शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

२४ तासांत हजर व्हा, अन्यथा कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

म्हाकवे गतवर्षी महापूर आणि कोरोनाच्या संकटातही घराघरापर्यंत जाऊन केलेल्या कामाचे दाम मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी काम बंद आंदोलन केले. मात्र, ...

म्हाकवे

गतवर्षी महापूर आणि कोरोनाच्या संकटातही घराघरापर्यंत जाऊन केलेल्या कामाचे दाम मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी काम बंद आंदोलन केले. मात्र, त्यांचे हे योगदान विसरत जि .प.चे सीईओ अमन मित्तल यांनी २४ तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा कार्यमुक्त करू, असा फतवाच काढला. विशेष म्हणजे हे पत्र आशांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोहोच केले आहे. तसेच, आशांच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे आशांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

आशांनीही आज, सोमवारी जि. प. समोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेत आर या पार ची लढाई करण्याचा निर्धार केला आहे. थकीत मानधन द्या, अन्यथा काम बंदच राहील. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या, असा पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यात आशा व गटप्रवर्तकांची ३ हजारांपर्यंत संख्या आहे.

आशांमुळेच वाड्यावस्त्यांंवरील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

राज्यातील काही जि.प.नी हे थकीत मानधन दिले आहे; मात्र, कोल्हापुरात ते न देता पत्र काढून कमी करण्याचे आदेश दिले जात आहेत, ही दुर्दैवी बाब आहे.

दरम्यान, आशांच्या लढाईला जिल्ह्यातील सर्वच कामगार संघटना पाठिंबा देत असल्याचे काॅ. भरमा कांबळे व काॅ. शिवाजी मगदूम यांनी सांगितले.

" जिवाची बाजी लावून कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य केले.मात्र, प्रशासनच निलंबनाची धमकी देत आहे. अखेर प्रशासनाने आपले खरे रूप दाखवलेच आहे. त्यामुळे आता आम्हीही एकसंध होऊन लढा देणार आहोत.

उज्ज्वला पाटील

जिल्हासचिव, आशा व गटप्रवर्तक युनियन

जि.प.समोर आज ठिय्या....

आशांनी पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांसह लोकप्रतिनिधींना निवेदने देत भेट घेतली. याबाबत आज, सोमवारी प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सर्वांनीच आश्वासन दिले आहे, तर आज जि. प. समोर सर्वच आशा ठिय्या आंदोलन करणार आहेत.