शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सांगरुळमध्ये लस वाटपात मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर तालुक्यात लस वाटपात कमालीचा सावळागोंधळ सुरू आहे. सांगरुळमध्ये तर मनमानी पद्धतीने लस दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : करवीर तालुक्यात लस वाटपात कमालीचा सावळागोंधळ सुरू आहे. सांगरुळमध्ये तर मनमानी पद्धतीने लस दिली जात असून २०-२२ वर्षांच्या तरुणांना लस मिळते मात्र वयोवृद्धांना ९० दिवस उलटून गेले तरी लसीचा दुसरा डोस मिळत नाही. आरोग्य यंत्रणेच्या कुचकामी नियोजनाचा मनस्ताप मात्र नागरिकांना होत आहे.

केंद्र सरकारकडून लस कमी मिळत असली तरी त्याचे वाटप योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे असते. मात्र तसे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर होताना दिसत नाही. लस आली कधी आणि संपली कधी हेच सामान्य माणसाला कळत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करायची म्हटले तर ते सापडत नाहीत. अशात कोणीतरी लस सुरू झाले असे सांगितले आणि पाळीत जाऊन बसले तर वशिल्याबाजीमुळे लस मिळेलच याची खात्री नाही. सामान्य माणसाला ६० वर्षांचा नियम मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शिफारसीने २० ते २२ वर्षांच्या तरुणांनाही लसीकरण झाले आहे. त्यामुळे विशेषत: वयोवृद्धांमधून संताप व्यक्त होत आहे. सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत झालेल्या लसीकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेपाने वादावादी

सामान्य माणूस लस मिळणार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून पाळीत बसलेला असतो. मात्र राजकीय पदाधिकारी आपल्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तींना मध्येच घुसवून लस देतात. याबाबत लसीकरण केंद्रावर वादावादीचे प्रकारही होत आहेत.