शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती का ?

By admin | Updated: November 5, 2014 23:31 IST

प्राथमिक शिक्षक हवालदिल : निर्णयाबाबत फेरविचार करण्याची प्राथमिक शिक्षकांची मागणी

रवींद्र हिडदुगी - नेसरी -जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबतची खात्री करण्याचे परिपत्रक प्रत्येक शाळांना पाठविल्याने प्राथमिक शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. शासनाच्या या निर्णयाने शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती का? असा सवाल शिक्षक वर्गातून होत आहे.२९ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या परिपत्रकामध्ये पंचायत समितीच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबतची खात्री करण्याची सूचना केली आहे. या परिपत्रकाच्या प्रती प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हाती पडल्याने मुख्यालये सोडून बाहेरगावी राहत असलेल्या शिक्षकांमधून या निर्णयाच्या विरोधात सूर निघत असून, संघटना पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याअगोदर पुनश्च एकदा फेरविचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शाळेच्या ठिकाणी शिक्षक राहत नसल्याची ओरड करून जिल्हा परिषद शाळांतून गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांनी याला जबाबदार असणाऱ्या शासनाविरोधात कधी आवाज उठविला होता का? शासन मागेल त्याला शाळा उघडण्याची परवानगी देऊन गरीब व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर भविष्यात होणाऱ्या दूरगामी परिणामांचा कोणी आजवर विचार केलाय का? प्राथमिक शाळांचा दर्जा ढासळतोय, असा सार्वत्रिक प्रचार करून खासगी शाळांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देण्याचे काम कोण करीत आहे? शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामात गुंतवून प्राथमिक शाळाच मोडीत काढण्याचा डाव शासन करीत असताना प्राथमिक शाळांचा दर्जा ढासळत आहे, असे म्हणणं कितपत योग्य आहे, अनेक प्रश्न शिक्षक वर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.राज्य प्राथमिक शिक्षक संघटना कोल्हापूर शाखेच्या वतीने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकतेच याबाबत निवेदन दिले आहे. त्यामध्ये शिक्षक हे शाळेच्या गावापासून ५ ते १० कि.मी. अंतरावर राहत असल्याने शाळेत पोहोचण्यास त्यांना १० ते १५ मिनिटे लागतात. शिवाय शिक्षकांची मुलेही राहत्या गावात घातलेली असतात. त्यामुळे त्यांचे अशा निर्णयामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू शकते. सर्वच शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीे कष्ट घेत आहेत. तेव्हा याबाबत फेरविचार करून शिक्षकांची मानसिकता कशी चांगली राहील याबाबतची विनंतीही निवेदनात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा आदर्शवत आहे. याच जिल्ह्याने ‘राजर्षी शाहू अभियान’सारखा गुणवत्तापूर्ण उपक्रम महाराष्ट्राला दिला. शैक्षणिक उठावांतून शाळांची अंतर्बाह्य जडणघडण याच जिल्ह्यात आढळून येते. असे असताना जिल्हा प्रशासनाने परिपत्रक काढून प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबतचे आदेश काढून एकप्रकारे अन्यायच होत असल्याची भावना शिक्षक वर्गातून होत आहे.