शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

पहिल्या दिवशी नेले सुमारे १७५ अर्ज

By admin | Updated: September 21, 2014 00:54 IST

विधानसभा निवडणूक; एकही अर्ज दाखल नाही

कोल्हापूर : पितृपक्षामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज, शनिवारी जिल्ह्यात कुणी फिरकले नसले तरी कोरे अर्ज नेण्यासाठी मात्र इच्छुक उमेदवारांनी तत्परता दाखविली. प्रत्येक मतदारसंघातून सरासरी वीसहून जास्त कोरे अर्ज नेण्यात आले. त्यामुळे दहा मतदारसंघांतून सुमारे १७५ कोरे अर्ज आज, शनिवारी पहिल्याच दिवशी नेण्यात आले. त्यावरून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची भाऊगर्दी उसळणार, हेदेखील स्पष्ट झाले.उमेदवारांची भुमिका काहीही असली तरी शासकीय निवडणुक यंत्रणा मात्र कार्यरत झाली आहे. निवडणुक कामासाठी सतरा हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसह प्रशिक्षणाचे दिवसही निश्चित करण्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीची अधिसुचना आज जाहीर झाली आणि आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेससुध्दा सुरवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदार संघ असून पहिल्या दिवशी सर्वच मतदार संघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. काही उमेदवारांचे प्रतिनिधी कार्यालयात जाऊन चौकशी करताना तसेच अन्य कागदपत्रांची जमवाजमव करताना दिसत होते. सध्या पितृपंधरावडा सुरु आहे. या पंधरावड्यात कोणतेही शुभ काम करण्याचे टाळले जाते. त्यामुळेच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे पुढे ढकलले आहे. घटस्थापना झाल्यानंतरच (२५ सप्टेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होईल अशी शक्यता आहे.जिल्हाधिकारी राजाराम माने, अतिरीक्त जिल्हाधिकारी अजीत पवार, पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी आज सायंकाळी निवडणुक आयोगाच्या शिरस्त्याप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन निवडणुक तयारीसंबंधी माहिती दिली. जिल्ह्णात निवडणुक प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयातील १७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती क रण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना दि.२१ व दि.२८ रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी ८५ टक्क्यापर्यंत वाढावी म्हणून प्रशासनाकडून विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने रॅली, सभा, मेळावे, जाहीराती करण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)