शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

वरदच्या खूनप्रकरणी उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील सात वर्षांच्या वरदचा दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने खून केला आहे. त्याला फाशीची शिक्षा ...

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील सात वर्षांच्या वरदचा दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने खून केला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा सर्व पुराव्यांसह तपास करण्यात यावा व महाराष्ट्र शासन गृहखात्याच्या वतीने न्यायालयीन कामासाठी वरदच्या वतीने सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या मुलाचाअपहरण करून दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य, रा. सोनाळी याने खून केला.

ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अद्यापही वरदच्या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सर्व स्तरावर या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यासाठी वरदच्या खुनाचा तपास कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलातर्फे विशेष पथकाकडे देण्यात यावा. या घटनेतील सर्व बाबींची विशेष चौकशी करून वरदच्या मृत्यूचा गुन्हेगार दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा सर्व पुराव्यासह तपास करण्यात यावा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याच्या वतीने न्यायालयीन पुढील कामासाठी वरदच्या वतीने सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख अशोक पाटील, सत्यजित पाटील, उमाजी पाटील, जीवन रेडेकर, विनय रेडेकर, अनिल पाटील उपस्थित होते.

फोटो ओळ

सोनाळी, ता. कागल येथे वरदच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना विजय देवणे, विनय रेडेकर.