेत.- समीर काळे, के अँड के फौंड्रीआॅटोमोबाईल क्षेत्राला मंदी जाणवत आहे. ही मंदी कमी होण्यासाठी अजून सहा महिने तरी लागतील. सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले आहे. केंद्र शासनाने उद्योगांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांत मंदी कमी होईल.- नीरज झंवर, झंवर ग्रुप