शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘भोगावती’ निवडणुकीबाबत प्राधिकरणाला फटकारले

By admin | Updated: January 14, 2017 00:53 IST

उच्च न्यायालय : सोमवारी म्हणणे सादर करण्याचे आदेश

कोल्हापूर / भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी सहकार प्राधिकरणासह साखर सहसंचालकांना चांगलेच फटकारले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ‘अ’ वर्ग संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी (दि. १६) म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. ‘भोगावती’ची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडली होती. जिल्हा परिषदेच्या तोंडावर निवडणूक घेऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील होते; पण सहकार प्राधिकरणाने गुरुवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. जिल्हा परिषद व कारखान्याचा प्रचार एकाच वेळी येणार असल्याने ते करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदारांना अडचणीचे ठरणार आहे. या विरोधात कारखान्याचे माजी संचालक विश्वनाथ पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सुभाष पाटील-सिरसेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब कारंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्या. खेमकर व न्या. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सहकार कलम ७३ (क, क) नुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरू असताना ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक घेता येत नाही. मग सहकार प्राधिकरणाने कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश न्यायालयाने सहकार विभाग, सहकार प्राधिकरण व प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत. अ‍ॅड. संजय पवार व अ‍ॅड. हर्षवर्धन भावके यांनी न्यायालयात बाजू मांडत निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली.‘शाहू’च्या निवडणुकीची आठवण!‘शाहू’- कागलच्या २००० च्या निवडणुकीत वाढीव सभासदांवर हरकत घेत हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी मतदानाच्या अगोदर एक दिवस न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. या आठवणीला शुक्रवारी भोगावती परिसरात उजाळा दिला जात होता. ४१ उमेदवारांचे अर्जनिवडणुक कार्यक्रमाप्रमाणे मंगळवारी (दि. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी ४१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये महिला, ओ.बी.सी., भटक्या विमुक्त गटाचा समावेश आहे.