शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

पोलीस कुटुंबातील १५ जणांची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

कदमवाडी - कर्तव्य बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील १५ जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करून घेतले ...

कदमवाडी - कर्तव्य बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील १५ जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करून घेतले आहे. संबंधितांना याबाबतचे नियुक्ती पत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते देण्यात आले.

पोलीस दलात सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विविध कारणांनी सेवा बजावताना मृत्यू झाला. त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरी मिळावी यासाठी अर्ज केले होते. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाकडून पोलीस दलातील अशा मृत्यू झालेल्या पाल्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर पोलीस दलातील १५ पैकी १२ जणांची नियुक्ती गुरुवारी झाली आहे. पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील १२ जणांना शिपाईपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुकंपा तत्त्वाखाली शासकीय सेवेत लवकर नोकरी मिळणे तसे खूप कठीण आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलास मिळाला आहे. कोल्हापूर पोलीस दलाने या भरतीच्या निर्णयाबाबत तत्परता दाखवली आणि पोलीस कुटुंबातील १२ जण आज पोलीस दलात रुजू झाले आहेत. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या सर्वांना सेवा बजावण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. मात्र सध्या कोरोना काळात याचे प्रशिक्षण लांबणीवर जाणार आहे.

फोटो - कोल्हापूर पोलीस दलातील १५ पैकी १२ जणांची अनुकंपा भरती गुरुवारी झाली. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्यांना पोलीस पेटी व साहित्य देण्यात आले.

(छाया-दीपक जाधव )