शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे लक्ष

By admin | Updated: August 15, 2016 01:04 IST

नगरपालिका क्षेत्र : राजकीय पक्ष, आघाड्यांमध्ये उत्कंठा

राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी आगामी नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनतेतून नगराध्यक्षांची निवड आणि द्विसदस्यीय प्रभाग रचना याबाबतचे अध्यादेश पुन्हा काढण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे आता नगरपालिका क्षेत्रातील राजकीय पक्ष व स्थानिक आघाड्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपालिका नगराध्यक्षांच्या निवडी नगरसेवकांतून करण्याऐवजी थेट जनतेतून करणे आणि मागील निवडणुकीसाठी असलेली चार सदस्यीय प्रभाग रचना बदलून द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा प्रस्ताव १० मे २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच यावेळी मुंबई महापालिका वगळता अन्य महापालिकांच्या निवडणुकीमध्येसुद्धा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचे ठरले होते. हा अध्यादेश त्यावेळी काढण्यात आला. हा अध्यादेश नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनमधील विधानसभेमध्ये मांडण्यात आला. या अध्यादेशावर झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदारांनी जोरदार टीका केली. मात्र, विधानसभेमध्ये हा अध्यादेश मंजूर झाला होता; पण विधान परिषदेमध्ये मात्र या अध्यादेशाचे विधेयक संमत होऊ शकले नाही. त्यामुळे सध्याच्या भाजप-सेना शासनावर अध्यादेश पुन्हा काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर १० आॅगस्टला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव परत मांडण्यात आला. त्याप्रमाणे नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी जनतेतून नगराध्यक्ष, द्विसदस्यीय प्रभाग रचना आणि मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. त्याप्रमाणे अध्यादेश काढण्याचेही ठरले. या अध्यादेशावर आता राज्यपालांची सही होऊन तो लागू होईल. राज्यात सुमारे २१२ नगरपालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये होऊ घातल्या आहेत. त्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांमधील नगराध्यक्षांच्या आरक्षणाच्या सोडती पुन्हा निघणार आहेत. या सोडतीनंतर नगरपालिकांमधील स्थानिक पक्ष व आघाड्यांमध्ये होणाऱ्या हालचालींना वेग येणार आहे. नगराध्यक्षांच्या आरक्षणाप्रमाणे मोर्चेबांधणी होणार असल्याने सर्व नगरपालिकांमधील राजकीय क्षेत्राचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागून राहिले आहे. आणखीन दोन आठवड्यांनंतर नगराध्यक्षपदाच्या सोडती नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यापूर्वी पहिल्या अडीच वर्षांकरिता नगराध्यक्ष आरक्षणांच्या सोडती प्रत्येक नगरपालिकानिहाय काढण्यात आल्या होत्या. मात्र, आता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडताना नगराध्यक्षांची मुदत पाच वर्षांची असणार आहे. परिणामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा आरक्षणांच्या सोडती काढल्या जातील. या सोडती आता आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढल्या जातील, अशी चर्चा आहे.