शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

‘भोगावती’ निवडणुकीबाबत प्राधिकरणाला फटकारले

By admin | Updated: January 14, 2017 00:53 IST

उच्च न्यायालय : सोमवारी म्हणणे सादर करण्याचे आदेश

कोल्हापूर / भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी सहकार प्राधिकरणासह साखर सहसंचालकांना चांगलेच फटकारले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ‘अ’ वर्ग संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी (दि. १६) म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. ‘भोगावती’ची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडली होती. जिल्हा परिषदेच्या तोंडावर निवडणूक घेऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील होते; पण सहकार प्राधिकरणाने गुरुवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. जिल्हा परिषद व कारखान्याचा प्रचार एकाच वेळी येणार असल्याने ते करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदारांना अडचणीचे ठरणार आहे. या विरोधात कारखान्याचे माजी संचालक विश्वनाथ पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सुभाष पाटील-सिरसेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब कारंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्या. खेमकर व न्या. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सहकार कलम ७३ (क, क) नुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरू असताना ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक घेता येत नाही. मग सहकार प्राधिकरणाने कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश न्यायालयाने सहकार विभाग, सहकार प्राधिकरण व प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत. अ‍ॅड. संजय पवार व अ‍ॅड. हर्षवर्धन भावके यांनी न्यायालयात बाजू मांडत निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली.‘शाहू’च्या निवडणुकीची आठवण!‘शाहू’- कागलच्या २००० च्या निवडणुकीत वाढीव सभासदांवर हरकत घेत हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी मतदानाच्या अगोदर एक दिवस न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. या आठवणीला शुक्रवारी भोगावती परिसरात उजाळा दिला जात होता. ४१ उमेदवारांचे अर्जनिवडणुक कार्यक्रमाप्रमाणे मंगळवारी (दि. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी ४१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये महिला, ओ.बी.सी., भटक्या विमुक्त गटाचा समावेश आहे.