शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांमध्ये दुर्गम गावे कमी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST

कोल्हापूर : सुगम गावांमध्ये राहणाऱ्या आणि नोकऱ्या करणाऱ्या शिक्षकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील खरोखरंच दुर्गम असणारी गावेही यादीत येऊ नयेत यासाठी ...

कोल्हापूर : सुगम गावांमध्ये राहणाऱ्या आणि नोकऱ्या करणाऱ्या शिक्षकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील खरोखरंच दुर्गम असणारी गावेही यादीत येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याची तक्रार शिक्षकांनीच केली आहे. दुर्गम शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी सुगम व दुर्गम अशी शाळांची विभागणी करण्यात आली आहे. दुर्गम क्षेत्र ठरविण्यासाठी सातपैकी तीन निकष पात्र असणे आवश्यक आहे. राज्य शासनाचा संपूर्ण राज्यासाठी एकच शासन आदेश असतो; पण कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यातूनही काही पळवाटा काढण्यात आल्याचा आरेाप होत आहे.

शासननिर्णयानुसार संवाद छायेचा प्रदेश ठरविण्यासाठी बीएसएनएलची गावात रेंज नसल्यास ते गाव संवाद छायेच्या प्रदेशांमध्ये पात्र धरावे.’ असे नमूद असताना जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार अन्य कंपन्यांच्या रेंजबाबतही विचारणा करण्यात आली आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्रव असणारा जंगल व्याप्त प्रदेश असेल तर हे गाव दुर्गममध्ये धरावे, अशी सूचना असताना त्या ठिकाणी जीवितहानी झाली आहे का अशी नवीन विचारणा कोल्हापूर जिल्हा परिषदेने केली आहे.

योग्य रस्त्यांचा अभाव अथवा रस्त्याने न जोडलेल्या शाळा ज्या ठिकाणी बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसेल ते गाव निकषास पात्र असेल असे शासन आदेशात म्हटले आहे. मात्र, तेथे पोषण आहाराची गाडी जात असेल तर असा नवा निकष जिल्हा परिषदेने समाविष्ट केला आहे. यामुळे दुर्गम गावांची संख्याच कमी होणार असून दुर्गम गावांतील शिक्षकांवर आहे त्याच ठिकाणी काम करण्याची वेळ येणार असल्याची संघटनेची तक्रार आहे.