शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनपूर्वी शेतमालाच्या वितरणाची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : लॉकडाऊन करायचे असेल तर अगोदर शेतमालाच्या वितरण व्यवस्थेची व्यवस्था करावी व शेतमालाचे दर पडणार नाहीत याची खात्री ...

जयसिंगपूर : लॉकडाऊन करायचे असेल तर अगोदर शेतमालाच्या वितरण व्यवस्थेची व्यवस्था करावी व शेतमालाचे दर पडणार नाहीत याची खात्री द्यावी, अशी मागणी मुंबई मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली.

सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे संकेत राज्य सरकारकडून वारंवार दिले जात आहेत. गतवर्षी राज्य आणि केंद्र सरकारने कोणताही विचार न करता तसेच पूर्वतयारी न करता त्वरित लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस, फळ उत्पादक, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. जिल्हा तसेच गावबंदी झाल्याने खरेदीदार मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतीमाल शेतातच टाकून द्यावा लागला. तसेच दरही मोठ्या प्रमाणात कोसळले. याची कोणतीही नुकसानभरपाई सरकारकडून देण्यात आली नाही. तसेच विमा कंपन्यांनी देखील हात वर केले.

आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लॉकडाऊन होणार या बातम्यांमुळे शेतीमालाचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अचानक लॉकडाऊन झाले तर वाहतूक व्यवस्था ठप्प होईल, या भीतीने खरेदीदार शेतीमाल उचलेना झालेत. राज्य सरकारदेखील लॉकडाऊनची तयारी करत आहे. या संदर्भात राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. शेतीमालाच्या वितरण व्यवस्थेसंदर्भात सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून कोणत्याही जिल्ह्यात शेतीमालाच्या वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. लॉकडाऊनबाबत भूमिका घेताना शेतीमालाच्या वितरण व्यवस्थेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच शेतमालाचे दर पडणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी. अन्यथा पुन्हा राज्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

फोटो - ३००३२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - मुंबई मंत्रालय येथे राजू शेट्टी यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन दिले.