शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर द्या

By admin | Updated: December 29, 2014 00:02 IST

एन. डी. पाटील : पाचरोजी सांगलीत मोर्चा

सांगली : शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना, चळवळींची दिशा भरकटत चालली असून, साखरेच्या किमतीवर उसाची किंमत ठरविण्याची चढाओढ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नसून, ऊस उत्पादकाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. यासाठी ५ जानेवारीस सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली. ऊसदरप्रश्नी सांगलीतील कामगार भवनात बैठक झाली. यावेळी पाटील म्हणाले, शेतमालात शेतकऱ्याची गुंतवणूक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे अत्यावश्यक आहे. सध्या दरप्रश्नी भांडवलशाही मानसिकता असणारे कारखानदार एकमेकांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत आहेत. परंतु शेतकरी योग्य दर मिळाला पाहिजे, या मुद्द्यावर एकत्र येत नाहीत, हे दुर्दैव आहे. मागीलवर्षी उसाला जो दर होता, तो देखील यंदा मिळत नाही. भविष्यात साखरेचे भाव कोसळले तर उसाला मिळणाऱ्या दरात घसरण होणार का? हा प्रश्न आहे. साखरेच्या किमती कमी, जास्त करणे हे सरकारच्या हातात असल्याने उसाच्या उत्पादन खर्चावरच उसाची किंमत ठरविली पाहिजे, हा आपला मुद्दा असला पाहिजे. इंधनामध्ये इथेनॉलचा वापर केवळ १० टक्के जरी केला तरी त्याचा देशाला आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ज्या कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १९०० अथवा २००० रुपये जमा केले आहेत, त्यांनी त्वरित एफआरपीप्रमाणे रक्कम द्यावी, असे आवाहनही केले.अजित सूर्यवंशी यांनी, कॉँग्रेस आणि भाजप दोन्ही सरकारची शेतकऱ्यांप्रश्नी भूमिका सारखीच असल्याची टीका केली. भविष्यात एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी एकमताने घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे जे. पी. लाड, भास्कर चौगुले, शरद पाटील, व्ही. वाय. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिंधी)पोपटाचा डोळा... महाभारतात द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी झाडावर एक कृत्रिम पोपट ठेवून प्रत्येकाला त्याचा वेध घेण्यास सांगितले. परंतु केवळ अर्जुनाचेच लक्ष पक्ष्याच्या डोळ्यावर केंद्रित होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे लक्ष उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यावर केंद्रित झाले, तर यश निश्चित मिळेल. कोणाच्या तरी वळचणीला उभे राहिले की अवस्था अवघड होते. त्यांना कोणी घरातही बोलावत नाही आणि कोणी विचारपूसही करीत नाही. चळवळीतल्या काहींनी वळचणीला राहून काय अवस्था होते, याचा चांगलाच अनुभव घेतला आहे, अशी टीका पाटील यांनी खा. राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.