शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सांगरुळमध्ये लस वाटपात मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर तालुक्यात लस वाटपात कमालीचा सावळागोंधळ सुरू आहे. सांगरुळमध्ये तर मनमानी पद्धतीने लस दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : करवीर तालुक्यात लस वाटपात कमालीचा सावळागोंधळ सुरू आहे. सांगरुळमध्ये तर मनमानी पद्धतीने लस दिली जात असून २०-२२ वर्षांच्या तरुणांना लस मिळते मात्र वयोवृद्धांना ९० दिवस उलटून गेले तरी लसीचा दुसरा डोस मिळत नाही. आरोग्य यंत्रणेच्या कुचकामी नियोजनाचा मनस्ताप मात्र नागरिकांना होत आहे.

केंद्र सरकारकडून लस कमी मिळत असली तरी त्याचे वाटप योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे असते. मात्र तसे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर होताना दिसत नाही. लस आली कधी आणि संपली कधी हेच सामान्य माणसाला कळत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करायची म्हटले तर ते सापडत नाहीत. अशात कोणीतरी लस सुरू झाले असे सांगितले आणि पाळीत जाऊन बसले तर वशिल्याबाजीमुळे लस मिळेलच याची खात्री नाही. सामान्य माणसाला ६० वर्षांचा नियम मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शिफारसीने २० ते २२ वर्षांच्या तरुणांनाही लसीकरण झाले आहे. त्यामुळे विशेषत: वयोवृद्धांमधून संताप व्यक्त होत आहे. सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत झालेल्या लसीकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेपाने वादावादी

सामान्य माणूस लस मिळणार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून पाळीत बसलेला असतो. मात्र राजकीय पदाधिकारी आपल्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तींना मध्येच घुसवून लस देतात. याबाबत लसीकरण केंद्रावर वादावादीचे प्रकारही होत आहेत.