शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

महिला पोलीस अधिकारी नियुक्तीस हरताळ

By admin | Updated: May 29, 2017 00:33 IST

महिला पोलीस अधिकारी नियुक्तीस हरताळ

दीपक जाधव । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे द्या, असे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचे आदेश कागदावरच आहेत. राज्यात महत्त्वाच्या पदांवर महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती झाली असताना कोल्हापूर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. सक्षम व कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची खंत जिल्ह्यातील वरिष्ठ महिला अधिकारी याच्यात आहे. सध्या मुंबईबरोबरच राज्यात वरिष्ठ पदांवर महिला पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती वेगळीआहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ३० पोलीस ठाणी असून, यापैकी कळे पोलीस ठाण्यात फक्त महिला पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांचीही येत्या काही दिवसांत बदली होणार आहे. मीना जगताप सोडल्या तर इतर अधिकारी पोलीस ठाण्याच्या प्रमुख नसल्या तरी विद्या जाधव या महिला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध शाखेचा कार्यभार काही दिवसांपासून सांभाळत आहेत. त्यांच्याकडे कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गचा कार्यभार येतो. याठिकाणी यशस्वीपणे काम पाहिलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील याची नियंत्रक कक्षात बदली केली आहे. त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्याने जिल्ह्याबाहेर बदली होण्याची शक्यता आहे. आरती नांद्रेकर या महिला कक्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्थापन केलेल्या निर्भया पथकाचे काम सक्षमपणे पाहत आहेत. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘पोलीस महासंचालकांच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार कळे, एमआयडीसी शिरोली या पोलीस ठाण्यांत जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. याबाबत आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेऊन निर्णय घेऊ.जिल्ह्यात ११ अधिकारीजिल्ह्यात सध्या एकूण ११ महिला अधिकारी आहेत. त्यात पाच वरिष्ठ अधिकारी आहेत; परंतु त्यांची ज्येष्ठता त्यांच्या नियुक्तींना अडथळा बनल्या आहेत. आर. जी. नदाफ, वैष्णवी पाटील, पुष्पलता मंडले, मीना जगताप, स्मिता काळभोर, आरती नाद्रेकर यांच्यासह ११ सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.