शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विधानसभा आॅगस्टमध्ये?

By admin | Updated: July 16, 2014 01:01 IST

राजकीय पक्षांना वेध : प्रशासनाची लगीनघाई सुरू

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्याच्या (आॅगस्ट) शेवटच्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता गृहीत धरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी या सत्तारुढांसह सर्वच राजकीय पक्षांनी त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. दसरा संपल्यानंतर आणि दिवाळी सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ५ ते १९ आॅक्टोबरच्या दरम्यान, विधानसभेची दोन टप्प्यात निवडणूक होऊ शकते. मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, १ आॅगस्ट रोजी ही अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांना चार्जिंग करण्यासाठी मेळावे, बैठका, निर्धारयात्रा, मतदार जोडो अभियान यासारखे उपक्रम राबवून राजकीय नेते मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहेत. रुसवे फुगवे काढत आहेत. उत्सुकांनीही आपल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. विविध उपक्रम व सार्वजनिक मोर्चे, मेळाव्यातून इच्छुक चमकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर मे महिन्यापासूनच सुरू करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मतदारयादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ३० जूनपर्यंत मतदार नोंदणीसाठी अभिनव उपक्रमही राबविले गेले. त्यातून चांगला प्रतिसादही मिळाला. आता मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करून १ आॅगस्ट रोजी अंतिम मतदारयादी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत जाहीर केली जाणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुलै यांनी सांगितले.विधानसभेची निवडणूक गणपती उत्सव आणि दसरा झाल्यानंतर आणि दिवाळीपूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीनेच सगळी तयारी दिसत आहे. गणपती उत्सवात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण असतो. दसऱ्यात तुलनेने कमी ताण असतो. त्यामुळेच ५ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबर या काळात निवडणूक घेण्याचे निश्चित केले जाऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. जर आॅक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक घेण्याचे निश्चित झाले, तर आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांची धावपळ उडाली आहे. सरकारने केलेल्या कार्यक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही सरकारने निधी मंजूर केलेल्या कामांचा प्रारंभ करण्याचे नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)