शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी कायद्यामुळे राज्यघटनेलाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST

गडहिंग्लज : राज्यसभेत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता कृषीविषयक कायदे पारित करून मोदी सरकारने राज्यघटनेलाच हरताळ फासला ...

गडहिंग्लज : राज्यसभेत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता कृषीविषयक कायदे पारित करून मोदी सरकारने राज्यघटनेलाच हरताळ फासला आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, शनिवारी केली.

शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘सलोखा परिषदे’तर्फे येथील प्रांतकचेरीसमोर आयोजित सर्वपक्षीय धरणे आंदोलनात ते बोलत होते. एकदा गुजरातमधून, एकदा आंध्रातून ‘मन की बात’मधून बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांशी बोलायला मात्र अपमान वाटत आहे, असा टोला लगावत त्यांनी आंदोलनाला पाठिंबाही दिला.

कॉ. संपत देसाई म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह लोकांनी उभारलेल्या सर्व संस्था, पर्यायाने लोकशाहीच मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडला पाहिजे.

यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, काँग्रेसचे प्रा. किसनराव कुराडे, ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सिद्धार्थ बन्ने, कॉ. शिवाजी गुरव, मनोहर दावणे यांचीही भाषणे झाली.

आंदोलनात नगरसेविका सुनीता पाटील, शशिकला देसाई, शकुंतला हातरोटे, ॲड. नाज खलिफा व क्रांती शिवणे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, उदय कदम, रमेश मगदूम, बसवराज मुत्नाळे, सखी महिला मंडळाच्या कॉ. उज्ज्वला दळवी, उर्मिला कदम, ‘दानिविप’चे रमजान अत्तार, ‘वंचित’चे सुरेश थरकार, साताप्पा कांबळे, रफीक पटेल, परशुराम कांबळे, आदींसह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.

--- गडहिंग्लज येथील प्रांतकचेरीसमोर सलोखा परिषदेच्यावतीने आयोजित सर्वपक्षीय आंदोलनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, संपत देसाई, बाळेश नाईक, अरविंद बारदेस्कर, सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे, गुंड्या पाटील, आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो )

चौकट

दया दाखवा, आंदोलन संपवा..! केवळ रक्तच नव्हे, तर हाडं गोठवणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीतदेखील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर दया दाखवावी, त्यांच्या मागण्या मान्य करून आंदोलन त्वरित संपवावे, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

-------

किसान सन्मानपेक्षा चौपट लाभ..! ‘किसान सन्मान योजने’त महिन्याला पाचशेप्रमाणे शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार मिळतात. ‘केडीसीसीद बँकेकडून आपण ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देणार आहोत. शेतकऱ्यांनी ही रक्कम बँकेत ठेवल्यास त्याच्या व्याजाची रक्कम पंतप्रधान मोदींच्या किसान सन्मान रकमेपेक्षा चौपट होते,असेही मुश्रीफ यांनी सांगितले.